AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनापाठोपाठ मुंबईवर मलेरियाचे संकट, गेल्यावर्षीच्या तुलनेत रुग्णसंख्येत वाढ

मुंबईत एकीकडे कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असतानाच दुसरीकडे मलेरियाच्या रुग्णसंख्येत वाढ होत (Malaria Patient increase Mumbai)  आहे.

कोरोनापाठोपाठ मुंबईवर मलेरियाचे संकट, गेल्यावर्षीच्या तुलनेत रुग्णसंख्येत वाढ
जाणून घ्या वर्ल्ड मलेरिया डे चा इतिहास, महत्त्व आणि थीमबद्दल
| Updated on: Sep 02, 2020 | 4:54 PM
Share

मुंबई : कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईत मलेरियाचं संकट वाढताना दिसत आहे. मुंबईत एकीकडे कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असतानाच दुसरीकडे मलेरियाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. मुंबईत एकट्या ऑगस्ट महिन्यात 1 हजार 137 जणांना मलेरियाची लागण झाली आहे. तर दोघांचा मृत्यू झाला आहे. (Malaria Patient increase Mumbai)

मुंबईत गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात मलेरियाचे 824 रुग्ण आढळले होते. मात्र यंदा ऑगस्टमध्ये तब्बल 1 हजार 137 जणांना मलेरियाची लागण झाली आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तर दुसरीकडे पावसाळी आजारांचाही धोका वाढत आहे.

दरम्यान गेल्यावर्षी जुलै महिन्यात 438 मलेरियाचे रुग्ण सापडले होते. यंदाही संख्या दुप्पट झाली आहे. यंदा जुलै महिन्यात मलेरियाचे 872 रुग्ण सापडले होते. धक्कादायक बाब म्हणजे मलेरियामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे.

तसेच डेंग्यू रुग्णांची संख्याही गेल्यावर्षीच्या तुलनेने कमी झाली आहे. गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात डेंग्यूचे 134 रुग्ण होते. आता डेंग्यूचे केवळ 10 रुग्ण आहेत. त्याशिवाय मुंबईत गॅस्ट्रोचे रुग्णही गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहेत. गेल्यावर्षी ऑगस्ट मध्ये 623 रुग्ण होते. यंदा ऑगस्टमध्ये फक्त 53 केसेस आहेत.

दरवर्षी पावसाळ्यात मलेरियाची रुग्णसंख्या तुलनेने दुप्पट होत असते. यंदाही मलेरिया रुग्णांचा आकडा दुप्पट झाला आहे. तसेच यंदा दोन जणांचा मलेरियाने मृत्यू झाला आहे. शिवाय कोरोनाचं संकटही पूर्णपणे ओसरलेलं नाही. त्यामुळे मलेरिया रुग्णांची संख्या वाढल्यास रुग्णालयांवर ताण येणार असून उपचारासाठी रुग्णालयात रुग्णांची गर्दी वाढल्यास सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडण्याची शक्यता आहे. (Malaria Patient increase Mumbai)

संबंधित बातम्या :

कोरोना पाठोपाठ मुंबईवर आता ‘या’ आजाराचं संकट, दोघांचा मृत्यू

मुंबई कोरोनामुक्त होण्यासाठी नेमके किती दिवस लागतील?

Follow Us
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार...
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार....
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल.
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत.
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल.
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात..
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात...
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार.
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....