AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महापालिका निवडणुकांबद्दलची सर्वात मोठी बातमी, प्रभाग रचना प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर, कसे असणार टप्पे?

महाराष्ट्रातील महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबरनंतर होणार आहेत. नवीन प्रभाग रचनेसाठी राज्य निवडणूक आयोगाने वेळापत्रक जाहीर केले आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत प्रारूप तयार करणे, हरकती मागवणे आणि अंतिम निर्णय घेण्याची प्रक्रिया पार पडेल.

महापालिका निवडणुकांबद्दलची सर्वात मोठी बातमी, प्रभाग रचना प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर, कसे असणार टप्पे?
bmc building
| Updated on: Jun 24, 2025 | 11:10 AM
Share

गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुका येत्या ऑक्टोबर महिन्यानंतर होणार असल्याचे निश्चित झाले आहे. महाराष्ट्रातील आगामी महानगरपालिका निवडणुका आता ऑक्टोबर महिन्यानंतर होतील, हे निश्चित झाले आहे. या निवडणुकांसाठीच्या प्रभागरचनेचे वेळापत्रक राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. यानुसार येत्या ऑक्टोबर महिन्यात ही प्रभाग रचना अंतिम होणार आहे. मुंबई महानगरपालिकेची प्रभाग रचना ६ ऑक्टोबरनंतर, तर ‘ड’ वर्ग महानगरपालिकांची प्रभाग रचना १३ ऑक्टोबरला अंतिम होईल, असे यात नमूद करण्यात आले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी प्रभाग रचना करण्यासाठीचे परिपत्रक नुकतंच जाहीर करण्यात आले. या परिपत्रकानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी प्रभाग रचना करण्यासाठी सुमारे चार महिन्यांचा कालावधी लागणार आहे. या प्रक्रियेतील महत्त्वाचे टप्पे कसे असणार याबद्दल जाणून घेऊया.

  • प्रारूप प्रभाग रचना तयार करणे: यामध्ये जनगणनेची माहिती तपासणे, स्थळ पाहणी करणे, गुगल मॅपवर प्रभागाचे नकाशे तयार करणे आणि प्रारूप मसुदा तयार करून त्यावर स्वाक्षऱ्या करणे या बाबींचा समावेश असणार आहे. हे काम १७ जून ते ३१ जुलै दरम्यान पूर्ण केले जाईल.
  • प्रारूप प्रस्ताव सादर करणे: तयार केलेला प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे १ ते ५ ऑगस्ट दरम्यान, तर नगरविकास विभागाकडून राज्य निवडणूक आयोगाकडे ६ ते ११ ऑगस्ट दरम्यान सादर केला जाईल.
  • मान्यता आणि हरकती: राज्य निवडणूक आयोगाकडून प्रारूप प्रभाग रचनेस मान्यता मिळाल्यानंतर २२ ते २८ ऑगस्ट दरम्यान ती प्रसिद्ध केली जाईल आणि त्यावर हरकती व सूचना मागवण्यात येतील.
  • सुनावणी आणि अंतिम निर्णय: प्राप्त हरकती आणि सूचनांवर २९ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर दरम्यान सुनावणी घेतली जाईल. त्यानंतर ९ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर दरम्यान प्राधिकृत अधिकारी शिफारशी विचारात घेऊन प्रभाग रचना अंतिम करून नगरविकास विभागाला पाठवतील, जो प्रस्ताव निवडणूक आयोगाला सादर करेल.
  • अंतिम अधिसूचना: राज्य निवडणूक आयोगाकडून अंतिम प्रभाग रचनेस मान्यता मिळाल्यानंतर ३ ते ६ ऑक्टोबर दरम्यान अधिसूचनेद्वारे ती प्रसिद्ध केली जाईल.

ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून मतदान?

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विविध कारणांमुळे गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित आहे. कोरोना संसर्ग आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्द्यामुळे निवडणुका रखडल्या आहेत. २०२० पासून राज्यात अनेक वेळा निवडणुकांची तयारी झाली असली तरी, त्या प्रत्यक्ष झाल्या नाहीत. आता नवीन प्रभागरचनेच्या वेळापत्रकानुसार, ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून मतदानाला सुरुवात होण्याची शक्यता आहे आणि यासाठी निवडणूक आयोग तयारी करत आहे.

Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता