AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC Election | मुंबई महापालिका निवडणुकीची आरक्षण सोडत येत्या मंगळवारी, 13 जूनला अंतिम आरक्षण होणार निश्चित

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 31 मे रोजी प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर नागरिकांना सहा जूनपर्यंत हरकती आणि सूचना मांडता येतील. 13 जून रोजी अंतिम आरक्षण सोडत जाहीर करण्यात येणार आहे.

BMC Election | मुंबई महापालिका निवडणुकीची आरक्षण सोडत येत्या मंगळवारी, 13 जूनला अंतिम आरक्षण होणार निश्चित
मुंबई महापालिका Image Credit source: twitter
| Updated on: May 28, 2022 | 6:55 AM
Share

मुंबई : राज्यातील महापालिका निवडणुका (Municipal elections) लांबवल्या होत्या. मात्र सर्वोच्च न्यायालयाकडून (Supreme Court) दोन आठवड्यांत महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला चार मे रोजी देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने 14 महापालिकांना 31 मेपर्यंत प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मुंबई महापालिका निवडणुकीसाठी (Mumbai Municipal Election) मंगळवारी 31 मे रोजी प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत जाहीर होणार आहे. वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात सकाळी अकरा वाजता आरक्षणाची सोडत जाहीर केली जाणार असल्याचे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले. या सोडत प्रक्रियेवर सहा जूनपर्यंत सूचना आणि हरकती मांडता येणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाकडून वाढवण्यात आलेल्या नऊ प्रभागांवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याने आता वार्डाची संख्या वाढली आहे.

236 प्रभागांसाठी आरक्षणाची सोडत

यंदा राज्य निवडणूक आयोगाने वाढवलेल्या नऊ प्रभागांवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याने वार्डाची संख्या वाढली आहे. पूर्वी एकूण 227 वार्ड होते. आता त्यात आणखी नऊ वार्डांची भर पडल्याने वार्डाची एकूण संख्या 236 वर गेली आहे. त्यामुळे वाढीव नऊ प्रभागांचे आरक्षणही यावेळी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महिलांना पन्नास टक्के आरक्षण असते. त्यामुळे आरक्षणाचे सर्व निकष लक्षात घेऊन येत्या 31 मार्चला आरक्षण सोडत जाहीर केली जाणार आहे. वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात 31 मे रोजी सकाळी अकरा वाजता ही आरक्षण सोडत जाहीर करण्यात येईल.

25 ठिकाणी हरकती नोंदवण्याची व्यवस्था

निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मुंबई महापालिका निवडणुकीसाठी येत्या 31 मे रोजी आरक्षणाची सोडत जाहीर केली जाईल. प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत जाहीर झाल्यानंतर नागरिकांना सहा जूनपर्यंत सूचना आणि हरकती मांडण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. महापालिकेच्या 24 प्रभागांमध्ये 25 ठिकाणी हरकती व सूचना नोंदवण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. संबंधित ठिकाणी जाऊन नागरिकांना आपल्या हरकती व सूचना नोंदवता येतील. त्यानंतर 13 जून रोजी अंतिम आरक्षण सोडत जाहीर करण्यात येणार आहे.

Follow Us
अजित पवार अपघात प्रकरण, कॅप्टनची बदली का झाली?, फडणवीसांनी सांगितलं...
अजित पवार अपघात प्रकरण, कॅप्टनची बदली का झाली?, फडणवीसांनी सांगितलं....
मुख्यमंत्री फडणवीस यांचे अशोक खरातबाबत कठोर वक्तव्य
मुख्यमंत्री फडणवीस यांचे अशोक खरातबाबत कठोर वक्तव्य.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं निवडणूक आयोगाला पत्र
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं निवडणूक आयोगाला पत्र.
चंद्रकांत पाटील यांचे अशोक खरातसोबत जवळचे संबंध?
चंद्रकांत पाटील यांचे अशोक खरातसोबत जवळचे संबंध?.
अशोक खरातबाबत आणखी एक मोठा खुलासा, ईशान्येश्वर मंदिरासाठी दीड कोटीचा..
अशोक खरातबाबत आणखी एक मोठा खुलासा, ईशान्येश्वर मंदिरासाठी दीड कोटीचा...
महाराष्ट्रात पेट्रोल टंचाई, भंडाऱ्यात लांबच लांब रांगा
महाराष्ट्रात पेट्रोल टंचाई, भंडाऱ्यात लांबच लांब रांगा.
रुपाली चाकणकर यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी
रुपाली चाकणकर यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी.
अशोक खरात प्रकरणावर माजी मंत्री केसरकरांची प्रतिक्रिया
अशोक खरात प्रकरणावर माजी मंत्री केसरकरांची प्रतिक्रिया.
खरात प्रकरणी रुपाली चाकणकर आणि दीपक केसरकर यांची पोलिसांकडून चौकशी?
खरात प्रकरणी रुपाली चाकणकर आणि दीपक केसरकर यांची पोलिसांकडून चौकशी?.
अजितदादांची ताकद... रोहित पवार यांच्या संशयाने खळबळ
अजितदादांची ताकद... रोहित पवार यांच्या संशयाने खळबळ.