AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खारघर मृत्यू प्रकरणात उच्च न्यायालयात जनहित याचिका, सरळ मुख्यमंत्र्यांवर कारवाईची मागणी

maharashtra bhushan award kharghar : महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर झालेल्या दुर्घटनेबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेत सरळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यांवर कारवाईची मागणी केलीय.

खारघर मृत्यू प्रकरणात उच्च न्यायालयात जनहित याचिका, सरळ मुख्यमंत्र्यांवर कारवाईची मागणी
Bombay high Court and Eknath ShindeImage Credit source: tv9 network
| Updated on: Apr 27, 2023 | 12:16 PM
Share

ब्रिजभान जैसवार, नवी मुंबई : खारघरमधील महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण प्रसंगी घडलेल्या दुर्घटनेबाबत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केलीय. तसेच महाराष्ट्र भूषण सोहळ्यासाठी खर्च केलेले 14 कोटी रुपये आयोजकांकडून वसूल करण्याची मागणी केली आहे. राजकीय फायद्यासाठी 10 लाख लोकांना कार्यक्रमासाठी बोलावण्यात आल्याचा दावा याचिकेत केलाय. विरारच्या सामाजिक कार्यकर्त्या शैला कंठे यांनी वकील नितीन सातपुते यांच्यामार्फत ही जनहित याचिका दाखल केली. त्यावर गुरुवारी सुनावणी झाली.

काय आहे प्रकरण

डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचा कार्यक्रम नवी मुंबईत झाला होता. या कार्यक्रमानंतर अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला. त्यात 14 लोकांचा मृत्यू झाला असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले. परंतु मृत्यूचा आकडा जास्त आहे, असा आरोप विरोधकांकडून सातत्याने सरकारवर केला जात आहे. यामुळेच हे प्रकरण उच्च न्यायालयात पोहचले आहे.

काय केली मागणी

विरारच्या सामाजिक कार्यकर्त्या शैला कंठे यांनी वकील नितीन सातपुते यांच्यामार्फत ही जनहित याचिका दाखल केली. त्यात त्यांनी विविध मागण्या केल्या आहेत. सदर घटनेत 14 जणांच्या मृत्यूला जबाबदार धरत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह महाराष्ट्र भूषण अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यांवर फौजदारी कारवाईची मागणी याचिकेत करण्यात आली आहे . राजकीय फायद्यासाठीच कडक उन्हात इतका भव्य कार्यक्रम केल्याचा याचिकेत आरोप केला आहे. तसेच कार्यक्रमावर झालेला खर्च आयोजकांकडून वसूल करण्याची मागणी केली आहे.

खारघर प्रकरणात मृतांचा आकडा लपवला जात असल्याचा आरोप करत प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. व्हीव्हीआयपी पाहुणे वातानुकुलीत मंडपात जेवले तर लोकांना उन्हात मरण्यासाठी सोडून दिल्याचा आरोप याचिकेतून करण्यात आला आहे .

काय म्हटले न्यायालयाने

उच्च न्यायालयात या जनहित याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली. परंतु तातडीच्या सुनावणीस हायकोर्टाने नकार दिला आहे. आता या याचिकेवर 8 जूनला सुनावणी होणार आहे. यामुळे आता 8 जूनला याचिकेवर काय निर्णय होणार? याकडे लक्ष लागले आहे.

Follow Us
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?.
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह...
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी.
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला.
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?.
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?.
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप.
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?.
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले.
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा.