AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कायद्याचं महत्त्व; जपान दौऱ्यानंतर नरहर झिरवळ यांनी नेमकं ते सांगितलं…

 सिग्नल कोणताही असो तिथं वाहनांची गर्दी नसली, रेड सिग्नल पडला असला तरीही एकही वाहन सिग्नल तोडून कोणी पुढं जाणार नाही. ही तेथील लोकांची शिस्त असल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले आहे.

कायद्याचं महत्त्व; जपान दौऱ्यानंतर नरहर झिरवळ यांनी नेमकं ते सांगितलं...
| Updated on: Apr 22, 2023 | 7:09 PM
Share

मुंबई : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नरहर झिरवळ आणि त्यांच्या पत्नीचा पारंपरिक पेहराव असलेला विमानतळावरचा फोटो प्रचंड व्हायरल झाला होता. तो फोटो व्हायरल झाल्यानंतर नरहर झिरवळ आता पुन्हा भारतात परतले आहेत. जपान दौऱ्यावरून आल्यानंतर कायदा आणि जपान नेमका कसा आहे. हे त्यांनी त्यांच्या साध्यासुध्या भाषेत सांगितले आहे. हे सांगताना त्यांनी भारतीयांच्या आणि जपानच्या नागरिकांच्या मानसिकता काय आहे तेही त्यांनी अगदी स्पष्टपणे सांगितले आहे. कायदा नावाची गोष्ट कशी पाळायची असते आणि स्वतःमध्ये ती शिस्त लावून घेतली तर त्याचा देशाला किती फायदा होता. वयोवृद्ध माणसांनाही त्याचा काय फायदा होता हे नरहर झिरवळ यांनी आपल्या शब्दात सांगितले आहे.

आमदार नरहर झिरवळ यांचा सर्वपक्षीय आमदारांबरोबर झालेल्या जपान दौऱ्याबद्दल ते सांगताना त्यांनी आपल्या पेहरावाबद्दलही जाणीवपूर्वक सांगितले.

यावेळी ते म्हणाले ज्यावेळी दौरा ठरला, त्यावेळी लोकप्रतिनिधींचा आणि दौऱ्यावर असलेल्या लोकांचा नेमका काय पेहराव असणार आहे याविषयी चर्चा झाली.

त्याच वेळी नरहर झिरवळ यांना काहींनी पेहराव बदलण्याची कल्पना सुचवली मात्र त्यावर बोलताना त्यांनी सांगितले की, माझी ही टोपी माझ्यासोबतच असणार आहे. ती बदलता येणार नाही. जर ती बदला असं कुणी म्हणत असेल तर माझा दौरा रद्द आहे असं समजा असंही त्यांनी यावेळी सांगतिले.

या दौऱ्याविषयी त्यांनी आपल्या पत्नीलाही घेऊन ते गेले होते. त्यावर बोलताना आणि झिरवळ दांपत्याने आपल्या पेहराव कसा आला आहे. आणि त्याविषयी त्यांची त्याविषयी निष्ठा कशी आहे हेही त्यांच्या पत्नीने सांगितले.

त्याचा किस्सा सांगताना ते म्हणतात की, मी शेतातून इथपर्यंत आले आहे. त्यामुळे माझा पेहराव माझी साडी हीच असणार आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले.

नरहर झिरवळ यांनी जपान दौऱ्याचं महत्व सांगतान त्यांनी कायद्याचं महत्वही सांगितलं. त्यांनी सांगितले की, जपानमधील दौऱ्यामध्ये एक गोष्ट समजली की, तेथील लोकांनी स्वतःला शिस्त लावून घेतली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी साध्या साध्या गोष्टीतही कायद्याचं महत्वं जाणवतं.

सिग्नल कोणताही असो तिथं वाहनांची गर्दी नसली, रेड सिग्नल पडला असला तरीही एकही वाहन सिग्नल तोडून कोणी पुढं जाणार नाही. ही तेथील लोकांची शिस्त असल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले आहे.

मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....