AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी अयोध्या दौऱ्याला विरोध; आता म्हणतात राज ठाकरे अयोध्येला आल्यास स्वागत, भाजपच्या या खासदाराचं म्हणणं काय?

मोठ्या पदावरील व्यक्तींनी जोडण्याचं काम केलं पाहिजे. तोडण्याचं नव्हे. आता राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर येत असतील, तर त्यांना काही समस्या येणार नाही. तो विषय आता संपला आहे.

आधी अयोध्या दौऱ्याला विरोध; आता म्हणतात राज ठाकरे अयोध्येला आल्यास स्वागत, भाजपच्या या खासदाराचं म्हणणं काय?
राज ठाकरे
| Edited By: | Updated on: Jan 15, 2023 | 4:48 PM
Share

मुंबई : उत्तर भारतीयांवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी टीका केली होती. त्यानंतर त्यांनी अयोध्या दौरा करणार असल्याचं जाहीर केलं होतं. पण, या राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला बृजभूषण सिंह (Brijbhushan Singh) यांनी विरोध केला होता. त्यानंतर राज ठाकरे यांनी आपला अयोध्या दौऱ्या रद्द केला. तेच बृजभूषण सिंह काल पुण्यात भाजपच्या एका कार्यक्रमात आले होते. राज ठाकरे यांनी माफी मागितली असती तर त्यांचा मान वाढला असता, असं भाजपचे (BJP) खासदार बृजभूषण सिंह यांनी म्हंटलंय. मोठ्या पदावरील लोकांचं काय जोडण्याचं आहे. तोडण्याचं नाही, असंही त्यांनी सांगितलं.

त्यामुळं विरोध केला होता

बृजभूषण सिंह म्हणाले, एक गोष्ट प्रत्येकवेळी चालत नाही. वेळेनुसार सगळ्यांना चालावं लागते. त्यावेळी राज ठाकरे यांनी अयोध्येला येण्याचं जाहीर केलं होतं. मला वाटलं, महाराष्ट्रात असणाऱ्या उत्तर भारतीयांवर अन्याय झाला होता. उत्तर भारतीयांना मारहाण करण्यात आली होती. त्यामुळं मी त्यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला होता.परंतु, त्यावेळी राज ठाकरे यांनी माफी मागितली असती तर, ते आमच्या नजरेत मोठे नेते झाले असते.

तोडण्याचं नव्हे जोडण्याचं काम करावं

आम्ही राज ठाकरे यांच्याबद्दल आदर व्यक्त केला असता. मोठ्या पदावरील व्यक्तींनी जोडण्याचं काम केलं पाहिजे. तोडण्याचं नव्हे. आता राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर येत असतील, तर त्यांना काही समस्या येणार नाही. तो विषय आता संपला आहे. त्यामुळं राज ठाकरे यांनी अयोध्येला यावं.

तो विषय आता संपला

राज ठाकरे भेटल्यास त्यांना अयोध्या येण्याचं निमंत्रण देणार आहोत. त्यावेळी उत्तर भारतीयांवर मारहाण झाली होती. त्यामुळं प्रकरण चिघडलं होतं. आता तो विषय संपला आहे. त्यामुळं अयोध्येला कुणीही येऊ शकत, असंही बृजभूषण सिंह यांनी सांगितलं. बृजभूषण सिंह काल महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या कार्यक्रमाला आले होते. यावेळी त्यांनी कार्यक्रमाला संबोधितही केले.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.