AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘माझी विनंती, कोणीही स्वतःला मोठे सिद्ध करू नये’, गोपाळ शेट्टी यांनी आपल्याच नेत्यांचे कान टोचले?

"माझी एकच विनंती आहे की, उरलेल्या दिवसात कोणीही स्वतःला मोठे सिद्ध करू नये. पक्ष मोठा करण्यासाठी सर्वांनी मिळून काम करावे आणि हे करायचे असेल तर स्वतःला लहान करावे लागेल. स्वतःला लहान करा आणि मग जगण्याचा आनंद पाहा", असं गोपाळ शेट्टी म्हणाले आहेत.

'माझी विनंती, कोणीही स्वतःला मोठे सिद्ध करू नये', गोपाळ शेट्टी यांनी आपल्याच नेत्यांचे कान टोचले?
गोपाळ शेट्टी
| Updated on: Nov 07, 2024 | 9:53 PM
Share

भाजपचे बोरिवली विधानसभेचे उमेदवार संजय उपाध्याय यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी गोपाळ शेट्टी यांनी आपल्याच पक्षाच्या नेत्यांचे कान टोचले. “कार्यालयाच्या उद्घाटनातून युतीचे कार्यकर्ते आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी जे वातावरण निर्माण केले आहे, त्याप्रमाणे मी सर्वांचे अभिनंदन करतो. सुनील राणे म्हणाले की, बोरिवलीची 1978 पासूनची परंपरा कायम ठेवण्यासाठी आपण सर्वांनी मिळून काम केले पाहिजे, समाजाचे भले करा. माझी एकच विनंती आहे की, उरलेल्या दिवसात कोणीही स्वतःला मोठे सिद्ध करू नये. पक्ष मोठा करण्यासाठी सर्वांनी मिळून काम करावे आणि हे करायचे असेल तर स्वतःला लहान करावे लागेल. स्वतःला लहान करा आणि मग जगण्याचा आनंद पाहा. लोक म्हणतात, तुमच्यात ताकद आणि ऊर्जा कुठून येते. मी नेहमी लहानपणापासूनच काम करतो. प्रत्येकजण माझ्यापेक्षा मोठा आहे असे मानून मी काम करतो”, असं गोपाळ शेट्टी आपल्या भाषणात म्हणाले.

पीयूष गोयल गोपाळ शेट्टी यांना मोठा भाऊ म्हणाले

यावेळी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी गोपाळ शेट्टी यांना मोठा भाऊ म्हणत आपल्या भाषणाला सुरुवात केली. “संजय उपाध्याय यांना आपण सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन निवडून आणू. येत्या काही दिवसांत बोरिवली हा मुंबईतील आघाडीचा विधानसभा मतदारसंघ बनणार आहे. विधानसभा निवडणुकीत सुनील राणे, मी आणि गोपाळ शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व कार्यकर्त्यांच्या मेहनतीने नवा विक्रम प्रस्थापित करू”, असं पीयूष गोयल म्हणाले.

पीयूष गोयल यांची मविआवर टीका

“महाविनाश आघाडीचे सरकार केवळ भ्रष्टाचारात गुंतले होते, अडीच वर्षे त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्व विकासकामे थांबवली होती”, अशी टीका पीयूष गोयल यांनी केली. “कोस्टल रोडने भाईंदरला जाणार आहे, म्हणजे आपण बोरिवलीहून निघू. 5-7 मिनिटांत कोस्टल रोडला टच करू आणि तिथून 20 मिनिटांत आपण थेट नरिमन पॉईंटला पोहोचू, हा कोस्टल रोडचा फायदा होईल”, अशी माहिती पीयूष गोयल यांनी यावेळी दिली.

Follow Us
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर.
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले.
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले.
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची..
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची...
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा.
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल.
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना....
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना.....
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या...
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या....
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना.
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ.