AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी अयोध्या दौऱ्याला विरोध; आता म्हणतात राज ठाकरे अयोध्येला आल्यास स्वागत, भाजपच्या या खासदाराचं म्हणणं काय?

मोठ्या पदावरील व्यक्तींनी जोडण्याचं काम केलं पाहिजे. तोडण्याचं नव्हे. आता राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर येत असतील, तर त्यांना काही समस्या येणार नाही. तो विषय आता संपला आहे.

आधी अयोध्या दौऱ्याला विरोध; आता म्हणतात राज ठाकरे अयोध्येला आल्यास स्वागत, भाजपच्या या खासदाराचं म्हणणं काय?
राज ठाकरे
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Jan 15, 2023 | 4:48 PM
Share

मुंबई : उत्तर भारतीयांवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी टीका केली होती. त्यानंतर त्यांनी अयोध्या दौरा करणार असल्याचं जाहीर केलं होतं. पण, या राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला बृजभूषण सिंह (Brijbhushan Singh) यांनी विरोध केला होता. त्यानंतर राज ठाकरे यांनी आपला अयोध्या दौऱ्या रद्द केला. तेच बृजभूषण सिंह काल पुण्यात भाजपच्या एका कार्यक्रमात आले होते. राज ठाकरे यांनी माफी मागितली असती तर त्यांचा मान वाढला असता, असं भाजपचे (BJP) खासदार बृजभूषण सिंह यांनी म्हंटलंय. मोठ्या पदावरील लोकांचं काय जोडण्याचं आहे. तोडण्याचं नाही, असंही त्यांनी सांगितलं.

त्यामुळं विरोध केला होता

बृजभूषण सिंह म्हणाले, एक गोष्ट प्रत्येकवेळी चालत नाही. वेळेनुसार सगळ्यांना चालावं लागते. त्यावेळी राज ठाकरे यांनी अयोध्येला येण्याचं जाहीर केलं होतं. मला वाटलं, महाराष्ट्रात असणाऱ्या उत्तर भारतीयांवर अन्याय झाला होता. उत्तर भारतीयांना मारहाण करण्यात आली होती. त्यामुळं मी त्यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला होता.परंतु, त्यावेळी राज ठाकरे यांनी माफी मागितली असती तर, ते आमच्या नजरेत मोठे नेते झाले असते.

तोडण्याचं नव्हे जोडण्याचं काम करावं

आम्ही राज ठाकरे यांच्याबद्दल आदर व्यक्त केला असता. मोठ्या पदावरील व्यक्तींनी जोडण्याचं काम केलं पाहिजे. तोडण्याचं नव्हे. आता राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर येत असतील, तर त्यांना काही समस्या येणार नाही. तो विषय आता संपला आहे. त्यामुळं राज ठाकरे यांनी अयोध्येला यावं.

तो विषय आता संपला

राज ठाकरे भेटल्यास त्यांना अयोध्या येण्याचं निमंत्रण देणार आहोत. त्यावेळी उत्तर भारतीयांवर मारहाण झाली होती. त्यामुळं प्रकरण चिघडलं होतं. आता तो विषय संपला आहे. त्यामुळं अयोध्येला कुणीही येऊ शकत, असंही बृजभूषण सिंह यांनी सांगितलं. बृजभूषण सिंह काल महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या कार्यक्रमाला आले होते. यावेळी त्यांनी कार्यक्रमाला संबोधितही केले.

Follow Us
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच: समितीच्या कामकाजावरून वाद
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान: महायुती म्हणून एकत्रित लढण्याला प्राधान्य
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर कुत्र्याने मालकाच्या घरासमोर ठाण मांडलं
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात...
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात... राजकारणातील हालाचली वाढल्या
त्रिशुलीतील बँक बचाव मोहीम: पुराच्या पाण्यातून सोने आणि रोकड जप्त
नेपाळ पूर: पाण्यात बुडालेल्या बँकेतून ५० कोटींचे सोने सुरक्षित बाहेर
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट...
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट गुन्हा दाखल
पीडित कुटुंबाला सुनेत्रा पवारांकडून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन
पिंपरी चिंचवड हुंडाबळी प्रकरण; सुनेत्रा पवारांनी गवारे कुटुंबीयांशी साधला संवाद
लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी मोर्चाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली
मुंबईत ओबीसी आंदोलनाला परवानगी नाकारली; पोलिसांचा दुसऱ्यांदा नकार