AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘हा निवडणूक आयोगाचा अतिशय नीच खेळ’, उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप

"हा निवडणूकन आयोगाच्या माध्यमातून खेळला जात असणारा अतिशय नीच घाणेरडा खेळ आहे. निवडणूक आयोग ही भाजपची चाकरी करतं की काय? असं म्हणायला जरुर वाव आहे", अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

'हा निवडणूक आयोगाचा अतिशय नीच खेळ', उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप
उद्धव ठाकरे
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: May 20, 2024 | 5:58 PM
Share

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. महाराष्ट्रात लोकसभेच्या पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी मतदान पार पडत आहे. या टप्प्यात काही मतदानकेंद्रांवर निवडणूक प्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांकडून दिरंगाई केली जात असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. याच मुद्द्यावरुन उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे. “जिथे आम्हाला मतदान अधिक होतं तिथे आम्हाला तक्रारी येत आहेत. आम्ही वस्तींचे नावं उद्या पत्रकार परिषदेत जाहीर करु”, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

“नावं वगळली जाणं हा त्यांचा आवडता खेळ आहे. काही काही ठिकाणी बोगस घुसवली आहेत, असंही कळलं आहे. पण त्यावर मी आता काही बोलणं योग्य नाही. तूर्त आता जो विलंब लावला जातोय, तुमचं नाव काय, आयडी, तुमच्या भावाचं नाव काय, असं विचारुन विलंब लावला जातोय. तुम्ही मतदान घेता तेव्हा फोन आणू नका, असं सांगाना. फोन आणू नये सांगितलं असेल तरी आतमध्ये जो विलंब लावला जातोय त्याला क्षमा करता येणार नाही. मला तर आता स्पष्ट दिसतंय की, हा निवडणूकन आयोगाच्या माध्यमातून खेळला जात असणारा अतिशय नीच घाणेरडा खेळ आहे. निवडणूक आयोग ही भाजपची चाकरी करतं की काय? असं म्हणायला जरुर वाव आहे”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

“जिथे आम्हाला मतं पडत आहेत तिथे हा विलंब लावला जातोय. ही अशी मतदान केंद्र आणि त्यामध्ये असणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्यांची आणि प्रतिनिधींची नावे आणा. मी त्यांची नावे उद्या जाहीर करेन. तसेच त्याविरोधात आम्ही कोर्टात जाऊ”, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिलाय.

उद्धव ठाकरे यांचं नागरिकांना आवाहन

“मी नागरिकांना आवाहन करतोय, हा मोदी सरकारचा जो डाव आहे की, तुम्ही मतदानाला उतरु नये, त्यांच्या विरोधातील मतदान कमी कसं होईल ते बघत आहेत. त्या डावाला बळी न पडता तुम्ही मतदान केंद्रामध्ये जावून उभे राहा. मतदान केल्याशिवाय मतदानकेंद्र बंद होत नाहीत. त्यामुळे पहाटे पाच वाजले तरी मतदानाचा हक्क बजावा. ज्या ठिकाणी निवडणूक अधिकारी, प्रतिनिधी विलंब लावत आहेत, कारण नसताना तुम्हाला छळत आहेत, तुमची आयडी, नावे, ओळखपत्र यावरुन वेळ लावत आहेत, तुमचं मतदान केल्याशिवाय त्यांना मतदान केंद्राच्या बाहेर पडू देऊ नका”, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

“काही ठिकाणी मतदान यादीत नावे नाहीयत. हे सर्व लोकं पराभावाच्या भीतीने पछाडलेले लोकं आहेत. मोदी सरकार पराभवाच्या भीतीने पछाडलेलं आहे. लोकांना करुद्या ना मतदान. मला सुद्धा मेसेज आला आहे की, मतदान करा. एवढं सगळं होऊन लोकं उत्साहात मतदानाला उतरले आहेत. पण आता त्यांना त्रास होतोय. ऊन उतरलेलं आहे. सकाळी जे कंटाळून गेले आहेत त्यांनी पुन्हा मतदानाला जावं. तुमचा मतदानाचा अधिकार बजावा”, असंदेखील आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

Follow Us
ठाकरे गटाला पुन्हा मोठा दणका! विश्वासू नेत्यासह... राज्यातील राजकारणात
ठाकरे गटाला पुन्हा मोठा दणका! विश्वासू नेत्यासह... राज्यातील राजकारणात मोठी खळबळ
शिंदेंच्या सेनेत जाण्याआधीच सचिन अहिरांची पहिली प्रतिक्रिया
Sachin Ahir | मी गेल्याशिवाय कळणार नाही...शिंदेंच्या सेनेत जाण्याआधीच सचिन अहिरांची पहिली प्रतिक्रिया
मोठी बातमी! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला? श्रीकांत शिंदे
मोठी बातमी! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला? श्रीकांत शिंदेंसह ओमराजेदेखील... राजकारणातील हालचाली वाढल्या
आजपासून लागू झाले 11 नियम! बँक, ITR, HSRP...अपडेट्स एका क्लिकमध्ये
New Rules | आजपासून लागू झाले 11 मोठे नियम! बँक, ITR, पासपोर्ट, HSRP ते LPG... सर्व अपडेट्स एका क्लिकमध्ये
सचिन अहिरांबाबत मोठी अपडेट समोर; शिंदेंच्या शिवसेनेतून उपसभापती पदाचा
सचिन अहिरांबाबत मोठी अपडेट समोर; शिंदेंच्या शिवसेनेतून उपसभापती पदाचा अर्ज दाखल करताच, सरकारने थेट....
सर्व काही दिलं... तरी पक्ष सोडला! अहिरांवर राऊतांचा संताप
Sanjay Raut Full Press | सर्व काही दिलं... तरी पक्ष सोडला! विश्वासाला तडा देणाऱ्यांना जनता ओळखते; अहिरांवर राऊतांचा संताप
महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना दिलासा! इराण-अमेरिकेतील
महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना दिलासा! इराण-अमेरिकेतील कराराचा भारतीयांना थेट फायदा; आता पेट्रोल...
“मी आधीच चार खून केलेत, पुढचा नंबर...” मुंबई लोकलमध्ये सनकी व्यक्तीचा
“मी आधीच चार खून केलेत, पुढचा नंबर...” मुंबई लोकलमध्ये सनकी व्यक्तीचा धिंगाणा; मद्यधुंद अवस्थेत... पुढे भयंकर घडलं?
शरद पवारांचे झाले नाहीत, आमचे काय होणार?; राऊतांचा अहिरांवर घणाघात
Sanjay Raut | शरद पवारांचे झाले नाहीत, आमचे काय होणार?; राजकीय प्रवास कलंकित, राऊतांचा सचिन अहिरांवर घणाघात
नाशिक भक्तिरसात न्हालं; संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं जल्लोषात
Nashik | हरी मुखे म्हणा! नाशिक भक्तिरसात न्हालं; संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं जल्लोषात स्वागत