AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मी निराश झालो असे समजू नका, देवेंद्र फडणवीस पळणारा व्यक्ती नाही’

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना पराभवाची कारणे सांगितले. ते म्हणाले की विजयाचे अनेक बाप असतात पण पराभवाचे नाही. पराभवाची जबाबदारी स्वीकारता आली पाहिजे. यावेळी त्यांनी पराभवाचं संपूर्ण गणित समजून सांगितले. कार्यकर्त्यांना नव्याने कामाला लागण्याच्या सूचना ही त्यांनी दिल्या.

'मी निराश झालो असे समजू नका, देवेंद्र फडणवीस पळणारा व्यक्ती नाही'
shailesh musale
shailesh musale | Updated on: Jun 08, 2024 | 4:00 PM
Share

देवेंद्र फडणवीस यांनी आज भाजपच्या विधीमंडळाच्या बैठकीत बोलत असताना निवडणूक निकालाचं संपूर्ण गणित समजून सांगितलं. भाजपचा पराभव का झाला याबाबत ही त्यांनी खुलासा केलाय. ते म्हणाले की, एक विशिष्ट नेरेटिव्ह तयार करण्यात आलं ज्यामुळे भाजपचा पराभव झाला. फडणवीस म्हणाले की, ‘निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित केली. देशाच्या इतिहासात मोदींची सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत. पंडित नेहरु यांची बरोबरी करणारे असे आपले नेते पंतप्रधान मोदी यांची एकमताने एनडीएने निवड केली. त्यांचे अभिनंदन करण्यासाठी आपण एकत्र आलोत.’

‘एकीकडे याचा आनंद आहे. देशातील लोकांनी मोदींवर विश्वास दाखवला. २०१४ आणि २०१९ आपला सिंहाचा वाटा होता. पण यंदा आपण तसं करु शकलो नाही. नव्याने आपल्याला रणनीती आखता यावी यासाठी आजची बैठक महत्त्वाची आहे. महाराष्ट्रात जे यश मिळालं नाही त्याचं कारणं शोधून ती दूर करता येतील आणि महायुतीचं विधानसभेत सरकार कसं आणता येईल.’

‘उन्हाळा संपतोय. पावसाळा जवळ आलेला आहे. पाऊस पडल्यानंतर जे पेललं जात तेच नंतर उगवतं. आता नव्याने पेरण्याची वेळ आला आहे. यशाचे बाप अनेक असतात पण अपयश ताकदीने अंगावर घ्यायचं असते. नवीन निर्धार करायचा असतो. मी या अपयशाची जबाबदारी घेतली. पॉलिटिकल अर्थमेटिकमध्ये कमी पडलो. देवेंद्र फडणवीस पळणारा व्यक्ती नाही. आमची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज आहे. कोणाला जर असं वाटलं असेल की मी निराश झालो तर ते सत्य नाही. मी अमित शाहांना भेटून आलो आहे. त्यांना माझी भूमिका सांगितली. त्यांनी सांगितलं आपण महाराष्ट्राची ब्लूप्रिंट तयार करु.’

‘देशात ज्या प्रकारे मोदींजींना समर्थन दिलं. ओडिसामध्ये आपलं सरकार आलं. आंध्रप्रदेशमध्ये एनडीएचं सरकार आलं. अरुणाचल मध्ये आपलं सरकार आलं. मोदी म्हणाले की, त्यांना तीन निवडणूका मिळून जितक्या जागा मिळाल्या त्यापेक्षा जास्त जागा भाजपला मिळाल्या. इंडिया आघाडीला जेवढ्या जागा मिळाल्या तेवढ्या एकट्या भाजपला मिळाल्या. महाविकासआघाडीला ४३.३ तर महायुतीला ४३.६ टक्के मतं मिळाली आहेत. केवळ २ लाख मत महाविकासआघाडीला जास्त मिळाल्या आहेत.’

‘मुंबईत त्यांना २४ लाख मते आहेत आपल्याला २६ लाख मते मिळाली आहेत. पण त्यांना ४ जागा मिळाल्या आपल्याला २ जागा मिळाल्या. आपण खोट्या नरेटिव्ह सोबत लढत होतो. हा चौथा पक्ष होता. त्याला आपण रोखू शकलो नाही. संविधान बदलणार असं पसरवलं गेलं. दलित, आदिवासी समाजात हा नरेटिव्ह तयार झाला. असा नरेटिव्ह एखाद्या निवडणुकीसाठी असतो. खोटा मुद्दा एका निवडणुकीपर्यंत मर्यादित असते. जेव्हा जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा मोदींनी आधी संविधानाची पूजा केली आहे.’

‘भारताच्या संविधानाचा महोत्सव साजरा केला जाणार आहे. असं मोदींजींनी सांगितलं आहे. पक्ष फोडाफोडीवरुन दुसरा नरेटिव्ह तयार झालं. मराठा समाजाने नरेटिव्ह तयार केलं. आपण त्यांना आरक्षण दिलं. सवलतीची योजना, हॉस्टेलची योजना आपल्या काळात झाल्या. ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला त्यांना मते गेली.याचा अर्थ असा की हे पण टिकणार नाहीये. काही प्रमाणात ते यशस्वी झाले. पण आपले मतं कमी झालेले नाही.’

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी