AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra MLC Election: पहिलं मत सचिन अहिरांना, दुसरं मत…?, आघाडीचं मतदानाचं सूत्रं ठरलं?; शिवसेनेची नाराजी दूर होणार?

Maharashtra MLC Election: राज्यसभा निवडणुकीची विधान परिषद निवडणुकीत पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आघाडीने मतदानाचं सूत्रं ठरवलं आहे. या सूत्रानुसार शिवसेनेचे सचिन अहिर यांना पहिल्या पसंतीचं मतदान केलं जाणार आहे. त्यानंतर रामराजे नाईक निंबाळकर यांना दुसऱ्या पसंतीचं मत टाकण्यात येणार आहे.

Maharashtra MLC Election: पहिलं मत सचिन अहिरांना, दुसरं मत...?, आघाडीचं मतदानाचं सूत्रं ठरलं?; शिवसेनेची नाराजी दूर होणार?
पहिलं मत सचिन अहिरांना, दुसरं मत...?, आघाडीचं मतदानाचं सूत्रं ठरलं?Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 19, 2022 | 11:51 AM
Share

मुंबई: विधान परिषदेची निवडणूक  (Maharashtra MLC Election) उद्या होत आहे. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि भाजपने (bjp) जोरदार तयारी केली आहे. निवडणुकीत कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून ही तयारी करण्यात आली आहे. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला होता. या पराभवाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आघाडीच्या (maha vikas aghadi) नेत्यांनी मोर्चेबांधणी केली आहे. शिवसेनेची नाराजी दूर करण्याचाही या माध्यमातून प्रयत्न केला जात आहे. तसेच आघाडीने उद्या होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचं सूत्रंही ठरवल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे आघाडीने ठरवलेल्या सूत्रानुसार मतदान झाल्यास आघाडीचे सर्वच्या सर्व उमेदवार विजयी होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच आघाडीच्या नेत्यांची आज बैठक होणार आहे. या बैठकीत पुन्हा एकदा रणनीतीवर चर्चा केली जाणार आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार उपस्थित राहणार नाहीत. मात्र, त्यांचं मार्गदर्शन आघाडीच्या नेत्यांना राहणार असल्याचं सांगण्यात येतं.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यसभा निवडणुकीची विधान परिषद निवडणुकीत पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आघाडीने मतदानाचं सूत्रं ठरवलं आहे. या सूत्रानुसार शिवसेनेचे सचिन अहिर यांना पहिल्या पसंतीचं मतदान केलं जाणार आहे. त्यानंतर रामराजे नाईक निंबाळकर यांना दुसऱ्या पसंतीचं मत टाकण्यात येणार आहे. तर आमशा पाडवी यांनी सातव्या पसंतीचं मत देण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे पहिल्या पसंतीची मते मिळवून सचिन अहिर हे विजयी होणार असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. तर, राष्ट्रवादीने एकनाथ खडसे यांच्या ऐवजी निंबाळकर यांना दुसऱ्या पसंतीचं मतदान करण्याचा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. आकडेवारीनुसार एकनाथ खडसे यांचा विजय सोपा मानला जात आहे. मात्र, भाजपच्या रडारवर खडसे असल्याचं सांगण्यात येत असल्याने राष्ट्रवादीने खडसें ऐवजी निंबाळकर यांना दुसऱ्या पसंतीचं मत देण्याचा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

काँग्रेसचा मुख्यमंत्र्यांवर दबाव

दरम्यान, काँग्रेसने भाई जगताप यांच्यासाठी मतांची जुळवाजुळव सुरू केली आहे. शिवसेनेकडे अतिरिक्त चार मते आहेत. ही मते आपल्याकडे वळवण्यासाठी काँग्रेसने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव वाढवला आहे. ही चार मते गेम चेंजर ठरू शकतात, त्यामुळे काँग्रेसने हा दबाव वाढवला आहे. त्यासाठी काँग्रेसच्या जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसेनेच्या आमदारांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर ते या चार अतिरिक्त मतांबाबत निर्णय घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादीला मत का द्यायचं?

दरम्यान, शिवसेनेच्या आमदारांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मतदान करण्याबाबतची ताठर भूमिका घेतली आहे. राज्यसभा निवडणुकीत आमच्या उमेदवारांना मतदान केलं नाही. मग काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मतदान का करायचं? असा सवाल शिवसेनेच्या आमदारांनी केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोरच पेच निर्माण झाला आहे.

Follow Us
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार...
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार....
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल.
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत.