AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“जातीय तणाव वाढला, राज्यात कायदा-सुव्यस्थेचाही प्रश्न”; विरोधी पक्षनेत्यांना चिंता, थेट राज्यपालांनाच पत्र

या घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी समिती नेमून दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्याची मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे.

जातीय तणाव वाढला, राज्यात कायदा-सुव्यस्थेचाही प्रश्न; विरोधी पक्षनेत्यांना चिंता, थेट राज्यपालांनाच पत्र
| Updated on: Jun 15, 2023 | 7:36 PM
Share

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कोणत्या ना कोणत्या कारणामुळे राज्यातील सामाजिक वातावरण बिघडत चालल्याने विरोधकांकडून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. संत परंपरा लाभलेल्या अठरा पगड जातीच्या महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून धर्मांध प्रवृत्तीच्या काही समाज कंटकांकडून खतपाणी घालून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडत असल्याने या प्रकरणात लक्ष घालून या सर्व घटनांची उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्याची मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्यपाल यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारव टीका करताना म्हटले आहे की, हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा,संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आहे. त्यामुळे येथील सर्वधर्मीय समाज गुण्यागोविंदाने राहत आहे.

असामाजिक प्रवृत्तींकडून अपप्रचार

परंतु राज्यात गेल्या काही महिन्यांपासून व गेल्या आठवड्याभरात सतत काही असामाजिक प्रवृत्तींकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार करून दंगली घडविण्याचे प्रकार सुरू आहेत. राज्यात दररोज एका शहरात दंगल घडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे राज्यात अशांतता पसरविण्याचे काम काही लोकांकडून सुरू आहे. राज्यातील दंगलसदृश्य परिस्थिती सध्या वेगळी परिस्थिती आहे. तर राज्याचे राज्यपाल म्हणून आपण या गंभीर विषयाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे दानवे यांनी पत्राद्वारे सांगितले आहे.

जातीय सलोख्याची गरज

राज्यात जातीय सलोख्याची गरज असून गेल्या अडीच ते तीन महिन्यांत राज्याच्या विविध भागात 8 घटनाहून अधिक जातीय तणाव आणि हिंसाचाराचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे काही ठिकाणी अचानक औरंगजेबाचे फोटो ठेवून उदात्तीकरण केले गेले आणि त्यातूनही जातीय तणाव वाढल्याची टीका अंबादास दानवे यांनी केली आहे.

उच्चस्तरीय चौकशी समिती नेमा

राज्यात पोलीस यंत्रणा असली तरी या अशा प्रकारच्या घटना रोखण्यात सरकारला अपयश येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.त्यामुळे या घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी समिती नेमून दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्याची मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे.

Follow Us
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच..
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच...
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात.
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा.
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना.
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना..
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन.
अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समो
अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समो.
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान.
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले.
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला...
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला....
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण...
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण....