AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Governor Vs CM : हेच ते मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना लिहिलेलं पत्र, जे कोश्यारींनी ‘अपमानजनक आणि धमकावणारं’ असल्याचं कडक शब्दात सांगितलं

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat singh Kyoshari)आणि राज्य सरकार यांच्यातला वाद संपण्याचं नाव घेत नाही. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यपालांना पत्र लिहिलं.

Governor Vs CM : हेच ते मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना लिहिलेलं पत्र, जे कोश्यारींनी 'अपमानजनक आणि धमकावणारं' असल्याचं कडक शब्दात सांगितलं
| Edited By: Pradeep Garad | Updated on: Dec 30, 2021 | 3:02 PM
Share

मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat singh Kyoshari)आणि राज्य सरकार यांच्यातला वाद संपण्याचं नाव घेत नाही. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यपालांना पत्र लिहिलं. मात्र हे पत्र अपमानजनक असल्याचं राज्यपाल म्हणालेत. काय वाद आहे, पाहू या…

मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्राचा ढोबळ अनुवाद…

महोदयांना अतिशय आदरपूर्वक माझं उत्तर पाठवत आहे.

मी महोदयाच्या लक्षात ही बाब आणू इच्छितो, की विधीमंडळाचं कामकाज नियमित करण्यासाठी भारतीय घटनेच्या कलम 208 क्लॉज 1 तरतूद करण्यात आलेली आहे. त्यात विधानसभेच्या अध्यक्षाच्या निवडणुकीचाही समावेश आहे.

यासंदर्भातल्या घटनात्मक कायदेशीर बाबींचा खूप बारीक पद्धतीनं विचार केला तर असं लक्षात येतं, की महोदयांना यासंदर्भातले अटी, नियम ठरवण्याची कुठलीही भूमिका नाही. त्यामुळे अर्थातच नियम-6 आणि नियम 7 हे कायदेशीर आहेत. हे नियम भारतीय राज्यघटनेच्या तरतुदींचा भंग करत नाहीत. ते विधीमंडळ प्रक्रियेशी सुसंगत आहेत. विधानसभा अध्यक्षांची निवडणूक ठरवण्याच्या तारखेशी महोदयांचा काहीही संबंध नाही.

महोदयांनी घटनात्मक तरतुदींची कायदेशीर बाजू तपासण्यात त्यांचा बहुमूल्य वेळ आणि ऊर्जा खर्च करु नये, हे अत्यंत आदराने राज्यपाल महोदयांच्या निदर्शनास आणून देण्यात आले होते. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीची तारीख ठरवणंही तितकंच अप्रासंगिक आहे.

राज्यपालांना यामध्ये रस असल्यास त्यांनी आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ते पूर्ण करावे. मी 24 डिसेंबर 2021 रोजी पाठवलेल्या पत्रात मुख्यमंत्री या नात्याने सुचवल्यानुसार 28 डिसेंबर 2021 रोजीची तारीख महोदयांनी ठरवावी.

अत्यंत आदरपूर्वक आपल्या निदर्शनास आणून दिले आहे, की महामहीम यांनी या प्रकरणात स्वतः गुंतण्याची गरज नाही. हा विषय पूर्णपणे आपल्याशी निगडित नाही. त्यामुळे अनावश्यक सल्लामसलत, घटना तज्ज्ञ, कायदेशीरता तपासण्यात आपण वेळ खर्च करण्याची गरज नाही. महामहिमांचा वेळ सर्वात मौल्यवान आहे. त्यांनी अवास्तव कामे करण्यासाठी आपली शक्ती खर्च करण्याची गरज नाही. विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेणे हे पूर्णतः विधानसभेशी सबंधित आहे. त्यामुळे आपण काढलेला निष्कर्ष हा पूर्णपणे अप्रासंगिक असेल. त्यामुळेच अधिवेशनाचा शेवटचा दिवस लक्षात घेऊन हे पत्र आपल्याला लिहिले आहे. याप्रकरणी आम्ही व्हिडिओद्वारे मंत्र्यांची संवाद साधला आहे. त्या अनुषंगाने आपण 27 डिसेंबर 2021 संध्याकाळी 6.00पर्यंत आपणही निर्णय घ्यावा ही विनंती.

शक्य तितक्या लवकर विधानसभा अध्यक्षांची निवड करणं, हे विधीमंडळाचे संविधानिक कर्तव्य आहे, हे महोदयांच्या वेगळे लक्षात आणून देण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभेच्या अशा संविधानिक कर्तव्याला फक्त रोखणेच नाही, तर दिरंगाई करणे, हे विधीमंडळाच्या संविधानिक कार्यात हस्तक्षेप करण्यासारखे आहे. त्यामुळे ते टाळायला हवे.

(मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्राचा हा ढोबळ अनुवाद आहे)

आमदार लाड सपत्नीक ‘शिवतीर्थ’वर, गप्पा संपेना, शर्मिला वहिनी दारापर्यंत सोडायला

“मी अहमदाबादचा पोलिस आयुक्त बोलतोय…” पुण्यात पोलिसांनाच गंडवणारा भामटा मुंबईत जेरबंद

फडणवीस-अजित पवार शपथविधीवर पवारांचा गौप्यस्फोट, आता अजितदादा खाडकन म्हणाले…

Follow Us
वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला,
Sachin ahir Worli | वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा
तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
Devendra Fadanvis | तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला, थेट मुख्यमंत्र्यावर आरोप, 16 एकर जागा...
वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात...
ST Bus | वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP...
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP नेत्याच्या कुटुंबियाचाही समावेश
राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! तटकरेंच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार
Sunil Tatkare | राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! सुनील तटकरे यांच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार; नियुक्तीवरच सवाल
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या...
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या कार्यक्रमाला, ठाकरे गटाकडून थेट...
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा; बड्या नेत्यांची उपस्थिती?
छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! VIDEO पाहून तुम्हीही...
Karjat | छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! कर्जतच्या रस्त्यांची पोलखोल; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल…
एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही!
Laxaman Hake | एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही! लक्ष्मण हाके भडकले; OBC आरक्षणावरून सरकारलाही घेरलं