AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रद्रोह्यांविरोधात ‘मविआ’ चा निघणार ‘या’ दिवशी विराट मोर्चा, महाराष्ट्र तोडू बघणाऱ्यांना देणार उत्तर

सीमाभागातील गावांबरोबरच मुंबईवरही घाला घालण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप केंद्र आणि राज्य सरकारवर करण्यात आला आहे.

महाराष्ट्रद्रोह्यांविरोधात 'मविआ' चा निघणार 'या' दिवशी विराट मोर्चा, महाराष्ट्र तोडू बघणाऱ्यांना देणार उत्तर
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Dec 08, 2022 | 8:13 PM
Share

मुंबईः सध्या राज्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी बेताल वक्तव्य केल्या प्रकरणी राज्यातील वातावरण ढवळून निघाले होते. तर त्यानंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील गावांवर दावा सांगितल्यानंतर सीमावादाची आणखी एक ठिणगी पडली. त्यामुळे आज महाविकास आघाडीतील सर्व मित्र पक्षांची आज बैठक घेऊन राज्यातील महाराष्ट्रद्रोहींविरोधात विरोट मोर्चा काढण्याचा निर्णय आज घेण्यात आला आहे.

हा अतिविराट मोर्चा मुंबईत 17 डिसेंबर रोजी निघणार असून जितामाता उद्यानापासून छत्रपती शिवाजी टर्मिनसपर्यंत हा विराट मोर्चा काढला जाणार असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितली.

यावेळी काँग्रेसचे नेते आमदार नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हेही उपस्थित होते.

सातत्याने महाराष्ट्राचा जो अपमान आणि अवहेलना केली जाते आहे. त्याच बरोबर महाराष्ट्राचे अस्तित्वही नाकारण्यात येत आहे. त्यामुळे राज्यात सध्या एका बाजूने महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न केला जातो आहे.

त्याविषयीही या विराट मोर्चामध्ये मत मांडली जाणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. राज्याच्या सीमेला लागून असलेली गाव आणि त्यांच्या आजूबाजूच्या राज्यांकडून करण्यात येत असलेला दावा त्यालाही सडेतोड उत्तर देणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे.

सीमाभागातील गावांबरोबरच मुंबईवरही घाला घालण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप केंद्र आणि राज्य सरकारवर करण्यात आला आहे.

गुजरात निवडणुकीत भाजपने अभूतपूर्व यश मिळवले असले तरी त्यामध्ये महाराष्ट्रातून पळवलेल्या उद्योगधंद्यांचे योगदान असल्याचा ठपका भाजपवर ठेवण्यात आला आहे.

राज्यातील रोजगार आणि औद्योगिक विकास ओरबडून घेतला असल्याची टीकाही गुजरातवर करण्यात आली आहे. त्यामुळे समविचारी पक्षानी एकत्र येत महाराष्ट्रप्रेमींनी आम्ही या मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन करतो असंही यावेळी सांगण्यात आले.

Follow Us
मोठी बातमी! त्रिषावरील वक्तव्य भोवलं; उधयनिधी स्टॉलिन यांच्याबाबत...
मोठी बातमी! अभिनेत्री त्रिशावरील वक्तव्य भोवलं; उधयनिधी स्टॉलिन यांच्याबाबत कोर्टाचे तातडीचे निर्देश
सुरज चव्हाणांचा गांधी भवनात राडा; नेमके आदेश दिले कोणी?
NCP Rada | सुरज चव्हाण यांचा गांधी भवनात राडा; नेमके आदेश दिले कोणी?
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं, कोर्टात...
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं, कोर्टात दोन्ही बाजुने युक्तीवाद अखेर...
बातमीत येण्यासाठी खालच्या स्तराचं राजकारण...
Devendra Fadnavis | बातमीत येण्यासाठी खालच्या स्तराचं राजकारण; काँग्रेसला मुख्यमंत्री फडणवीसांचं जशास तसं उत्तर
जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी, यांची बुद्धी... शिंदे थेट म्हणाले
जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी, यांची बुद्धी... सुनेत्रा पवारांबद्दल आक्षेपार्ह बोलणाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी सुनावलं
विरोधक धर्माचं राजकारण करतायत!; सिद्धिविनायक दानचोरी प्रकरणावर...
Sada Sarvankar | विरोधक धर्माचं राजकारण करतायत!; सिद्धिविनायक दानचोरी प्रकरणावर सदा सरवणकरांचा स्फोटक दावा
दिल्लीत भेटींचे सत्र सुरूच! पुन्हा NCP नेता अमित शाहांच्या भेटीला,
Amit Shah | दिल्लीत भेटींचे सत्र सुरूच! पुन्हा NCP नेता अमित शाहांच्या भेटीला, काय घडलं?
काँग्रेस कार्यालयात घुसलेल्या NCP कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड
Congress | काँग्रेस कार्यालयात घुसलेल्या NCP कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड
काँग्रेस कार्यालयात राष्ट्रवादीची थेट घुसखोरी; आधी माफी मागा म्हणत...
NCP Vs Congress | गुंगी गुडिया पोस्टवरून काँग्रेसला घेरलं; काँग्रेस कार्यालयात राष्ट्रवादीची थेट घुसखोरी; आधी माफी मागा म्हणत...
विमान हवेत असतानाच छताला तडा...प्रवाशांचा जीव मुठीत; एअर इंडियाच्या...
विमान हवेत असतानाच छताला तडा... प्रवाशांचा जीव मुठीत; एअर इंडियाच्या विमानाची पुन्हा भयानक दुर्घटना