AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dharashiv : राज्याचा बिहार होतोय का? पवनचक्कीसाठी जमीन बळकवण्याचा प्रयत्न, शेतकर्‍याला बेदम मारहाण, पोलीसांचे गुंडांना अभय?

Dharashiv Windmills Farmer : राज्यात मराठवाड्यातील काही जिल्ह्यात अराजकतेचे राज्य आहे का? असा प्रश्न पडावा अशी परस्थिती निर्माण झाली आहे. परभणी, बीडनंतर आता धाराशिवमध्ये पवनचक्की उभारण्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेण्यासाठी मारहाण करण्यात येत असल्याचे समोर येत आहे.

Dharashiv : राज्याचा बिहार होतोय का? पवनचक्कीसाठी जमीन बळकवण्याचा प्रयत्न, शेतकर्‍याला बेदम मारहाण, पोलीसांचे गुंडांना अभय?
शेतकऱ्याला गुंडांची मारहाण, पोलीस गप्प का?
| Updated on: Dec 20, 2024 | 2:24 PM
Share

राज्याचा बिहार होतोय का? असा सवाल विरोधक सरकारला विचारत आहेत. मराठवाड्यात या महिन्यात घडलेल्या गोष्टीत पोलीसच गुन्हेगारांना साथ तर देत नाहीत ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. परभणी, बीड नंतर आता धाराशिव जिल्ह्यात गुंडांची दहशत समोर येत आहे. या तीनही जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे का? असा रोकडा सवाल विरोधकांनी विचारला आहे. धाराशिवमध्ये पवनचक्की उभारण्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेण्यासाठी मारहाण करण्यात येत असल्याचे समोर येत आहे. विशेष म्हणजे पोलीसांकडे धाव घेतल्यावर पण ते बघ्याची भूमिका वठवत असल्याने त्यांच्याबद्दल रोष व्यक्त होत आहे.

काय आहे प्रकरण?

जे एस डब्ल्यू या पवनचक्की कंपनीला तुळजापूर तालुक्यातील बारूळ गावातील ठोंबरे कुटुंबियांनी 20 गुंठे जमीन भाडे तत्त्वावर दिली आहे. मात्र या कंपनीकडून शेतकर्‍यांना दमदाटी करण्यात आली आहे. ठोंबरे यांची 22 गुंठे जमीन न घेता 35 गुंठे जमीन बळकवण्यात आली, असा आरोप ठोंबरे कुटुंबियांनी केला आहे. करारापेक्षा जास्त जमीन देण्यास शेतकऱ्याने विरोध केल्यावर जे एस डब्ल्यू या कंपनीच्या ठेकेदाराने भाडोत्री गुंडाकडून जमीन मालक सचिन ठोंबरे यांना बेदम मारहाण केली.

या जीवघेण्या मारहाणीत शेतकरी सचिन ठोंबरे याच्या डोक्यात लोखंडी रॉड लागला. या मारहाणीत तो रक्त बंबाळ झाला. पण पोलिसांनी त्याची साधी तक्रार सुद्धा घेतली नसल्याचा आरोप सचिन ठोंबरे यांनी केला आहे.

कारवाई सोडा पोलीसच मूग गिळून

शेतकरी सचिन ठोंबरे याला मारहाण केल्यानंतर त्याच्या आई-वडीलांना पवनचक्कीच्या गुंडांनी धक्का बुक्की केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या शेतकर्‍यांनी तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. पण तक्रारीची दखल घेण्यात आली नाही. सचिन ठोंबरे यांनी थेट धाराशिवच्या जिल्हा पोलीस अधीक्षकाकडे तक्रार केली. मात्र गेली 21 तारखेपासून आजपर्यंत या तक्रारीची दखल घेण्यात आली नसल्याचे शेतकर्‍याकडून दावा करण्यात येत आहे.

हा घडलेला प्रकार दाबण्यासाठी पवनचक्कीच्या गुप्तेदाराकडून शेतकरी सचिन ठोंबरे याला वीस गुंठ्यापेक्षा अधिक जमिनीचा मोबदला म्हणून 75 हजार रुपयाचा धनादेश देण्यात आला. पण त्यात पैसेच नव्हते. अशी फसवणूक सुरू असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

बीड जिल्ह्याच्या मस्साजोग येथील देशमुख कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत असतानाच धाराशिवमधील बारुळ गावातील ठोंबरे कुटुंबिय पवनचक्कीच्या गुंडांच्या दहशतीखाली वावरत असल्याच समोर आले आहे. एकंदरीतच धाराशिव जिल्ह्यामधील पवनचक्कीच्या गुंडांची दहशत कधी संपणार असा प्रश्न जिल्ह्यातील शेतकर्‍यांना पडला आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.