Maharashtra Corona Update : काहीसा दिलासा, दिवसभरात 52 हजार 313 रुग्ण कोरोनामुक्त, नवी रुग्णसंख्या मात्र चिंताजनक

राज्यात आज दिवसभरात 52 हजार 312 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर दुसरीकडे दिवसभरात 51 हजार 751 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

Maharashtra Corona Update : काहीसा दिलासा, दिवसभरात 52 हजार 313 रुग्ण कोरोनामुक्त, नवी रुग्णसंख्या मात्र चिंताजनक
कोरोना चाचणी प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Apr 12, 2021 | 10:02 PM

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरु असलेलं कोरोनाचं थैमान आज काहीसं निवळल्याचं चित्र आहे. पण चिंता मात्र कायम आहे. त्याचं कारण असं की राज्यात आज दिवसभरात 52 हजार 312 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर दुसरीकडे दिवसभरात 51 हजार 751 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर दिवसभरात 258 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. राज्यात सध्या 5 लाख 64 हजार 746 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. (Increase in number of corona patients in Mumbai, Pune, Nagpur)

नव्या आकडेवारीसह राज्यात कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 34 लाख 58 हजार 996 वर पोहोचली आहे. त्यातील 28 लाख 34 हजार 473 जण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर राज्यात आतापर्यंत 58 हजार 245 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

मुंबईतील कोरोना स्थिती –

मुंबईत गेल्या 24 तासांत 6 हजार 905 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर 9 हजार 37 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत दिवसभरात 43 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृतांपैकी 36 जणांचा काही दीर्घ आजार होते. मृतांमध्ये 30 पुरुष आणि 13 महिला रुग्णांचा समावेश आहे.

नव्या आकडेवारीनुसार मुंबई जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांचा दर 80 टक्के झाला आहे. तर मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी 36 दिवसांवर येऊन ठेपलाय. 5 एप्रिल ते 11 एप्रिल पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर हा 1.89 टक्के झाला आहे.

पुण्यातील कोरोना स्थिती –

पुणे शहरात आज दिवसभरात 4 हजार 849 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर 3 हजार 896 जण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. पुण्यात आज मृतांचा आकडा चिंताजनक बनलाय. आज दिवसभरात पुण्यात 65 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. त्यातील 12 मृत रुग्ण पुण्याबाहेरील होते. पुण्यात सध्या 53 हजार 376 सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील 1 हजार 50 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

आजच्या आकडेवारीसह पुण्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 3 लाख 34 हजार 510 झालीय. त्यातील 2 लाख 75 हजार 333 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर आतापर्यंत 5 हजार 801 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

नागपुरातील कोरोना स्थिती –

नागपुरातील मृतांचा आकडा दिवसेंदिवस चिंता वाढवणारा ठरतोय. नागपुरात आज दिवसभरात 69 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. दिवसभरात 5 हजार 661 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 3 हजार 247 जण कोरोनामुक्त झाले आहेत. नव्या आकडेवारीसह नागपुरातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 2 लाख 84 हजार 217 वर पोहोचली आहे. त्यातील 2 लाख 20 हजार 560 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 5 हजार 838 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

संबंधित बातम्या :

‘कोरोना काळात यंत्रणा म्हणून आम्ही कमी पडलो’, धनंजय मुंडेंनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं

धक्कादायक! रुग्णालयाने जिवंत कोरोना रुग्णाला केले मृत घोषित, पत्नीच्या प्रसंगावधानानं अनर्थ टळला

Increase in number of corona patients in Mumbai, Pune, Nagpur

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.