AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात 2 लाख कोटींची नवी गुंतवणूक होतेय, 3 लाख तरुणांना रोजगार मिळणार; सुभाष देसाईंची ‘टीव्ही9 मराठी’च्या कन्क्लेव्हमध्ये घोषणा

महाराष्ट्र 2025 मध्ये महाराष्ट्र संपन्न आणि समृद्ध असेल. गेल्या दोन वर्षात महाविकास आघाडीने (mahavikas aghadi) केलेल्या प्रयत्नांची फळे दिसून येतील. कोरोनामुळे बराच काळ वाया गेला. पण आम्ही हातावर हात ठेवून बसलो नाही. आम्ही परदेशी आणि देशातील उद्योजकांसोबत करार केले.

राज्यात 2 लाख कोटींची नवी गुंतवणूक होतेय, 3 लाख तरुणांना रोजगार मिळणार; सुभाष देसाईंची 'टीव्ही9 मराठी'च्या कन्क्लेव्हमध्ये घोषणा
subhash desaiImage Credit source: tv9
| Updated on: Feb 22, 2022 | 12:53 PM
Share

मुंबई: महाराष्ट्र 2025 मध्ये महाराष्ट्र संपन्न आणि समृद्ध असेल. गेल्या दोन वर्षात महाविकास आघाडीने (mahavikas aghadi) केलेल्या प्रयत्नांची फळे दिसून येतील. कोरोनामुळे बराच काळ वाया गेला. पण आम्ही हातावर हात ठेवून बसलो नाही. आम्ही परदेशी आणि देशातील उद्योजकांसोबत करार केले. 2 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यात येत आहे. प्रकल्प येणार याची खात्री करूनच आम्ही करारावर सह्या केल्या आहेत. या प्रचंड मोठ्या गुंतवणुकीमुळे राज्याचं अर्थकारण वाढेल. तीन लाख तरुण तरुणीला रोजगार मिळणार आहे. रोजगार निर्मिती होते हे महत्त्वाचं आहे. नव्या गुंतवणुकीमुळे हे शक्य होणार आहे, असं राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई (subhash desai) यांनी सांगितलं. टीव्ही9 मराठीच्या महा इन्फ्रा कन्क्लेव्हमध्ये (MahaInfra Conclave) सुभाष देसाई यांनी ही घोषणा केली.

कोणत्याही राज्यात उद्योजक येत असताना ते संपूर्ण परिस्थितीची पाहणी करत असतात. सोयी सुविधा आहेत का? याची माहिती घेत असतो. गुंतवणूकदाराचं मनोधैर्य त्यामुळे वाढतं. बंदर किती जवळ आहे, रेल्वे, रस्ते वाहतुकीचं जाळं आहे की नाही हे पाहून मोठे निर्णय घेतले जातात. महाराष्ट्रात या सर्व गोष्टी आहेत. त्यामुळे हे करार झाले आहेत. आम्ही उद्योगाची काही क्षेत्रे निवडली आहेत. आम्ही ती विकसीत कसे करता येईल हे पाहत होतो. औरंगाबादमध्ये आम्ही औद्योगिक नगरी तयार केली आहे. परदेशातील व्यावसायिकांना दाखवू शकतो अशी ही नागरी असल्याचं नीती आयोगानेही म्हटलं आहे, असं सुभाष देसाई यांनी सांगितलं.

नवी मुंबईत जेम्स ज्वेलरी पार्क

नवी मुंबईत जेम्स ज्वेलरी पार्क उभे करण्यात येत आहे. जागतिक दर्जाचं हे जेम्स ज्वेलरी पार्क असेल. त्यामुळे दीड लाख कर्मचाऱ्यांना काम मिळणार आहे, असं त्यांनी सांगितलं.

राज्यात डेटा सेंटरचं नवं धोरण आणणार

राज्यात डेटा सेंटरसाठी लवचिक आणि नवं धोरण आणलं आहे. अनेक कंपन्यांनी त्यात रसही दाखवला आहे. देशातील आणि परदेशातील किरकोळ व्यापाऱ्यातील मोठ्या उद्योगांनी त्यात गुंतवणूक करायचं ठरवलं आहे. भारत सरकारने भारतातील माहिती भारतात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे परदेशी कंपन्यांना इथे गुंतवणूक करणं भाग झालं आहे. त्यामुळे आम्ही या कंपन्यांना वीज आणि पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे, असं त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

Maharashtra News Live Update : मुंबई समृद्धी महामार्ग वर्षभरात होणार सुरू; शेतकऱ्यांच्या घरी कशी आली समृद्धी, कसा आहे प्रकल्प?.

मानलेल्या आईच्या सांगण्यावरुन बायकोला मारहाण, राष्ट्रवादीच्या बीड महिला जिल्हाध्यक्षावर गुन्हा

नाशिक-पुणे रेल्वेसाठी 31 मार्चपर्यंत जमीन मूल्यांकन; उपमुख्यंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना काय दिले आदेश?

Follow Us
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात.
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?.
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.