AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निवडणुकीची रणधुमाळी : मविआ आणि महायुतीची आज पहिली यादी येणार; ‘स्वराज्य’ च्या भूमिकेकडेही लक्ष

Mahavikas Aghadi Mahayuti Candidate First List Update : काल राज्याची विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे कोणत्या मतदारसंघात कुणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. पहिल्या यादीबाबतचे अपडेट्स, वाचा सविस्तर...

निवडणुकीची रणधुमाळी : मविआ आणि महायुतीची आज पहिली यादी येणार; 'स्वराज्य' च्या भूमिकेकडेही लक्ष
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Oct 16, 2024 | 9:23 AM
Share

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. निवडणूक आयोगाने काल याबाबतची घोषणा केली. 20 नोव्हेंबर ला मतदान होईल. 23 नोव्हेंबरला निकाल लागेल. त्यामुळे आता सगळेच पक्ष तयारीने निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आज महायुतीची आणि महाविकास आघाडीची पहिली उमेदवार यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. तसंच ‘स्वराज्य’ पक्षाची आज पत्रकार परिषद होणार आहे. संभाजीराजे छत्रपती माध्यमांशी संवाद साधणार आहेत. संभाजीराजे छत्रपती यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

महायुतीची पहिली यादी आज?

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या घडामोडींना वेग आला आहे. आज महायुतीची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत महायुतीचा निवडणुकीचा फॉर्म्युला जाहीर केला जाणार आहे. तसंच उमेदवारांच्या पहिल्या यादीबाबतच लोकांमध्ये उत्सुकता आहे. काल दुपारीच महायुतीची पत्रकार परिषद होती. यातच पहिली यादी जाहीर केली जाणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र ती पुढे ढकलण्यात आली. आता आज सकाळी 11 वाजता महायुतीची पत्रकार परिषद होणार आहे. यात उमेदवारांची पहिली यादी जाहीर होते का? हे पाहावं लागेल.

मविआचं आज जागावाटप?

महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर होणार आहे, अशी माहिती आहे. तिन्ही पक्ष मिळून हे जागावाटप जाहीर करण्याची शक्यता आहे. तसंच उमेदवारांची पहिली यादी देखील आज येणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे या पहिल्या यादीत कुणाची वर्णी लागणार? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

निवडणूक जाहीर होताच आता घडामोडींना वेग आलाय. राज्यात तिसरी आघाडी उभी राहणार असल्याचं बोललं जात आहे. बच्चू कडू, राजू शेट्टी आणि संभाजीराजे छत्रपती यांनी तिसरी आघाडी केली आहे. निवडणुकीत या तिसऱ्या आघाडीची भूमिका काय असेल? याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. अशातच आता महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती हे थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत. नाशिकमध्ये सकाळी ९.३० वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत संभाजीराजे छत्रपती काय भूमिका मांडणार? याकडे सर्वांचंच लक्ष आहे.

Follow Us
भाजप शिवसेनेत पडद्याआड मोठा संघर्ष! तिरंगा रॅलीतील 'त्या' व्हिडीओने...
मोठी बातमी! भाजप-शिवसेनेत पडद्याआड मोठा संघर्ष! तिरंगा रॅलीतील 'त्या' व्हिडीओने चर्चांना उधाण
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत..
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत सुचक विधान, थेट म्हणाले...
नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला...
Video | नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला, असं काय घडलं की...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट... धारशिवमध्ये राजकीय समीकरण पुन्हा बदलणार?
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता..
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता अगामी मोर्च्यावर
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत..
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत बड्या मंत्र्याचं मोठं विधान
पुन्हा ठाकरेंचे आमदार...फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या सोहळ्यात
पुन्हा ठाकरेंच्या आमदारांची चर्चा! फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या कार्यक्रमात ठाकरेंच्या आमदाराची हजेरी
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... मोठी खळबळ
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... शिवसेना निकालाआधीच बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचे पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर...
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचं पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण, अखेर म्हणाले...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिन...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिनाच्या भाषणादरम्यान CM नेमकं काय म्हणाले?