हे तर पडद्यामागचे राजकारण…हिंदीच्या सक्तीवरून संजय राऊत यांनी धु धु धुतले; कशासाठी घेतला निर्णय, दिले हे कारण

Sanjay Raut on Hindi Controversy : इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीकरणावरून राज्यात वातावरण तापले आहे. मनसेसह उद्धव ठाकरे शिवसेनेने याप्रकरणी राज्य सरकारला धारेवर धरले आहे. तर खासदार संजय राऊत यांनी या हा निर्णय घेण्यामागील कारणाचा ऊहापोह केला आहे.

हे तर पडद्यामागचे राजकारण...हिंदीच्या सक्तीवरून संजय राऊत यांनी धु धु धुतले; कशासाठी घेतला निर्णय, दिले हे कारण
हिंदीवरून तुफान फटकेबाजी
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Apr 18, 2025 | 10:48 AM

इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीकरणाच्या निर्णयाने राज्यात संतापाची लाट उसळली आहे. त्यावरून मनसेसह उद्धव ठाकरे शिवसेनेने राज्य सरकारला धारेवर धरले आहे. आज सकाळी घेतलेल्या पत्र परिषदेत खासदार संजय राऊत यांनी भाजपावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी हा निर्णय असा अचानक घेण्यामागील कारणांचा ऊहापोह केला. त्यांनी CBSC, ICSE शाळांमध्ये मराठी सक्ती करण्याची हिंमत आहे का? असा खडा सवाल त्यांनी केला आहे.

हिंदी आमच्यावर लादू नका

हिंदी आमच्यावर लादू नका, इतर ठिकाणी ही लादू नका. हिंदी सक्तीची करू नका. अनेक जण हिंदी बोलतात. पण तिची सक्ती करू नका तुम्ही विद्यार्थ्यांचे नुकसान करू नका. सीबीएसई, आयसीएसई सारख्या मोठ्या शाळेत मराठी सक्तीचा करा, ती तुमच्यात हिंमत आहे का? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केला.

इतर भाषांवर सूड उगवू नका

हिंदी ही देशातील एक संवाद भाषा आहे. घटनात्मक वैधता नसली तरी सुद्धा हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा आहे. नरेंद्र मोदी यांना इंग्रजी येत नाही. अमित शाह यांना हिंदी येत नाही म्हणून हिंदी लादू नका. त्यांचे हिंदी सुद्धा मोडकं तोडकं आहे, म्हणून त्याचा सूड इतर भाषांवर काढू नका. राज्यात हिंदी लागू करून ते या लोकांची सोय करत असल्याची टीका त्यांनी राज्य सरकावर केली.

महाराष्ट्रा सारख्या राज्यात खास करून मुंबईत हिंदी सिनेमा तयार होतो. या मुंबईतूनच, महाराष्ट्रातूनच हिंदी सिनेमा, हिंदी गाणी, हिंदी साहित्य, हिंदी लेखक मोठे झाले आहे. पृथ्वी थिएटर कुठे आहे? असा सवाल करत त्यांनी हिंदी येथे पूर्वीपासूनच असल्याचे सांगितले. पण हिंदी लादू नका असे ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी अगोदर माय मराठीकडे लक्ष द्यावे

मुख्यमंत्र्यांनी अगोदर माय मराठीकडे लक्ष द्यावे, असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला. बेळगाव, धारवाड परिसरात मराठी भाषिकावर अत्याचार होत आहे. त्यावर ते कधी बोलले का? असा सवाल त्यांनी केला. यावेळी त्यांनी भाजपाचे महाराष्ट्राच्या निर्मितीत कोणतेही योगदान नसल्याचा आरोप केला.

आताच का घेतला निर्णय?

हिंदी सक्तीचा निर्णय आताच का घेतला? यामागील कारणं त्यांनी सांगितली. मुंबई महानगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन सुरू असलेले हे पडद्यामागचे राजकारण असल्याचा घणाघात त्यांनी केला. कुठलातरी पक्ष हिंदीची मागणी करतो. मग कोणतरी त्या मागणी आधारे शिवाजी पार्कावर जाऊन एका नेत्याशी चर्चा करतो आणि दुसऱ्या दिवशी एक मोठे ट्विट करण्यात येते. उठले कधी, केले कधी? असा टोला त्यांनी लगावला. ते ट्वीट सागर बंगल्यावरून अथवा कुठल्यातरी बंगल्यावरून तयार करून आलं होतं, असा थेट आरोप संजय राऊत यांनी केला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us