AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता तर केवळ सुरुवात…अजून किती तापणार? 2025 मध्ये मोडणार उष्णतेचा रेकॉर्ड?

Global Warming Temperature 2025 : उत्तर आणि पश्चिम भारतावर सध्या सूर्य देव कोपला आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उष्णतेच्या लाटेने नागरिकांना पोळून काढले. दुपारी बाजारपेठा आणि रस्त्यावर शुकशुकाट दिसत आहे. हे वर्ष खरंच सर्वाधिक हॉट ठरेल?

आता तर केवळ सुरुवात...अजून किती तापणार? 2025 मध्ये मोडणार उष्णतेचा रेकॉर्ड?
उष्णतेच्या झळा
| Updated on: Apr 13, 2025 | 5:22 PM
Share

सध्या देशातील काही भागात सूर्य आग ओकतोय. या भागात तापमान आताच 40 अंशांच्या पुढे गेले आहे. अजून तर मे महिना जायचा आहे. त्यामुळे यंदाचे वर्ष हे सर्वात उष्ण ठरणार का? असा सवाल विचारला जात आहे. गेल्यावर्षापेक्षा यंदा जास्त ऊन पडलं तर काय होईल, याची भीती नागरिकांना सतावत आहे. देशात 1901 नंतर वर्ष 2024 मध्ये उष्णतेने नवनवीन रेकॉर्ड केले होते. यंदा तर एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच भीषण उष्णतेची लाट आली आहे. त्यामुळे गेल्या वर्षीपेक्षा 2025 हे सर्वात हॉट ठरेल का? याची चर्चा होत आहे.

एप्रिल ते जून महिन्यात काय होणार?

उत्तर आणि पश्चिम भारतातील अनेक शहरात सध्या अशीच स्थिती आहे. महाराष्ट्रातील अनेक शहरात पाऱ्याने डोळे वटारले आहेत. भीषण गर्मी आणि दमट वातावरणामुळे अनेक भागात उकाडा असह्य झाला आहे. घरातून बाहेर पडणे अवघड झाले आहे. त्यामुळे एप्रिलनंतर मे आणि जून हे सर्वाधिक उष्ण महिने असतील का, असा सवाल विचारला जात आहे. पण मध्यंतरी हवामानात बदल झाल्याचे दिसले. राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पारा खाली आला.

उष्माघाताचा धोका

विदर्भ, मराठवाड्यातील काही जिल्ह्यातल पारा 40 अंकांचा काटा पार कडून पुढे सरकला आहे. तर मुंबईत पारा 35 अंशांच्या घरात पोहचला आहे. त्यामुळे उन्हात फिरता काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बुलडाणा जिल्ह्यात उष्माघाताचा एक बळी गेला आहे. त्यामुळे दुपारी उन्हात बाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ग्रामीण भागात पाणी टंचाईच्या झळा

ग्रामीण भागात आतापासूनच पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. उन्हाची तीव्रता वाढल्याने तलाव, धरणातील पाणी साठ्याचे बाष्पीभवन झाले आहे. त्यामुळे अनेक भागात पाणी पुरवठ्यावर परिणाम होत आहे. विहिरी, कूप नलिका कोरड्या पडल्या आहेत. तर नदी नाले तर कधीच कोरडेठाक पडले आहेत. शेतीच्या आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न बिकट होत आहे. अनेक भागात टँकरच्या वाऱ्या सुरू झाल्या आहेत.

उचलली जीभ, लावली दाढीला, असं करू नका! राऊतांचा शिंदेंना खोचक सल्ला
उचलली जीभ, लावली दाढीला, असं करू नका! राऊतांचा शिंदेंना खोचक सल्ला.
सुनेत्रा पवार यांच्या बैठकांचं सत्र; विजयी उमेदवारांना भेटणार
सुनेत्रा पवार यांच्या बैठकांचं सत्र; विजयी उमेदवारांना भेटणार.
अजित पवार यांचं स्वप्न पूर्ण करायचयं! सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर
अजित पवार यांचं स्वप्न पूर्ण करायचयं! सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर.
कोश्यारींच्या विधानाने नवा राजकीय वाद; राऊतांचा जोरदार पलटवार
कोश्यारींच्या विधानाने नवा राजकीय वाद; राऊतांचा जोरदार पलटवार.
राज्यपाल कोट्यातील रिक्त जागा लवकरच भरणार?
राज्यपाल कोट्यातील रिक्त जागा लवकरच भरणार?.
विलीनीकरण हीच दादांना खरी श्रद्धांजली! शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया
विलीनीकरण हीच दादांना खरी श्रद्धांजली! शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया.
कामं नाही केलीत तर बघतोच; गणेश नाईक पालिका अधिकाऱ्यांवर संतापले
कामं नाही केलीत तर बघतोच; गणेश नाईक पालिका अधिकाऱ्यांवर संतापले.
... तेव्हाच एक खोक्याचा पुरावा देऊ! संदीप देशपांडेंचं मोठं वक्तव्य
... तेव्हाच एक खोक्याचा पुरावा देऊ! संदीप देशपांडेंचं मोठं वक्तव्य.
तर मी राजीनामा देईन...; एसीबीच्या धडक कारवाईनंतर झिरवळांचं मोठं विधान
तर मी राजीनामा देईन...; एसीबीच्या धडक कारवाईनंतर झिरवळांचं मोठं विधान.
उपमुख्यमंत्री शिंदे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल
उपमुख्यमंत्री शिंदे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल.