AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | दिशाची आई म्हणते, आम्हालाही जगावं वाटत नाही, आम्ही काही केलं, तर हे लोक जबाबदार!

दिशाचे वडील सतीश सालियान म्हणाले की, आमच्या मुलींनी काही वेगळं काही केलं नाही. बदनाम केलं जातंय. पोस्टमार्टममध्ये जे आलंय त्यात क्लिअर आहे. मग का बदनाम करताय, मर्डर झालाय, बलात्कार झाला, असं का म्हणता, असा सवाल त्यांनी केला. शिवाय दिशाचा कुठलाही मित्र गायब झालेला नाही, असा दावाही केला.

VIDEO | दिशाची आई म्हणते, आम्हालाही जगावं वाटत नाही, आम्ही काही केलं, तर हे लोक जबाबदार!
दिशा सालियानच्या आईने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
| Edited By: मनोज कुलकर्णी | Updated on: Feb 22, 2022 | 2:10 PM
Share

मुंबई : अभिनेता सुशांतसिंग राजपूत आणि त्याची एक्स-मॅनेजर दिशा सालियान (Disha Salian) यांच्या मृत्यू प्रकरणावरून सुरू झालेले राजकारण काही केल्या थांबायला तयार नाही. दोघांच्या मृत्यूला दीड वर्षाहून अधिक काळ लोटला. मात्र, अजूनही आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरूच आहे. त्यातच आज भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी सकाळ-सकाळी एकामागून एक चार ट्वीट्स करत दिशा सालियान आणि निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Waze) यांच्यात कनेक्शन असल्याचा दावा करत खळबळ उडवून दिली. या साऱ्या प्रकाराला दिशाचे कुटुंबीय कंटाळले असून, तिच्या आईने तर आम्हाली जगावं वाटत नाही. आम्ही काही केलं, तर हे लोक जबाबदार असतील. त्यामुळे कृपा करून हे घाणेरडे राजकारण थांबवा, अशी अर्त विनवणी केलीय.

काय म्हणाली दिशाची आई?

दिशा सालियानच्या आई वासंती सालियान म्हणाल्या की, दिशाच्या मृत्यूवरून सुरू असलेल्या राजकारणामुळे आम्हाला त्रास होत आहे. दोन वर्षांनंतर सर्व केस बंद झाली होती. मात्र, आता पुन्हा हे सुरू झाले आहे. याचा आम्हाला खूप त्रास होतो. आम्हाला सुद्धा आता जगावं वाटत नाही. आम्ही काही केलं तर याला हे लोक जबाबदार असतील. आम्हाला बाहेर ही जाता येत नाही. आता आम्हाला जगू द्या, अशी आर्त विनवणी त्यांनी केली.

दिशाने का केली आत्महत्या?

दिशा सालियानच्या आई वसंती सालियानची आई वासंती सालियान पुढे म्हणाल्या की, हे लोक आम्हाला बदनाम करत आहेत. त्यामुळे आम्ही महिला आयोगाकडे तक्रार करत आहोत. असं काही झालं नाही. फक्त आमच्या मुलीला बदनाम केलं जात आहे. तर दिशाचे वडील सतीश सालियान म्हणाले की, आमच्या मुलींनी काही वेगळं काही केलं नाही. ऑफिसच्या कामाचं ताण होता. यामुळे तिने आत्महत्या केली. जे काही बोललं जातंय, अपघाती मृत्यय झाला, हे सगळं खोटं आहे. बदनाम केलं जातंय. पोस्टमार्टममध्ये जे आलंय त्यात क्लिअर आहे. मग का बदनाम करताय, मर्डर झालाय, बलात्कार झाला, असं का म्हणता, असा सवाल त्यांनी केला. शिवाय दिशाचा कुठलाही मित्र गायब झालेला नाही, असा दावाही केला.

संबंधित बातम्या :

सुशांतसिंग, दिशा सालियान प्रकरणात महापौरांचं राज्य महिला आयोगाला पत्र, मालवणी पोलिसांना 48 तासात अहवाल देण्याचे आदेश

दिशा सालियनवर बलात्कार कोणी केला?, सुशांतसिंगच्या इमारतीचे सीसीटीव्ही कॅमेरे कसे गायब?; राणेंचा पुन्हा हल्लाबोल

सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूच्या सहा दिवस आधी दिशा सालियनचा मृत्यू; वाढदिवशी फोटो होतोय ट्रेंड

Follow Us
सावधान! दूधात तब्बल 997 किलो तेल, धाड टाकताच भेसळयुक्त दूध जप्त
सावधान! दूधात तब्बल 997 किलो तेल, धाड टाकताच भेसळयुक्त दूध जप्त.
नीट प्रकरणी 19 व्या दिवशीही CBI चा मुक्काम लातूरमध्येच, चौथ्या...
नीट प्रकरणी 19 व्या दिवशीही CBI चा मुक्काम लातूरमध्येच, चौथ्या....
संघ कार्यालय जाळपोळ प्रकरणात कोर्टाचा मोठा निकाल, 16 वर्षांनी...
संघ कार्यालय जाळपोळ प्रकरणात कोर्टाचा मोठा निकाल, 16 वर्षांनी....
केंद्रात मंत्रिपद देतो, 20 कोटी द्या, भाजपाच्या नेत्यावरच टाकलं जाळं;
केंद्रात मंत्रिपद देतो, 20 कोटी द्या, भाजपाच्या नेत्यावरच टाकलं जाळं;.
एकच खळबळ! 700 कर्मचारी असलेल्या पुण्यातील IT कंपनीला रातोरात टाळे
एकच खळबळ! 700 कर्मचारी असलेल्या पुण्यातील IT कंपनीला रातोरात टाळे.
लाडकी बहीण योजनेबाबत स्वतः एकनाथ शिंदे यांनीच केली मोठी घोषणा, थेट म्ह
लाडकी बहीण योजनेबाबत स्वतः एकनाथ शिंदे यांनीच केली मोठी घोषणा, थेट म्ह.
मद्यधुंद नशेतील महिलेचा पोलिस ठाण्यातच धिंगाणा, थेट शिवीगाळ करत...
मद्यधुंद नशेतील महिलेचा पोलिस ठाण्यातच धिंगाणा, थेट शिवीगाळ करत....
मुंबईत खळबळ, वर्दळीच्या ठिकाणी आढळली बेवारस बॅग
मुंबईत खळबळ, वर्दळीच्या ठिकाणी आढळली बेवारस बॅग.
बीड पुन्हा हादरलं! सासरच्यांनी आधी तिला उपाशी ठेवलं नंतर...पाच जणांवर
बीड पुन्हा हादरलं! सासरच्यांनी आधी तिला उपाशी ठेवलं नंतर...पाच जणांवर.
ज्याची भीती तेच घडलं! या करणामुळे पुन्हा 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र,
ज्याची भीती तेच घडलं! या करणामुळे पुन्हा 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र,.