AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“मनुस्मृतीविरोधात आता स्त्रियांनीच उठाव करावा”; राष्ट्रवादीच्या नेत्यानं त्या ग्रंथातील महिलांचं स्थान दाखवलं

मनुस्मृती हे चातुर्वण्य व्यवस्थेची समर्थन करणारी आहे. आणि मनुस्मृतीची विचारसरणी ही आपल्या माता भगिनींसाठी घातक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

मनुस्मृतीविरोधात आता स्त्रियांनीच उठाव करावा; राष्ट्रवादीच्या नेत्यानं त्या ग्रंथातील महिलांचं स्थान दाखवलं
| Edited By: महादेव कांबळे | Updated on: Feb 22, 2023 | 12:13 AM
Share

मुंबईः गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड वेगवेगळ्या कारणामुळे सतत चर्चेत आले आहेत. ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याची आव्हाडांच्या मुलीला आणि त्यांच्या जावयाला मारण्याच्या धमकीमुळे राजकीय वातावरण तापले होते. तर आज बनारस हिंदू युनिव्हर्सिटीची एक जाहिरात आली आहे, प्रोजेक्ट फेलोशिपसाठी ‘Applocability of Manusmruti in Indian Society’ या जाहिरातीमुळे आता जितेंद्र आव्हाड यांनी विरोधसकांसह मनुस्मृतीचे समर्थन करणाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

या जाहिरातीबद्दल बोलताना त्यांना म्हटले आहे की, मनुस्मृतीची ही संकल्पांना संविधानाने बाहेर फेकली आहे. त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान निर्माण करताना महाडमध्ये मनुस्मृती जाळून त्याबद्दल आपला राग व्यक्त केला असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

मनुस्मृतीवर टीका करताना जितेंद्र आव्हाड यांनी त्या मनुस्मृतीचा इतिहास सांगितला आहे. मनुस्मृती हे चातुर्वण्य व्यवस्थेची समर्थन करणारी आहे. आणि मनुस्मृतीची विचारसरणी ही आपल्या माता भगिनींसाठी घातक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

मनुस्मृतीनुसार स्त्री ही वासनेने वखवखलेली असते. त्यामुळे तुम्ही मनुस्मृतीचं स्वागत करणार असाल, तर आपल्या आईबद्दल असा विचार कराल का असा सवाल उपस्थित करून त्यांनी स्त्री ही फक्त उपभोगाची वस्तू असते असं मननस्मृतीत सांगितले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

त्याचबरोबर मनुस्मृतीमध्ये दलित, क्षुद्र यांच्याबद्दल काय त्यामध्ये काय म्हटले आहे त्याबद्दल सोडून दिलेलेच बरे आहे. मात्र आईच्या मनात वासना असते हे म्हटलेलं कुणाला आवडेल? असा सवाल जितेद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.

ज्या मनुस्मृतीने चातुर्वण्य व्यवस्थेचे समर्थन केले आहे, स्त्रीयांना हीन लेखले आहे. त्या – मनुस्मृतीची चिरफाड करून बाबासाहेबांनी संविधान आणलं आहे.

भारतात स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळाला आहे आणि जो पाश्चिमात्य देशात उशिरा मिळाला. त्यामुळे आता याविरोधात स्त्रियांनी उठाव केला पाहिजे असे आवाहन करत त्यांनी मनुस्मृती स्त्रियांना स्थानच देत नसल्याने त्याचा विचार आता महिलांनी करणे गरजेचे आहे असंही त्यांनी म्हटले आहे.

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...