AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मंत्र्यांच्या मनात ‘एका’ बंगल्याची धास्ती?, या बंगल्यात जो ही राहिला, त्याचे राजकीय करिअर संपले किंवा सत्तांतर तरी झाले, जाणून घ्या या बंगल्याविषयी

शिंदे गटाचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर ज्यांना हा बंगला मिळाला आहे, त्यांचे मात्र वेगळेच म्हणणे आहे. या बंगल्याबाबत इतरांच्या मनात काहीही असले तरी या बंगल्यात शरद पवार यांचेही वास्तव्य होते, असे केसरकर यांचे म्हणणे आहे.

मंत्र्यांच्या मनात 'एका' बंगल्याची धास्ती?, या बंगल्यात जो ही राहिला, त्याचे राजकीय करिअर संपले किंवा सत्तांतर तरी झाले, जाणून घ्या या बंगल्याविषयी
| Edited By: Sandip Sakhare | Updated on: Aug 25, 2022 | 8:09 PM
Share

मुंबई– राज्यात एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)यांचे सरकार आले. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार रखडला त्यावरुन टीकाही झाली. त्यानंतर अधिवेशनापूर्वी 18 मंत्र्यांनी शपथ घेतली. आता त्यानंतर चर्चा सुरु आहे ती मंत्र्यांना वाटप करण्यात आलेल्या बंगल्यांची. नेहमीच मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा या सरकारी निवासस्थानाची चर्चा नेहमीच होत असते. मात्र यावेळी रामटेक हा बंगलाही सध्या चांगलाच चर्चेत आहे. याचे कारणही तसेच आहे. शपथविधी झाल्यानंतर मंत्र्यांना त्यांच्या पसंतीचा बंगला विचारण्यात आला होता. दीपक केसरकर (Deepak Kesarkar)सोडता कोणत्याही मंत्र्याने रामटेक बंगला घेण्याची इच्छा व्यक्त केली नाही. हा बंगला नको, अशी भूमिका घेणाऱ्यांच्या मनात एक अंधश्रद्धा असल्याचे सांगण्यात येते. या बंगल्यात कोणताही मंत्री राहतो, त्याची मंत्रिपदाची खुर्ची तरी जाते किंवा एखाद्या घोटाळ्यात त्याचे नाव तरी येते, अशी वंदता आहे. यंदाच्या मंत्रिमंडळात या रामटेक बंगला शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांना देण्यात आला आहे.

केसरकर म्हणतात पवारही या बंगल्यात राहिलेत

शिंदे गटाचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर ज्यांना हा बंगला मिळाला आहे, त्यांचे मात्र वेगळेच म्हणणे आहे. या बंगल्याबाबत इतरांच्या मनात काहीही असले तरी या बंगल्यात शरद पवार यांचेही वास्तव्य होते, असे केसरकर यांचे म्हणणे आहे. आज देशातील मोठ्या नेत्यांमध्ये शरद पवारांचे नाव घेतले जाते, त्यामुळे या बंगल्यात राहणाऱ्याला मंत्रीपद सोडावेच लागते असे नाही, तर या बंगल्यातील वास्तव्याचा फायदाही होऊ शकतो, असेच त्यांना सुचवायचे असावे. यात बंगल्यात शंकरराव चव्हाण राहिले होते, ते पुढे मुख्यमंत्री झाले आणि वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी शिफ्ट झाले होते. शंकरराव चव्हाण यांचे पुत्र अशोक चव्हाण यांच्या लहानपाणातील 12 वर्षे याच बंगल्यात गेली आहेत. हेच अशोक चव्हाण पुढे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही झाले. हे सगळं सांगताना केसरकर यांनी सांगितले की, शुभ-अशुभ मानणारे असू शकतात. पण आपला या अधंश्रद्धेवर विश्वास नाही. आज या बंगल्यात गणएश लपूजन केले असून २८ तारखेपासून या बंगल्यात राहायला येणार असल्याचे केसरकर यांनी स्पष्ट केले आहे.

