खारघर प्रकरणावरुन संजय राऊत आक्रमक, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली मोठी मागणी, रोख कुणावर?

खारघर प्रकरणी आत्तापर्यन्त चौदा जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले असून त्यावरून संजय राऊत यांनी सरकारवर हल्लाबोल करत मोठी मागणी केली आहे.

खारघर प्रकरणावरुन संजय राऊत आक्रमक, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली मोठी मागणी, रोख कुणावर?
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Apr 19, 2023 | 10:34 AM

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मोठी मागणी केली आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस विरोधात असते तर काय केलं असतं हे सांगत संजय राऊत यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. खारघर प्रकरणात मृत्यूचे आकडे लपविले जात आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दबाव टाकला असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. यामध्ये आत्तापर्यन्त 14 जणांचा मृत्यू झाला असला तरी हा आकडा 20 पर्यन्त जाण्याची भीती व्यक्त केली जात असल्याचे संजय राऊत यांनी म्हंटलं आहे. संजय राऊत यांनी खारघर प्रकरणात उष्माघात हे कारण नसून सरकारने केलेले ढिसाळ नियोजन आहे. सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.

खारघर येथे आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र सरकारच्या वतीने दिला जाणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये लाखो श्री सदस्यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यामध्ये उष्माघातामुळे आत्तापर्यन्त चौदा जणांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्र शासन आणि श्री सदस्यांच्या समितीच्या माध्यमातून ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये कडक्याच्या उन्हात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला असून विरोधकांनी यावरून हल्लाबोल केला आहे.

हे सुद्धा वाचा

संपूर्ण महाराष्ट्रातील श्री सदस्य त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. सायंकाळच्या वेळेला खारघर येथील कार्यक्रमात उष्माघाताने मृत्यू झाल्याचे समोर आले होते. त्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी करत मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर करत इतरांवर मोफत उपचार केले जाईल अशी घोषणा केली होती.

तर त्यानंतर रात्री उशिरा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही रुग्णालयात जाऊन उपचार घेणाऱ्या श्री सदस्यांची भेट घेतली होती. त्यानंतर विरोधकांनी थेट अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधत टीका केली होती. नंतर राज ठाकरे यांनी दुसऱ्या दिवशी भेट दिली होती.

राज ठाकरे म्हणाले हा कार्यक्रम दुपारी घेण्याऐवजी संध्याकाळी घेता आला असता. कडक्याच्या उन्हात हा कार्यक्रम झाल्याने आत्तापर्यन्त चौदा जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये आकडे लपविण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केली आहे.

यावरून संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजीनामा देवेंद्र फडणवीस यांनी मागायला हवा. सांस्कृतिक मंत्री यांचाही राजीनामा घ्या म्हणत सरकारवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी केली होती. यावेळी देवेंद्र फडणवीस विरोधात असते तर त्यांनी हीच मागणी केली असती असेही राऊत यांनी म्हंटलं आहे.

Non Stop LIVE Update
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य.
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ.
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या...
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या....
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका.
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.