AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तात वाढ; पोलिसांकडून मुंबईत येणाऱ्या वाहनांची तपासणी

पोलीस बाहेरून मुंबईमध्ये येणाऱ्या प्रत्येक वाहनांची तपासणी करत आहेत. जे वाहनचालक कोरोना नियमांचे आणि वाहतुक नियमांचे उल्लंघन करत आहेत, त्यांच्यावर पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारण्यात  येत आहे.

31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तात वाढ; पोलिसांकडून मुंबईत येणाऱ्या वाहनांची तपासणी
| Edited By: | Updated on: Dec 31, 2021 | 6:38 AM
Share

मुंबई : मुंबईमध्ये दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉनने देखील शहरात शिरकाव केला आहे. ओमिक्रॉनच्या प्रसाराचा वेग अधिक असल्याने मुंबई महापालिका आणि पोलीस प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. नववर्षाच्या स्वागत पार्ट्यांना प्रतिबंध घालण्यात आला असून, नागरिकांना गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मुंबईच्या वेशीवर रात्रीपासूनच मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला असून, मुलुंड टोलनाक्यावर पोलीस मुंबईत प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी करत आहेत.

ओमिक्रॉनच्या प्रादुर्भावाची भीती

नववर्षाचे स्वागत  करण्यासाठी अनेकजण मुंंबईमध्ये येत असतात. मात्र गेल्या दोन वर्षांपासून नववर्षाच्या सेलिब्रेशनवर कोरोनाचे सावट आहे. यंदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये काही प्रमाणात घट झाली होती. त्यामुळे कोरोना संकट टळल्याचे बोलले जात होते. कोरोनाचे रुग्ण कमी होत असतानाच आता पुन्हा एकदा ओमिक्रॉनने डोकेवर काढले आहे. ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नववर्षाच्या स्वागत पार्ट्यांवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच नववर्षाचे स्वागत घरी राहूनच करावे असे आवाहन मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून, प्रत्येक वाहनांची तपासणी सुरू आहे.

बाहेरून येणाऱ्या वाहनांची तपासणी

पोलीस बाहेरून मुंबईमध्ये येणाऱ्या प्रत्येक वाहनांची तपासणी करत आहेत. जे वाहनचालक कोरोना नियमांचे आणि वाहतुक नियमांचे उल्लंघन करत आहेत, त्यांच्यावर पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारण्यात  येत आहे. वाहनधारकांना मुंबईमध्ये येण्याचे कारण, तसेच वाहनाचे वैध कागदपत्रांची देखील पोलिसांकडून विचारणा होत आहे. नववर्षाच्या निमित्ताने मुंबईमध्ये अनेक जण येतात. सध्या राज्यात ओमिक्रॉनची साथ चालू आहे. ओमिक्रॉनच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी तसेच संभाव्य घातपात टाळण्यासाठी तपासणी मोहीम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सबंधित बातम्या

नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर शिवसैनिकांचा जल्लोष, पुन्हा फटाके फोडले

Breaking : आमदार नितेश राणेंना दिलासा नाहीच, जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारला, पुढे काय?

राणेंना नोटीस देणाऱ्या पोलिसांवरच FIR दाखल करा, अन्यथा आम्ही खटला दाखल करु-फडणवीस

Follow Us
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती
दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
Dahi Handi in Thane | रेकॉर्ड ब्रेक करा, पण... दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?