AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात मोठी बातमी! निवडणूक आयोगाचे मुंबई महापालिका आयुक्तांना हटवण्याचे आदेश

महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना हटवण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आहेत.

सर्वात मोठी बातमी! निवडणूक आयोगाचे मुंबई महापालिका आयुक्तांना हटवण्याचे आदेश
| Updated on: Mar 18, 2024 | 3:19 PM
Share

मुंबई | 18 मार्च 2024 : महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना हटवण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आहेत. आयुक्त इक्बाल सिंह यांच्यासह अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्तांनाही हटवण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. विशेष म्हणजे निवडणूक आयोगाने फक्त मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश दिले नाहीत तर देशातील 6 राज्यांच्या गृह सचिवांना हटवण्याचे आदेश दिले आहेत. निवडणूक आयोगाने गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या सहा राज्यांमधील गृहसचिवांना हटवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मिझोराम आणि हिमाचल प्रदेशमधील सामान्य प्रशासकीय विभागाच्या सचिवांनाही हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी त्यांच्या X अकाउंटवरुन व्हिडीओ ट्वीट केलाय. या व्हिडीओत त्यांनी इक्बाल सिंह चहल यांची बदली झाल्याची माहिती दिली आहे. “निवडणूक आयोगाने मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची ताबोडतोब बदली करण्यात यावी, असे आदेश महाराष्ट्र सरकारला दिले आहेत. मी त्याचे स्वागत करत आहे”, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

पश्चिम बंगालचे पोलीस महासंचालक बदलण्याचे आदेश

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालचे पोलीस महासंचालकांना हटवण्यासाठी आवश्यक कारवाई केली आहे. ज्या अधिकाऱ्यांचा कार्यकाळ तीन वर्ष पूर्ण झाला आहे किंवा ते त्यांच्या गृह जिल्ह्यांत कार्यरत आहेत त्यांची तातडीने बदली करण्यात यावी, असा आदेश निवडणूक आयोगाने सर्व राज्यांना दिला आहे. दरम्यान, पश्चिम बंगाल सरकारने नव्या पोलीस महासंचालकांसाठी तीन नावे पाठवली आहेत. यामध्ये संजय मुखर्जी, रणवीर कुमार आणि डॉ. राजेश कुमार यांची नावे आहेत. या तिघांपैकी एका पोलीस अधिाऱ्याला पोलीस महासंचालक पदाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते.

दरम्यान, देशात लोकसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. देशभरात एकूण 7 टप्प्यात निवडणूक पार पडत आहे. यातील पहिला टप्पा हा 19 एप्रिल, दुसरा 26 एप्रिल, तिसरा 7 मे, चौथा 13 मे, पाचवा 20 मे, सहावा 25 मे आणि सातवा टप्पा 1 जूनला असणार आहे. यानंतर 4 जूनला मतमोजणी होणार आहे.

Follow Us
बंगालमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, म्हणाले
बंगालमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, म्हणाले.
5 राज्यांच्या निकालानंतर मोदींचा मोठा दावा; बंगालसह आसाममध्ये विजय....
5 राज्यांच्या निकालानंतर मोदींचा मोठा दावा; बंगालसह आसाममध्ये विजय.....
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व; मोदींकडून कार्यकर्त्यांचं कौतुक
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व; मोदींकडून कार्यकर्त्यांचं कौतुक.
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा दणदणीत विजय; पंतप्रधान मोदींकडून कौतुक...
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा दणदणीत विजय; पंतप्रधान मोदींकडून कौतुक....
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा रेकॉर्ड ब्रेक विजय
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा रेकॉर्ड ब्रेक विजय.
नसरापूर अत्याचार प्रकणातील आरोपीच्या पत्नीची ओक्शाबोक्शी रडत पहिली...
नसरापूर अत्याचार प्रकणातील आरोपीच्या पत्नीची ओक्शाबोक्शी रडत पहिली....
पश्चिम बंगालमधील भवानीपूर मतमोजणी केंद्राबाहेर मोठा गोंधळ, स्वत: ममता
पश्चिम बंगालमधील भवानीपूर मतमोजणी केंद्राबाहेर मोठा गोंधळ, स्वत: ममता.
आसामच्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांचा करिष्मा, फडणवीसांनी प्रचार...
आसामच्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांचा करिष्मा, फडणवीसांनी प्रचार....
बारामतीतील विक्रमी विजयानंतर सुनेत्रा पवारांची पहिली भावनिक प्रतिक्रिय
बारामतीतील विक्रमी विजयानंतर सुनेत्रा पवारांची पहिली भावनिक प्रतिक्रिय.
सुनेत्रा पवारांचा दणदणीत विजय! बारामती पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर...
सुनेत्रा पवारांचा दणदणीत विजय! बारामती पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर....