AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shiv Sena: हिंमत असेल तर राजीनामा पाठवा आणि निवडणुकीला सामोरं जा, आदित्य ठाकरेंचं बंडखोर आमदारांना आव्हान

संपर्कात असलेल्या १७ ते १८ आमदारांना पळवून आणि कि़डनॅप करुन नेले आहे, असे त्यांच्या व्हिडिओत स्पष्ट दिसते आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. त्यांना कैद्यासारखी वागणूक दिली जात असल्याचा आरोपही आदित्य यांनी केली आहे.

Shiv Sena: हिंमत असेल तर राजीनामा पाठवा आणि निवडणुकीला सामोरं जा, आदित्य ठाकरेंचं बंडखोर आमदारांना आव्हान
Aaditya ThackerayImage Credit source: TV 9 marathi
| Edited By: | Updated on: Jun 25, 2022 | 9:32 PM
Share

मुंबई– हिंमत असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या आणि निवडणुकीत सामोरे या, असे आव्हान शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray)यांनी बंडखोर आमदारांना (Rebel MLA)दिले आहे. तुमच्यात हिंमत असेल राजीनामे द्या आणि रणांगणात या, आमच्याकडे प्रत्येक मतदारसंघात उमेदवार तयार आहे, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे. यापुढे जास्तीत जास्त महिला आमदार शिवसेनेतून (Shivsena)विधानभवनात जातील असे त्यांनी सांगितले. ही मुंबई शिवसेनेची आहे आणि शिवसेनेचीच राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जगातलं हे पहिलं उदाहरण असेल जेव्हा सत्ताधारी विरोधक होत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.

या बंडखोर आमदारांपैकी काही जणांना किडनॅप करुन नेले

संपर्कात असलेल्या १७ ते १८ आमदारांना पळवून आणि कि़डनॅप करुन नेले आहे, असे त्यांच्या व्हिडिओत स्पष्ट दिसते आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. त्यांना कैद्यासारखी वागणूक दिली जात असल्याचा आरोपही आदित्य यांनी केली आहे. गुवाहाटीत एका बाजूला या आमदारांचा रोजचा जेवणाचा खर्च नऊ लाख रुपये आहे, तर दुसरीकडे आसाममध्ये पूरस्थितीत लोकांना जेवायचे अन्न नसल्याची टीका त्यांनी केली.

बरं झालं घाण गेली – आदित्य

बरं झाली घाण गेली, असे सांगत आता यापुढे सगळे चांगले घडणार असल्याचे आदित्य ठाकरेंनी सांगितले आहे. ज्यांना मदत केली, ज्यांना उमेदवारी दिली त्यांनी पक्षाशी गद्दारी केली याचे वाईट वाटते असे त्यांनी म्हटले आहे. या आमदारांत जर हिंमत असती तर बंड करण्यासाठी सूरतला जाण्याची काय गरज होती, ठाण्यात राहता आले नसते का, असा प्रश्नही आदित्य यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडची दोन महत्त्वाची खआती नगरविकास आणि एमएसआरडीसी सारखी खआती एकनाथ शिंदेंना दिली, यापेक्षा त्यांना काय द्यायला हवं होतं, असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला आहे. मुख्यमंत्र्यांना सत्तेचा मोह नव्हता. अनेक जण पुन्हा येईन म्हणत असताना, अनेक मंत्री बंगले सोडत नसताना, आम्ही तातडीने वर्षा निवासस्थान सोडले, असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे.

एक फ्लोअरटेस्ट आधी बाहेर होईल

जेव्हा हे आमदार मुंबईत येतील तेव्हा ते चांदिवलीत उतरलीत, बांद्राहून येतील आणि वरळी, भायखळ्यातून त्यांना जावे लागेल, हे त्यांनी लक्षात ठेवावे, असा इशाराही आदित्य यांनी दिला आहे. एक फ्लोअर टेस्ट आत होईल तर दुसरी बाहेर होईल असे संकेत त्यांनी दिलेत. तसेच केंद्र सरकार ही टेस्ट घडवून आणण्यालाठी केंद्रीय बळाचा वापर केरल असे संकेतही त्यांनी दिलेत.

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.