AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं महाराष्ट्रात येऊन दुही माजवण्याचं धाडस, त्याची ही आहेत कारणं

आजवरच्या सरकारकडून सीमाभागातील गावांकडे दुर्लक्ष झाले आहे. तसेच सीमाभागातील गावामधून कर्नाटक सरकारकडून आता वीज स्वस्तात दिली जात आहे.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं महाराष्ट्रात येऊन दुही माजवण्याचं धाडस, त्याची ही आहेत कारणं
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Dec 02, 2022 | 10:33 PM
Share

बेळगावः कर्नाटक सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी सांगली जिल्ह्यामधील 40 गावांवर दावा केल्यानंतर राजकाण प्रचंड ढवळून निघाले. सांगली जिल्ह्यातील 40 गावांमुळे आता सीमावादाच्या समस्या पुन्हा एकदा अधोरेखित झाल्या आहेत. सीमाभागातील गावांवर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दावा केल्यानंतर त्यांचे हे प्रचंड धाडस असल्याचे त्यांनी सांगितले. आणि हे असे धाडस मुख्यमंत्री बसवराज बोमई कसं काय करू शकतात असा सवालही उपस्थित होऊ लागला आहे. त्यामुळे आता सीमाभागातील गावांवर आता पुन्हा एकदा लक्ष गेले आहे.

एकीकडे बेळगावमध्ये कर्नाटक सरकारकडून अत्याचार करायचे आणि दुसरीकडे मात्र जत तालुक्यावर ढोंगी प्रेम दाखवायचं असा दुतोंडीपणा आता कर्नाटकचा उघड झाला आहे.

बेळगाव, निपाणी, कारवार, बिदर, भालकी आणि आता जतमध्ये कर्नाटक सरकार आपला दावा सांगत आहे. गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्र सरकारकडून सीमाभागातील गावांकडे दुर्लक्ष झालं आहे.

त्यामुळे महाराष्ट्रातील गावांना भुलवण्यासाठी कर्नाटक सरकार आता वेगवेगळ्या खेळी खेळत आहे हेही स्पष्टपणे दिसत आहे. यामुळेच कर्नाटक सरकार कुरघोडीची राजकारण करत असल्याचा ठपकाही ठेवला जातो आहे.

जतचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी म्हैसाळ योजना आखण्याती आली मात्र जतमधील काही भागात ती योजना पोहचली तर काही भागात ती योजना पोहचलीच नाही. त्यामुळेच जतमधील पश्चिम भागात असंतोष पसरला आहे.

कर्नाटक सरकारने सांगलीतील गावांवर दावा दाखल केल्यानंतर सांगलीच्या जिल्ह्याधिकाऱ्यांकडून आता जत परिसराची पाहणी करण्यात आली आहे.

महाराष्ट्र सरकारकडून या भागाकडे दुर्लक्ष होत असल्यानेच कर्नाटक सरकारकडून पाणी देण्याची नाटक केले जात आहे. त्यामुळे सीमाभागातील पाणी प्रश्नावरून त्यांना मुद्दामहून भडकावण्याची कामं कर्नाटक सरकार करत आहे.

आजवरच्या सरकारकडून सीमाभागातील गावांकडे दुर्लक्ष झाले आहे. तसेच सीमाभागातील गावामधून कर्नाटक सरकारकडून आता वीज स्वस्तात दिली जात आहे.

सीमाभागातील 21 गावांमध्ये मराठी शाळाच नाहीत, त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना मराठी शाळेसाठी पायपीठ करावी लागत आहे. या एक ना अनेक कारणांमुळे कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्रातील गावांवर दावा करण्याचं धाडस करत आहेत.

Follow Us
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेमकं काय म्हणाले?
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
Sanjay Raut | शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!
Shivsena Case Hearing | विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे गटाकडून सर्वात मोठी प्रतिक्रिया
2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?
मोठी बातमी! 2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी? कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा युक्तिवाद
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच... कोर्टात नेमकं काय घडलं?
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! खासगी अकॅडमी चालकाला अटक
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! सोलापुरातून खासगी अकॅडमी चालकाला अटक