AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dipali Sayyad : देहूत फडणवीसांनी प्रोटोकॉल तोडल्याचा दिपाली सय्यदांचा आरोप, तर चंद्रकांतदादा, फडणवीस म्हणतात पुरे झालं आता…

काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही यावरूनच भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवला होता. तसेच पंतप्रधान कार्यलयाला भाषणाची परवानगी मागूनही त्यांनी ती नाकारली असा आरोपही केला होता. आज दिपाली सय्यद यांनीही यावरूनच ट्विट केलंय.

Dipali Sayyad : देहूत फडणवीसांनी प्रोटोकॉल तोडल्याचा दिपाली सय्यदांचा आरोप, तर चंद्रकांतदादा, फडणवीस म्हणतात पुरे झालं आता...
दिपाली सय्यदImage Credit source: tv9
दादासाहेब कारंडे
दादासाहेब कारंडे | Updated on: Jun 16, 2022 | 5:06 PM
Share

मुंबई : दोन दिवसांपूर्वीच मोदींची (PM Modi) देहू दौरा (Dehu) पार पडलाय. मात्र या दौऱ्यावेळी तापलेलं राजकारण अजूनही निवलं नाही. कारण अजित पवारांना (Ajit Pawar) भाषणाची संधी न मिळाल्याने एकापाठोपाठ एक राष्ट्र्रवादीचे नेते भाजपविरोधात आक्रमक झाले. हा महाराष्ट्राचा अपमान आहे, अशी टीकाही राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून झाली. तर याच मुद्यावरून आता शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनीही भाजपवर आणि फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. तसेच फडणवीसांची चौकसी व्हावी अशी थेट मागणीच करून टाकलीय. तर त्याला फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्याकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलाय. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही यावरूनच भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवला होता. तसेच पंतप्रधान कार्यलयाला भाषणाची परवानगी मागूनही त्यांनी ती नाकारली असा आरोपही केला होता. आज दिपाली सय्यद यांनीही यावरूनच ट्विट केलंय.

फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल

दिपाली सय्यद यांनी ट्विट करत म्हटले आहे की, देवेंद्रजींनी थेट देशाच्या पंतप्रधानांचे प्रोटोकॅाल तोडले. स्थानिक आमदार,खासदार,नगराध्यक्षांचे पासेस गायब केले.उपमुख्यमंत्र्यांचे नाव भाषणाच्या यादीतुन काढले.पक्षाच्या नेत्यांना व्यासपीठ आणि स्वागताला उभे केले. खुर्चीसाठी हा माज बरा नव्हे. देवेंद्र फडणवीसांची चौकशी व्हायालाच हवी.” असे ट्विट त्यांच्याकडून करण्यात आलंय. त्यालाच आता भाजप नेत्यांनी उत्तर दिलंय.

दिपाली सय्यद यांचं ट्विट

फडणवीसांचेही जोरदार प्रत्युत्तर

याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, अजित दादा आणि पंतप्रधान हे मन मोकळ्यापणे बोलले आहेत. काही लोकांना ते बघवत नाही, मला तर असं वाटते हे आजित दादांविरोधातचं षडयंत्र आहे, अशा शब्दात फडणवीसांनी पलटवार केलाय.

चंद्रकांत पाटलांचाही पलटवार

देहूमधील कार्यक्रमावेळी मीसुद्धा मंचावर होतो. मा. पंतप्रधान मोदीजींनी स्वतःही अजितदादांना भाषण करायला सांगितलं होतं. पण त्यांनी नम्रपणे भाषण करणार नसल्याचं मोदीजींना सांगितलं. त्यामुळे महाराष्ट्राचा अपमान झाला वगैरे राजकारण आता पुरे झालं, असे म्हणत चंद्रकांत पाटलांनीही पलटवार केलाय.

चंद्रकांत पाटलांचं ट्विट

Follow Us
ऑपरेशन टायगर ॲक्टिव्ह? बुलढाणा असेल बालेकिल्ला अन् तब्बल...
ऑपरेशन टायगर ॲक्टिव्ह! बुलढाणा असेल बालेकिल्ला अन् तब्बल... शिवसेनेच्या कोर्टातील निकालाआधीच मोठा बॉम्ब
ब्लिंकिटच्या आईस्क्रीम क्रेटमध्ये उंदीर आढळल्याने अन्नसुरक्षेचा प्रश्न
कल्याणमध्ये ब्लिंकिटच्या आईस्क्रीम क्रेटमध्ये उंदीर आढळल्याने अन्नसुरक्षेचा प्रश्न
मुंडे भाऊ-बहिण पुन्हा चर्चेत; थेट म्हणाले, आमच्यातील वाद आता...
मुंडे भाऊ-बहिण पुन्हा चर्चेत; थेट म्हणाले, आमच्यातील वाद आता... बीडच्या राजकारणात नेमकं काय घडतंय?
पान मसाल्याच्या जाहिरातीवरून FDA ची तीन बॉलीवूड कलाकारांना नोटीस
पान मसाल्याच्या जाहिरातीवरून FDA ची तीन बॉलीवूड कलाकारांना नोटीस.
'प्रत्येक बहिणीला वाटते एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत'
'प्रत्येक बहिणीला वाटते एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत'-ज्योति वाघमारे
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुजय विखे आक्रमक
'ट्रम्प सारखा वेडा माणूस मी माझ्या उभ्या आयुष्यात पाहिला नाही'-सुजय विखे
१६ ऑगस्ट २०२६ च्या ठळक बातम्या: महिला आरक्षण, देशातील प्रमुख घडामोडी
१६ ऑगस्ट २०२६: महाराष्ट्रातील आणि देशातील प्रमुख घडामोडी
मुंबई लोकल: मध्य आणि हार्बर मार्गांवर आज मेगाब्लॉक
मुंबई लोकल: मध्य आणि हार्बर मार्गांवर आज मेगाब्लॉक, प्रवाशांना उशीर
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस