AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BIG BREAKING : अखेर जतमधील 40 गावं ‘सुजलाम सुफलाम’ होणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सर्वात मोठी घोषणा

कर्नाटक सरकारने जतमध्ये पाणी सोडून महाराष्ट्राला डिवचल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केलीय.

BIG BREAKING : अखेर जतमधील 40 गावं 'सुजलाम सुफलाम' होणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सर्वात मोठी घोषणा
Image Credit source: tv9 marathi
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Dec 01, 2022 | 10:47 PM
Share

सांगली : कर्नाटक सरकारने जत तालुक्यातील दुष्काळी भागात पाणी सोडल्याने महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे कर्नाटक सरकारने पाणी सोडून महाराष्ट्राला डिवचलं आहे. कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातील काही भागांवर दावा केलाय. त्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरुन पुन्हा एकदा राजकारण तापलं आहे. विशेष म्हणजे कर्नाटक सरकारने जतमध्ये पाणी सोडून महाराष्ट्राला डिवचल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केलीय. जतमधील पाणी प्रश्न सोडण्यासाठी तब्बल 2 हजार कोटींचं टेंडर काढणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलीय.

जतमधील पाण्याचा प्रश्न सोडण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत असल्याचं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. जतमधील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी जानेवारी महिन्यात 2 हजार कोटींचं टेंडर काढणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: दिलीय.

“रात्री दीड वाजता जतमधील लोकं आली होती. साडेबारा ते एक वाजेच्या सुमारास आले. मी रात्री दीड वाजता पोहोचलो. त्यांनी देखील नकाशावर काही गोष्टी सांगितल्या. आम्ही त्यांच्यासाठी 2 हजार कोटींचं टेंडर काढतोय”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

“म्हैसाळ योजनेची व्याप्ती वाढवण्याचं काम करतोय. जतमधील जे 40-50 गावं आहेत त्यांना पाणी मिळालं पाहिजे यासाठी सर्व सुरुय. या विषयावर बाकीचे लोकं राजकारण करत असतील तर त्याला करु द्या. त्यांच्या राजकीय आरोपांना उत्तर देणार नाही. मी कामातून उत्तर देईन एवढंच मी सांगतोय”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...