AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता तर केवळ सुरुवात…अजून किती तापणार? 2025 मध्ये मोडणार उष्णतेचा रेकॉर्ड?

Global Warming Temperature 2025 : उत्तर आणि पश्चिम भारतावर सध्या सूर्य देव कोपला आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उष्णतेच्या लाटेने नागरिकांना पोळून काढले. दुपारी बाजारपेठा आणि रस्त्यावर शुकशुकाट दिसत आहे. हे वर्ष खरंच सर्वाधिक हॉट ठरेल?

आता तर केवळ सुरुवात...अजून किती तापणार? 2025 मध्ये मोडणार उष्णतेचा रेकॉर्ड?
उष्णतेच्या झळा
| Updated on: Apr 13, 2025 | 5:22 PM
Share

सध्या देशातील काही भागात सूर्य आग ओकतोय. या भागात तापमान आताच 40 अंशांच्या पुढे गेले आहे. अजून तर मे महिना जायचा आहे. त्यामुळे यंदाचे वर्ष हे सर्वात उष्ण ठरणार का? असा सवाल विचारला जात आहे. गेल्यावर्षापेक्षा यंदा जास्त ऊन पडलं तर काय होईल, याची भीती नागरिकांना सतावत आहे. देशात 1901 नंतर वर्ष 2024 मध्ये उष्णतेने नवनवीन रेकॉर्ड केले होते. यंदा तर एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच भीषण उष्णतेची लाट आली आहे. त्यामुळे गेल्या वर्षीपेक्षा 2025 हे सर्वात हॉट ठरेल का? याची चर्चा होत आहे.

एप्रिल ते जून महिन्यात काय होणार?

उत्तर आणि पश्चिम भारतातील अनेक शहरात सध्या अशीच स्थिती आहे. महाराष्ट्रातील अनेक शहरात पाऱ्याने डोळे वटारले आहेत. भीषण गर्मी आणि दमट वातावरणामुळे अनेक भागात उकाडा असह्य झाला आहे. घरातून बाहेर पडणे अवघड झाले आहे. त्यामुळे एप्रिलनंतर मे आणि जून हे सर्वाधिक उष्ण महिने असतील का, असा सवाल विचारला जात आहे. पण मध्यंतरी हवामानात बदल झाल्याचे दिसले. राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पारा खाली आला.

उष्माघाताचा धोका

विदर्भ, मराठवाड्यातील काही जिल्ह्यातल पारा 40 अंकांचा काटा पार कडून पुढे सरकला आहे. तर मुंबईत पारा 35 अंशांच्या घरात पोहचला आहे. त्यामुळे उन्हात फिरता काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बुलडाणा जिल्ह्यात उष्माघाताचा एक बळी गेला आहे. त्यामुळे दुपारी उन्हात बाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ग्रामीण भागात पाणी टंचाईच्या झळा

ग्रामीण भागात आतापासूनच पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. उन्हाची तीव्रता वाढल्याने तलाव, धरणातील पाणी साठ्याचे बाष्पीभवन झाले आहे. त्यामुळे अनेक भागात पाणी पुरवठ्यावर परिणाम होत आहे. विहिरी, कूप नलिका कोरड्या पडल्या आहेत. तर नदी नाले तर कधीच कोरडेठाक पडले आहेत. शेतीच्या आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न बिकट होत आहे. अनेक भागात टँकरच्या वाऱ्या सुरू झाल्या आहेत.

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.