AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘ते’ बोलताहेत मग आमचे मुख्यमंत्री गप्प का..? हिवाळी अधिवेशनात सीमावादावरून सरकारला घेरले…

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील गावांवर दावा केला होता. त्यानंतर त्यांनी बेळगाव सीमावादावरून ट्विट केल्यानंतर महाराष्ट्रातील वाहनांवर कर्नाटकात तोडफोड केली.

'ते' बोलताहेत मग आमचे मुख्यमंत्री गप्प का..? हिवाळी अधिवेशनात सीमावादावरून सरकारला घेरले...
| Updated on: Dec 20, 2022 | 9:57 PM
Share

नागपूरः हिवाळी अधिवेशन सुरू होण्याआधीपासूनच विरोधकांनी सरकारला कोणत्या मुद्यावरून घेरायचं हा निश्चिय केला होता. त्यामुळेच पहिल्या दिवसांपासून भाजपच्या मंत्र्यांची बेताल वक्तव्य, सीमावाद यावरून जोरदार टीका करण्यात येत होती. हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विरोधकांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे.

ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर सीमावादावरून टीका करताना एकनाथ शिंदे यांचे सरकार म्हणजे गद्दारांचे सरकार आहे. ज्या लोकांनी बंडखोरी करून सरकार स्थापन केले आहे. त्या लोकांचे हे सरकार घटनाबाह्य सरकार असल्याचा घणाघात त्यांनी केला आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील गावांवर दावा केला होता. त्यानंतर त्यांनी बेळगाव सीमावादावरून ट्विट केल्यानंतर महाराष्ट्रातील वाहनांवर कर्नाटकात तोडफोड केली.

त्यानंतरही आपल्या मुख्यमंत्र्यांनी कोणतीही भूमिका घेतली नाही. त्याविषयावर बोलताना आदित्य ठाकरे यांनी सांगितले की, देशात प्रथमच एका राज्याचा मुख्यमंत्री दुसऱ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना घाबरत आहे अशी टीका त्यांनी त्यांच्यावर केली.

सीमावादावरून एकनाथ शिंदे यांना लक्ष्य करताना आदित्य ठाकरे यांनी ज्या चाळीस आमदारांनी बंडखोरी केली होती. त्यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला आहे. त्यामुळे आता सरकारकडून आदित्य ठाकरे यांच्या टीकेला कशा पद्धतीने उत्तर देणार हे थोड्याच दिवसात कळणार आहे.

आदित्य ठाकरे यांनी राज्याच्या मुख्यमंत्री पद यांनी हे मिळवले असले तरी ते घटनाबाह्य पद त्यांनी बळकावले असल्याचे म्हटले आहे. त्याबरोबच हे सरकार राज्यासाठी काम करत नसून हे मुख्यमंत्री त्यांच्या 40 गद्दांरासाठी काम करत आहे असल्याची टीका त्यांनी केली आहे.

Follow Us
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन.
अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समो
अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समो.
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान.
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले.
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला...
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला....
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण...
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण....
सोलापुरात महापुरुषांच्या पुतळ्यावरून वाद; पोलीस आणि आंदोलकांमध्ये तणाव
सोलापुरात महापुरुषांच्या पुतळ्यावरून वाद; पोलीस आणि आंदोलकांमध्ये तणाव.
राज्यभरात हनुमान जयंतीचा उत्साह, अंजनेरी मंदिरात भाविकांची गर्दी
राज्यभरात हनुमान जयंतीचा उत्साह, अंजनेरी मंदिरात भाविकांची गर्दी.
हा आयोग चोर आहे... राऊतांची निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावर टीका
हा आयोग चोर आहे... राऊतांची निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावर टीका.
अजितदादाच्या राष्ट्रवादीत मोठा भूकंप होणार? किती आमदार फुटणार?
अजितदादाच्या राष्ट्रवादीत मोठा भूकंप होणार? किती आमदार फुटणार?.