AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! विशेष अधिवेशनात मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाचा कायदा होणार, सूत्रांची माहिती

मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र सरकारने येत्या 20 आणि 21 फेब्रुवारीला विधीमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावल्याची माहिती समोर आली आहे. या अधिवेशनात मराठा समाजाच्या स्वातंत्र आरक्षणाबाबत कायदा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मोठी बातमी! विशेष अधिवेशनात मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाचा कायदा होणार, सूत्रांची माहिती
maratha reservationImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 15, 2024 | 7:46 PM
Share

विनायक डावरुंग, Tv9 प्रतिनिधी, मुंबई | 15 फेब्रुवारी 2024 : मराठा आरक्षणाच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणासाठी विधीमंडळाचं दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. येत्या 20 आणि 21 फेब्रुवारीला विधीमंडळाचं विशेष अधिवेशन असणार आहे. या अधिवेशनात मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाचा कायदा होणार, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. याआधी फडणवीस सरकारकडून एसीबीसीचं आरक्षण मराठ्यांना देण्यात आलं होतं. त्याच्या तरतुदी या अधिवेशनात केल्या जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचं गेल्या पाच दिवसांपासून उपोषण सुरु आहे. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी विशेष अधिवेशन कधी बोलवणार? असा सवाल केला होता. त्यानंतर आता राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलावलं आहे.

सूत्रांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. दोन दिवसांच्या अधिवेशानत महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहे. येत्या 20 फेब्रुवारीला अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपाल अभिभाषण आणि शोक प्रस्ताव सादर होईल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 21 फेब्रुवारीला मराठा आरक्षण अधिसूचनेचं कायद्यात रुपांतर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दुसरीकडे मंत्री उदय सामंत यांनी याबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. “मनात आलं म्हणजे विधीमंडळाचं अधिवेशन घेता येत नाही”, असं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. “मंत्रिमंडळामध्ये झालेल्या निर्णयानुसार 20 तारखेला अधिवेशन होणार आहे”, अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली. “जरांगेंवर नाराजी नाही. त्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी”, असंही उदय सामंत म्हणाले आहेत.

उदय सामंत नेमकं काय म्हणाले?

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं की, मी आरक्षणासाठी अधिवेशन लावेल. 20 तारखेला अधिवेशन आहे. त्यांच्या अधिकृत सीएमओच्या ट्विटर अकाउंटवरुन याबाबत माहिती देण्यात आली आहे. आम्ही उद्या आरक्षण घेणार आहोत, असं म्हणून विधीमंडळाचं अधिवेशन होत नाही. मला मनोज जरांगे यांना आजही विनंती करायची आहे की, स्वत:च्या प्रकृतीची काळजी घेतली पाहिजे. सामंजसपणाने भूमिका घेतली पाहिजे. उपोषणामुळे चिडचिड होत असेल. पण त्यांच्या कुठल्या वक्तव्यामुळे आम्ही नाराज आहोत, असं नाही”, अशी भूमिका उदय सामंत यांनी मांडली.

‘जरांगेंच्या जीवाशी खेळण्याचं क्रूर कृत्य महाराष्ट्राचं सरकार करतंय’

ठाकरे गटाचे विनायक राऊत यांनी या मुद्द्यावरुन सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. “सकल मराठा समाजाला सरसकट आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आंदोलन करत आहेत. जरांगे पाटील यांच्या जीवाशी खेळण्याचं क्रूर कृत्य हे महाराष्ट्राचं एकनाथ शिंदे सरकार करत आहे. मागच्यावेळी त्यांना फसवलं”, अशी टीका विनायक राऊत यांनी केली.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.