AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, महाराष्ट्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय

महाराष्ट्र सरकारने सरळसेवा भरतीद्वारे सरकारी नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, महाराष्ट्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय
Image Credit source: Social Media
| Edited By: | Updated on: Mar 03, 2023 | 8:38 PM
Share

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. नोकर भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी समोर आलीय. कोरोना संकटामुळे दोन वर्ष नोकर भरतीची जाहिरात निघाली नाही. त्यामुळे वयोमर्यादा संपलेल्या विद्यार्थ्यांना नोकर भरतीसाठी अर्ज करता येत नव्हता. या नोकर भरतीसाठी वयोमर्यादा संपलेल्या विद्यार्थ्यांनी दोन वर्ष वाढवून देण्याची मागणी केलेली. विद्यार्थ्यांची ही मागणी राज्य सरकारने मान्य केली आहे. सरकारने याबाबतचा आदेश काढला आहे. सरळ सेवेत भरल्या जाणाऱ्या पदांमध्ये भरतीसाठी वयोमर्यादेत दोन वर्ष वाढवून देण्यात आले आहेत.

महाराष्ट्रात लाखो विद्यार्थ्यांची सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करतात. ते सरकारी नोकरी मिळवण्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेतात. अनेकांना त्यामध्ये यश मिळतं. तर काहींना त्यात लवकर यश मिळत नाही. त्यामुळे ते प्रत्येक नोकर भरतीला प्रयत्न करतात. या दरम्यान काहींची वयोमर्यादा संपते. कारण नोकर भरतीच्या निकषांमध्ये वयाचीदेखील अट असते.

वयोमर्यादाच्या अटीमुळे काहींना परीक्षा देण्यापासून मुकावं लागतं. या अटीमुळे लॉकडाऊननंतर अनेकांना फटका बसला. कारण कोरोना संकट काळात लॉकडाऊनमुळे दोन वर्ष नोकर भरती रखडली. त्यानंतर जाहीर झालेल्या नोकर भरतीला अर्ज करण्यापासून काही विद्यार्थ्यांना मुकावं लागलं. याच गोष्टीचा विचार करत राज्य सरकारने विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेतलाय. त्यामुळे वयोमर्यादा संपलेल्या विद्यार्थ्यांना सरळसेवा भरतीसाठी दिलासा मिळाला आहे.

राज्य सरकारकडून पोलीस भरतीतही वयोमर्यादेत शिथिलता

कोरोना संकटाआधी अनेक विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीसाठी अर्ज दाखल केला होता. पण कोराना संकट काळात त्यांची वयोमर्यादा शिथिल करण्यात आली होती. याशिवाय कोरोना संकटानंतर भरती पुन्हा जाहीर करण्यात आली. पण ती पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना वयोमर्यादेत शिथिलता मिळेल का याबाबत साशंकता होती. सरकारने वयोमर्यादेत शिथिलता द्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात होती. त्यानंतर सरकारने त्याबाबतचा निर्णय घेतला होता.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.