AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कायद्याचं महत्त्व; जपान दौऱ्यानंतर नरहर झिरवळ यांनी नेमकं ते सांगितलं…

 सिग्नल कोणताही असो तिथं वाहनांची गर्दी नसली, रेड सिग्नल पडला असला तरीही एकही वाहन सिग्नल तोडून कोणी पुढं जाणार नाही. ही तेथील लोकांची शिस्त असल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले आहे.

कायद्याचं महत्त्व; जपान दौऱ्यानंतर नरहर झिरवळ यांनी नेमकं ते सांगितलं...
| Updated on: Apr 22, 2023 | 7:09 PM
Share

मुंबई : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नरहर झिरवळ आणि त्यांच्या पत्नीचा पारंपरिक पेहराव असलेला विमानतळावरचा फोटो प्रचंड व्हायरल झाला होता. तो फोटो व्हायरल झाल्यानंतर नरहर झिरवळ आता पुन्हा भारतात परतले आहेत. जपान दौऱ्यावरून आल्यानंतर कायदा आणि जपान नेमका कसा आहे. हे त्यांनी त्यांच्या साध्यासुध्या भाषेत सांगितले आहे. हे सांगताना त्यांनी भारतीयांच्या आणि जपानच्या नागरिकांच्या मानसिकता काय आहे तेही त्यांनी अगदी स्पष्टपणे सांगितले आहे. कायदा नावाची गोष्ट कशी पाळायची असते आणि स्वतःमध्ये ती शिस्त लावून घेतली तर त्याचा देशाला किती फायदा होता. वयोवृद्ध माणसांनाही त्याचा काय फायदा होता हे नरहर झिरवळ यांनी आपल्या शब्दात सांगितले आहे.

आमदार नरहर झिरवळ यांचा सर्वपक्षीय आमदारांबरोबर झालेल्या जपान दौऱ्याबद्दल ते सांगताना त्यांनी आपल्या पेहरावाबद्दलही जाणीवपूर्वक सांगितले.

यावेळी ते म्हणाले ज्यावेळी दौरा ठरला, त्यावेळी लोकप्रतिनिधींचा आणि दौऱ्यावर असलेल्या लोकांचा नेमका काय पेहराव असणार आहे याविषयी चर्चा झाली.

त्याच वेळी नरहर झिरवळ यांना काहींनी पेहराव बदलण्याची कल्पना सुचवली मात्र त्यावर बोलताना त्यांनी सांगितले की, माझी ही टोपी माझ्यासोबतच असणार आहे. ती बदलता येणार नाही. जर ती बदला असं कुणी म्हणत असेल तर माझा दौरा रद्द आहे असं समजा असंही त्यांनी यावेळी सांगतिले.

या दौऱ्याविषयी त्यांनी आपल्या पत्नीलाही घेऊन ते गेले होते. त्यावर बोलताना आणि झिरवळ दांपत्याने आपल्या पेहराव कसा आला आहे. आणि त्याविषयी त्यांची त्याविषयी निष्ठा कशी आहे हेही त्यांच्या पत्नीने सांगितले.

त्याचा किस्सा सांगताना ते म्हणतात की, मी शेतातून इथपर्यंत आले आहे. त्यामुळे माझा पेहराव माझी साडी हीच असणार आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले.

नरहर झिरवळ यांनी जपान दौऱ्याचं महत्व सांगतान त्यांनी कायद्याचं महत्वही सांगितलं. त्यांनी सांगितले की, जपानमधील दौऱ्यामध्ये एक गोष्ट समजली की, तेथील लोकांनी स्वतःला शिस्त लावून घेतली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी साध्या साध्या गोष्टीतही कायद्याचं महत्वं जाणवतं.

सिग्नल कोणताही असो तिथं वाहनांची गर्दी नसली, रेड सिग्नल पडला असला तरीही एकही वाहन सिग्नल तोडून कोणी पुढं जाणार नाही. ही तेथील लोकांची शिस्त असल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले आहे.

Follow Us
लोकसभेत आज गॅस तुटवड्यावर चर्चा, राहुल गांधी केंद्र सरकारला घेरणार?
लोकसभेत आज गॅस तुटवड्यावर चर्चा, राहुल गांधी केंद्र सरकारला घेरणार?.
केंद्राने व्यावसायिक गॅसचा पुरवठा रोखला... या कंपनीची कोर्टात धाव
केंद्राने व्यावसायिक गॅसचा पुरवठा रोखला... या कंपनीची कोर्टात धाव.
गुड न्यूज... टेन्शनच मिटलं, सौदीतून मुंबईत आलं कच्च्या तेलाचं जहाज
गुड न्यूज... टेन्शनच मिटलं, सौदीतून मुंबईत आलं कच्च्या तेलाचं जहाज.
हॉटेल, कॅटरर्स बंद, उपासमारीची वेळ; गॅस सिलेंडरचा पुरवठाच....
हॉटेल, कॅटरर्स बंद, उपासमारीची वेळ; गॅस सिलेंडरचा पुरवठाच.....
1 हजार 900 रुपयांचं सिलेंडर 4500 रुपयांना, ठाण्यात काळाबाजाराचा हैदोस
1 हजार 900 रुपयांचं सिलेंडर 4500 रुपयांना, ठाण्यात काळाबाजाराचा हैदोस.
इराण–इस्त्रायल युद्धावर भारताची भूमिका कुठे?
इराण–इस्त्रायल युद्धावर भारताची भूमिका कुठे?.
जय श्रीराम म्हणा सर्व काही मिळेल;गॅस टंचाईवरून राऊतांचा सरकारवर निशाणा
जय श्रीराम म्हणा सर्व काही मिळेल;गॅस टंचाईवरून राऊतांचा सरकारवर निशाणा.
विधानभवन, मेट्रो, स्टॉक एक्सचेंज उडवण्याची धमकी?
विधानभवन, मेट्रो, स्टॉक एक्सचेंज उडवण्याची धमकी?.
युद्धाचा परिणाम घरगुती गॅस सिलेंडरवर, थेट पोलीस बंदोबस्तात वाटप
युद्धाचा परिणाम घरगुती गॅस सिलेंडरवर, थेट पोलीस बंदोबस्तात वाटप.
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका.