AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘माझी विनंती, कोणीही स्वतःला मोठे सिद्ध करू नये’, गोपाळ शेट्टी यांनी आपल्याच नेत्यांचे कान टोचले?

"माझी एकच विनंती आहे की, उरलेल्या दिवसात कोणीही स्वतःला मोठे सिद्ध करू नये. पक्ष मोठा करण्यासाठी सर्वांनी मिळून काम करावे आणि हे करायचे असेल तर स्वतःला लहान करावे लागेल. स्वतःला लहान करा आणि मग जगण्याचा आनंद पाहा", असं गोपाळ शेट्टी म्हणाले आहेत.

'माझी विनंती, कोणीही स्वतःला मोठे सिद्ध करू नये', गोपाळ शेट्टी यांनी आपल्याच नेत्यांचे कान टोचले?
गोपाळ शेट्टी
| Updated on: Nov 07, 2024 | 9:53 PM
Share

भाजपचे बोरिवली विधानसभेचे उमेदवार संजय उपाध्याय यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी गोपाळ शेट्टी यांनी आपल्याच पक्षाच्या नेत्यांचे कान टोचले. “कार्यालयाच्या उद्घाटनातून युतीचे कार्यकर्ते आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी जे वातावरण निर्माण केले आहे, त्याप्रमाणे मी सर्वांचे अभिनंदन करतो. सुनील राणे म्हणाले की, बोरिवलीची 1978 पासूनची परंपरा कायम ठेवण्यासाठी आपण सर्वांनी मिळून काम केले पाहिजे, समाजाचे भले करा. माझी एकच विनंती आहे की, उरलेल्या दिवसात कोणीही स्वतःला मोठे सिद्ध करू नये. पक्ष मोठा करण्यासाठी सर्वांनी मिळून काम करावे आणि हे करायचे असेल तर स्वतःला लहान करावे लागेल. स्वतःला लहान करा आणि मग जगण्याचा आनंद पाहा. लोक म्हणतात, तुमच्यात ताकद आणि ऊर्जा कुठून येते. मी नेहमी लहानपणापासूनच काम करतो. प्रत्येकजण माझ्यापेक्षा मोठा आहे असे मानून मी काम करतो”, असं गोपाळ शेट्टी आपल्या भाषणात म्हणाले.

पीयूष गोयल गोपाळ शेट्टी यांना मोठा भाऊ म्हणाले

यावेळी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी गोपाळ शेट्टी यांना मोठा भाऊ म्हणत आपल्या भाषणाला सुरुवात केली. “संजय उपाध्याय यांना आपण सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन निवडून आणू. येत्या काही दिवसांत बोरिवली हा मुंबईतील आघाडीचा विधानसभा मतदारसंघ बनणार आहे. विधानसभा निवडणुकीत सुनील राणे, मी आणि गोपाळ शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व कार्यकर्त्यांच्या मेहनतीने नवा विक्रम प्रस्थापित करू”, असं पीयूष गोयल म्हणाले.

पीयूष गोयल यांची मविआवर टीका

“महाविनाश आघाडीचे सरकार केवळ भ्रष्टाचारात गुंतले होते, अडीच वर्षे त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्व विकासकामे थांबवली होती”, अशी टीका पीयूष गोयल यांनी केली. “कोस्टल रोडने भाईंदरला जाणार आहे, म्हणजे आपण बोरिवलीहून निघू. 5-7 मिनिटांत कोस्टल रोडला टच करू आणि तिथून 20 मिनिटांत आपण थेट नरिमन पॉईंटला पोहोचू, हा कोस्टल रोडचा फायदा होईल”, अशी माहिती पीयूष गोयल यांनी यावेळी दिली.

Follow Us
महागाईचा फटका! एलपीजी गॅसची किंमत वाढली, किंमत 3000 च्या पुढे...
महागाईचा फटका! एलपीजी गॅसची किंमत वाढली, किंमत 3000 च्या पुढे....
डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूमागचे सत्य समोर, नेमकं काय घडलं?
डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूमागचे सत्य समोर, नेमकं काय घडलं?.
8 वर्षांची प्रतीक्षा संपली, आजपासून मिसिंग लिंक सर्वसामान्यांसाठी खुला
8 वर्षांची प्रतीक्षा संपली, आजपासून मिसिंग लिंक सर्वसामान्यांसाठी खुला.
मुस्लिम लग्नपत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज-टिपू सुलतानचा उल्लेख?
मुस्लिम लग्नपत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज-टिपू सुलतानचा उल्लेख?.
मुख्यमंत्री फडणवीस- शिंदेंच्या हस्ते मिसिंग लिंकचं लोकार्पण
मुख्यमंत्री फडणवीस- शिंदेंच्या हस्ते मिसिंग लिंकचं लोकार्पण.
कोंढव्याला पाकिस्तान संबोधल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
कोंढव्याला पाकिस्तान संबोधल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल.
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; 1745 कोटींचा साठा....
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; 1745 कोटींचा साठा.....
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, सुळे अडकल्या....
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, सुळे अडकल्या.....
मराठीचं नाव घेतल्यावर मिरच्या का झोंबतायत?, राऊतांचा फडणवीसांवर हल्ला
मराठीचं नाव घेतल्यावर मिरच्या का झोंबतायत?, राऊतांचा फडणवीसांवर हल्ला.
आता मुंबई-पुणे प्रवास सुसाट! अर्ध्या तासाची बचत, आज होणार मिसिंग लिंक
आता मुंबई-पुणे प्रवास सुसाट! अर्ध्या तासाची बचत, आज होणार मिसिंग लिंक.