AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘ते’ बोलताहेत मग आमचे मुख्यमंत्री गप्प का..? हिवाळी अधिवेशनात सीमावादावरून सरकारला घेरले…

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील गावांवर दावा केला होता. त्यानंतर त्यांनी बेळगाव सीमावादावरून ट्विट केल्यानंतर महाराष्ट्रातील वाहनांवर कर्नाटकात तोडफोड केली.

'ते' बोलताहेत मग आमचे मुख्यमंत्री गप्प का..? हिवाळी अधिवेशनात सीमावादावरून सरकारला घेरले...
| Updated on: Dec 20, 2022 | 9:57 PM
Share

नागपूरः हिवाळी अधिवेशन सुरू होण्याआधीपासूनच विरोधकांनी सरकारला कोणत्या मुद्यावरून घेरायचं हा निश्चिय केला होता. त्यामुळेच पहिल्या दिवसांपासून भाजपच्या मंत्र्यांची बेताल वक्तव्य, सीमावाद यावरून जोरदार टीका करण्यात येत होती. हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विरोधकांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे.

ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर सीमावादावरून टीका करताना एकनाथ शिंदे यांचे सरकार म्हणजे गद्दारांचे सरकार आहे. ज्या लोकांनी बंडखोरी करून सरकार स्थापन केले आहे. त्या लोकांचे हे सरकार घटनाबाह्य सरकार असल्याचा घणाघात त्यांनी केला आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील गावांवर दावा केला होता. त्यानंतर त्यांनी बेळगाव सीमावादावरून ट्विट केल्यानंतर महाराष्ट्रातील वाहनांवर कर्नाटकात तोडफोड केली.

त्यानंतरही आपल्या मुख्यमंत्र्यांनी कोणतीही भूमिका घेतली नाही. त्याविषयावर बोलताना आदित्य ठाकरे यांनी सांगितले की, देशात प्रथमच एका राज्याचा मुख्यमंत्री दुसऱ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना घाबरत आहे अशी टीका त्यांनी त्यांच्यावर केली.

सीमावादावरून एकनाथ शिंदे यांना लक्ष्य करताना आदित्य ठाकरे यांनी ज्या चाळीस आमदारांनी बंडखोरी केली होती. त्यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला आहे. त्यामुळे आता सरकारकडून आदित्य ठाकरे यांच्या टीकेला कशा पद्धतीने उत्तर देणार हे थोड्याच दिवसात कळणार आहे.

आदित्य ठाकरे यांनी राज्याच्या मुख्यमंत्री पद यांनी हे मिळवले असले तरी ते घटनाबाह्य पद त्यांनी बळकावले असल्याचे म्हटले आहे. त्याबरोबच हे सरकार राज्यासाठी काम करत नसून हे मुख्यमंत्री त्यांच्या 40 गद्दांरासाठी काम करत आहे असल्याची टीका त्यांनी केली आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.