AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘….पुढच्या वेळी असं झालं तर, महाराष्ट्र पेटून उठेल’, सरळ-सरळ भाजपला इशारा, कुणी आणि का दिला..?

गुलाबराव पाटील यांनी मंत्री पद गेलं तरी चालेल पण छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल कोणतीही गोष्ट खपवून घेतली जाणार नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते.

'….पुढच्या वेळी असं झालं तर, महाराष्ट्र पेटून उठेल', सरळ-सरळ भाजपला इशारा, कुणी आणि का दिला..?
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Dec 12, 2022 | 10:33 PM
Share

मुंबईः गेल्या काही दिवसांपासून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यापासून ते अगदी आता मंत्री चंद्रकात पाटील यांच्यापर्यंत अनेक नेत्यांनी महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. त्यामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले होते. त्यातच आता महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी चंद्रकांत पाटील यांनी वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांच्यावर शाईफेकही झाली होती. तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वक्तव्य केल्या प्रकरणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान यांच्याकडे पत्र लिहून स्पष्टीकरण देत अवमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता असं त्यांनी स्पष्ट केले.

त्यानंतर शिंदे गटाच्या आमदार संजय शिरसाठ यांनी त्यांना आता माफी मागितली असली तरी पुढच्या वेळी अशी चूक झाली तर महाराष्ट्र पेटून उठेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर मित्र पक्षासह विरोधकांनीही त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढविला होता.

त्यावेळी गुलाबराव पाटील यांनी मंत्री पद गेलं तरी चालेल पण छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल कोणतीही गोष्ट खपवून घेतली जाणार नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते. त्यानंतर संजय गायकवाड यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला होता.

त्या घटनेची आठवण करून देत संजय शिरसाठ यांनी थेट पुन्हा अशी चूक झाली तर महाराष्ट्र पुन्हा पेटून उठेल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी ही तुमच्यावर असेल असंही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे राज्यपाल यांच्या पत्रावर प्रतिक्रिया व्यक्त करताना आताही त्यांनी थेट असा इशाराच दिला आहे.

शिंदे गटाचे नेते संजय शिरसाठ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलताना सांगितले की, शिवाजी महाराज यांच्याबद्दल आम्ही कोणतीही गोष्ट ऐकून घेणार नाही.

त्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आता माफी मागितली तरी यापुढे राज्यपाल असो की आणखी कोणताही राजकीय नेता असो शिवरायांबद्दल कोणतीही गोष्ट ऐकून घेतली जाणार नाही असा सज्जड दमही भाजपला देण्यात आाल आहे.

Follow Us
6 सेकंदातच... धाडकन कोसळला लोखंडी ब्रीज, नेपाळमधील पुराची भयावह दृश्य
6 सेकंदातच... धाडकन कोसळला लोखंडी ब्रीज, नेपाळमधील पुराची भयावह दृश्य समोर, भारतातील या राज्यावरही मोठं संकट
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; थेट अपर सचिवाला अटक
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई;  थेट अपर सचिवाला अटक
मनोज जरांगे पाटलांना आंदोलनाआधीच मोठा धक्का; गृह विभागाने थेट...
मनोज जरांगे पाटलांना आंदोलनाआधीच मोठा धक्का; गृह विभागाने थेट... नेमकं काय घडलं?
अमरावतीत लहान लेकरं होरपळले अन् पालकमंत्री पाणीपुरी खातात मग...
अमरावतीत लहान लेकरं होरपळले अन् पालकमंत्री पाणीपुरी खातात मग... सुषमा अंधारे संतापल्या
थरकाप उडवणारे दृश्य! पूराच्या हाहाकारात 132 भारतीय पर्यंटकांचा मृत्यू
थरकाप उडवणारे दृश्य! नेपाळमध्ये पुराचा हाहाकार; 132 भारतीय पर्यटकांचा दुर्दैवी अंत
कर्नाटकात वंदे मातरम् केवळ दोन कडवी गायली जाणार-डी.के. शिवकुमार
कर्नाटकात वंदे मातरम् केवळ दोन कडवी गायली जाणार
राजकीय हालचालींना वेग! सुप्रिया सुळे पुन्हा मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
राजकीय हालचालींना वेग! सुप्रिया सुळे पुन्हा मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार; कारण...
मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षातील खासदारांच्या बैठकीची इनसाइड स्टोरी समोर
मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षातील खासदारांच्या बैठकीची इनसाइड स्टोरी समोर, नेत्यांना दिलं सर्वात मोठं आश्वासन
लाईव्ह लोकेशन सांगा मी आत्ताच... अंधारेंनी आयुक्तांना धारेवर धरलं
लाईव्ह लोकेशन सांगा मी आत्ताच... अंधारेंनी अमरावतीतील प्रकरणानंतर आयुक्तांनाच धारेवर धरलं
एमपीएससी औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणी 6 आरोपींना अटक
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; तीन अधिकाऱ्यांसह सहा जणांना अटक