AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं महाराष्ट्रात येऊन दुही माजवण्याचं धाडस, त्याची ही आहेत कारणं

आजवरच्या सरकारकडून सीमाभागातील गावांकडे दुर्लक्ष झाले आहे. तसेच सीमाभागातील गावामधून कर्नाटक सरकारकडून आता वीज स्वस्तात दिली जात आहे.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं महाराष्ट्रात येऊन दुही माजवण्याचं धाडस, त्याची ही आहेत कारणं
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Dec 02, 2022 | 10:33 PM
Share

बेळगावः कर्नाटक सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी सांगली जिल्ह्यामधील 40 गावांवर दावा केल्यानंतर राजकाण प्रचंड ढवळून निघाले. सांगली जिल्ह्यातील 40 गावांमुळे आता सीमावादाच्या समस्या पुन्हा एकदा अधोरेखित झाल्या आहेत. सीमाभागातील गावांवर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दावा केल्यानंतर त्यांचे हे प्रचंड धाडस असल्याचे त्यांनी सांगितले. आणि हे असे धाडस मुख्यमंत्री बसवराज बोमई कसं काय करू शकतात असा सवालही उपस्थित होऊ लागला आहे. त्यामुळे आता सीमाभागातील गावांवर आता पुन्हा एकदा लक्ष गेले आहे.

एकीकडे बेळगावमध्ये कर्नाटक सरकारकडून अत्याचार करायचे आणि दुसरीकडे मात्र जत तालुक्यावर ढोंगी प्रेम दाखवायचं असा दुतोंडीपणा आता कर्नाटकचा उघड झाला आहे.

बेळगाव, निपाणी, कारवार, बिदर, भालकी आणि आता जतमध्ये कर्नाटक सरकार आपला दावा सांगत आहे. गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्र सरकारकडून सीमाभागातील गावांकडे दुर्लक्ष झालं आहे.

त्यामुळे महाराष्ट्रातील गावांना भुलवण्यासाठी कर्नाटक सरकार आता वेगवेगळ्या खेळी खेळत आहे हेही स्पष्टपणे दिसत आहे. यामुळेच कर्नाटक सरकार कुरघोडीची राजकारण करत असल्याचा ठपकाही ठेवला जातो आहे.

जतचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी म्हैसाळ योजना आखण्याती आली मात्र जतमधील काही भागात ती योजना पोहचली तर काही भागात ती योजना पोहचलीच नाही. त्यामुळेच जतमधील पश्चिम भागात असंतोष पसरला आहे.

कर्नाटक सरकारने सांगलीतील गावांवर दावा दाखल केल्यानंतर सांगलीच्या जिल्ह्याधिकाऱ्यांकडून आता जत परिसराची पाहणी करण्यात आली आहे.

महाराष्ट्र सरकारकडून या भागाकडे दुर्लक्ष होत असल्यानेच कर्नाटक सरकारकडून पाणी देण्याची नाटक केले जात आहे. त्यामुळे सीमाभागातील पाणी प्रश्नावरून त्यांना मुद्दामहून भडकावण्याची कामं कर्नाटक सरकार करत आहे.

आजवरच्या सरकारकडून सीमाभागातील गावांकडे दुर्लक्ष झाले आहे. तसेच सीमाभागातील गावामधून कर्नाटक सरकारकडून आता वीज स्वस्तात दिली जात आहे.

सीमाभागातील 21 गावांमध्ये मराठी शाळाच नाहीत, त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना मराठी शाळेसाठी पायपीठ करावी लागत आहे. या एक ना अनेक कारणांमुळे कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्रातील गावांवर दावा करण्याचं धाडस करत आहेत.

Follow Us
ठाकरे नेतृत्वावर प्रश्न?; ते काही एवढे महान नाहीत म्हणत राऊतांचा संताप
Sanjay Raut EXCLUSIVE | ठाकरे नेतृत्वावर प्रश्न?; ते काही एवढे महान नाहीत म्हणत संजय राऊतांचा संताप
राजुल पाटील ठाकरेंसोबत, पण सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट; आम्ही...
Sushma Andhare | राजुल पाटील ठाकरेंसोबत, पण सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट; आम्ही भ्रमात नाही...
धाराशिवमध्ये शक्तीप्रदर्शन! ओमराजेंच्या निर्णयाने बदलणार राजकीय गणित
Omraje Nimbalkar | धाराशिवमध्ये शक्तीप्रदर्शन! ओमराजेंच्या एका निर्णयाने बदलणार राजकीय गणित, घडामोडींना वेग
गिरीश महाजनांचे व्हायरल केलेले फोटो एडिटेड असल्याचं स्पष्ट
Viral Photos | गिरीश महाजनांचे व्हायरल केलेले फोटो एडिटेड असल्याचं स्पष्ट
सरकार कंगाल झालंय का? जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट
Jayant Patil UNCUT | सरकार कंगाल झालंय का? जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट; भ्रष्टाचारावरून घणाघात!
एल निनो, दुष्काळ आणि लाडकी बहीण... जाधवांनी अधिवेशनाआधीच सरकारला घेरलं
Bhaskar Jadhav UNCUT | एल निनो, दुष्काळ आणि लाडकी बहीण...भास्कर जाधवांनी अधिवेशनाआधीच फडणवीस सरकारला घेरलं!
चहा नको, उत्तर द्या! मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला MVAचा ठेंगा
Bhaskar Jadhav । चहा नको, उत्तर द्या! मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला MVAचा ठेंगा; भास्कर जाधवांचा सरकारवर थेट हल्लाबोल
वडील बंडखोर, पण मुलगी ठाकरेंसोबत! राजुल पाटील थेट मातोश्रीवर....
मोठी बातमी! वडील बंडखोर, पण मुलगी ठाकरेंसोबत! राजुल पाटील थेट मातोश्रीवर, भूमिका स्पष्ट करत म्हणाल्या....
मोठी घडामोड! ओमराजेंचा उद्धव ठाकरेंना निरोप; सोमवारी मातोश्रीवर होणार
मोठी घडामोड! ओमराजेंचा उद्धव ठाकरेंना निरोप; सोमवारी मातोश्रीवर होणार निर्णायक भेट
ओमराजेंच्या निर्णयावर 5 खासदारांचे भविष्य, तर ठाकरे गटाची मनधरणी सुरूच
Omraje Nimbalkar | ओमराजेंच्या एका निर्णयावर 5 खासदारांचे भविष्य, रोखण्यासाठी ठाकरे गटाची मनधरणी सुरूच