अंधश्रद्धा मानत नाही – केसरकर

गेल्या सरकारप्रमाणेच या सरकारमध्येही रामटेक बंगला घेण्यासाठी कोणत्याही मंत्र्याने इच्छा दर्शवली नव्हती. राज्य सरकारच्या वतीने सगळ्या मंत्र्यांकडे त्यांच्या पसंतीच्या तीन बंगल्यांची नावे मागवली होती. त्यात केसरक यांच्या व्यतिरिक्त एकाही मंत्र्याने रामटेक बंगल्याचा समावेश त्या तीन नावांमध्ये केला नव्हता. अंधश्रध्दा मानत नाही सांगणाऱ्या केसरकरांना त्याचमुळे हा बंगला आता देण्यात आला आहे.

काय आहे एकूण प्रकरण

1999 साली काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये छगन भुजबळ यांना हा बंगला देण्यात आला होता. त्यानंतर तेलगी घोटाळ्यात त्यांचे नाव आल्याने त्यांना पद सोडावे लागले होते. त्यानंतर 2014 साली एकनाथ खडसे यांना हा बंगला देण्यात आला होता. काही दिवसांनी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने त्यांना पद सोडावे लागले होते. 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळात छगन भुजबळांना पुन्हा मंत्रीपद मिळाले आणि पुन्हा त्यांना रामटेक बंगला देण्यात आला. त्यानंतर अडीच वर्षांतच हे सरकार कोसळले आणि त्यांना पद आणि बंगला दोन्ही सोडावे लागले.

Follow Us
MNS शहराध्यक्षांच्या गाडीची तोडफोड: मनसेचा भाजपवर आरोप
अंबरनाथमधील भाजप-मनसे राड्यावरुन मनसे नेते आक्रमक, गाडी तोडफोड करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
चाकणच्या 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत? 2 हजार रोजगारांचा प्रश्न
Sharad Pawar | चाकणच्या 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत? 2 हजार रोजगारांचा प्रश्न; शरद पवार यांचा दावा
आमदार अपात्रता निर्णयावर राहुल नार्वेकरांचं मोठं वक्तव्य...
Rahul Narwekar | आमदार अपात्रता निर्णयावर राहुल नार्वेकरांचं मोठं वक्तव्य; सुप्रीम कोर्टात निर्णय....
फडणवीसांच्या निर्देशाने महा-आयडी; नागरिकांना मिळणार एकच डिजिटल ओळख
मुख्यमंत्री फडणवीसांच्या निर्देशाने महा-आयडी; नागरिकांना मिळणार एकच डिजिटल ओळख
पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची पुन्हा भारताला धमकी
‘सिंधूचं पाणी आमची रेड लाईन’; पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण'-दिपके
‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण'- अभिजीत दिपके
जमिनीच्या वादात अडकलेल्यांसाठी मोठी बातमी! सरकारचा मेगा प्लॅन
Chandrashekhar Bawankule | जमिनीच्या वादात अडकलेल्यांसाठी मोठी बातमी! सरकारचा मेगा प्लॅन; चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली घोषणा, म्हणाले...
जरांगेंच्या टीकेनंतर बावनकुळे भावुक; लाड म्हणाले, ‘वैयक्तिक टीक नको’
जरांगेंच्या टीकेनंतर बावनकुळे भावुक; प्रसाद लाड म्हणाले, ‘वैयक्तिक टीका नको’
मनिषा कायंदे यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल : "शिंदेंच्या जीवावर खासदार
मनिषा कायंदे यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल :
राजकीय उद्योग सोडून उद्योजकांकडे लक्ष द्यावे: सामंतांवर हल्लाबोल
राजकीय उद्योग सोडून उद्योजकांकडे लक्ष द्यावे: रोहित पवारांचा उद्योगमंत्री सामंतांवर हल्लाबोल