AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘….पुढच्या वेळी असं झालं तर, महाराष्ट्र पेटून उठेल’, सरळ-सरळ भाजपला इशारा, कुणी आणि का दिला..?

गुलाबराव पाटील यांनी मंत्री पद गेलं तरी चालेल पण छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल कोणतीही गोष्ट खपवून घेतली जाणार नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते.

'….पुढच्या वेळी असं झालं तर, महाराष्ट्र पेटून उठेल', सरळ-सरळ भाजपला इशारा, कुणी आणि का दिला..?
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Dec 12, 2022 | 10:33 PM
Share

मुंबईः गेल्या काही दिवसांपासून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यापासून ते अगदी आता मंत्री चंद्रकात पाटील यांच्यापर्यंत अनेक नेत्यांनी महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. त्यामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले होते. त्यातच आता महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी चंद्रकांत पाटील यांनी वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांच्यावर शाईफेकही झाली होती. तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वक्तव्य केल्या प्रकरणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान यांच्याकडे पत्र लिहून स्पष्टीकरण देत अवमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता असं त्यांनी स्पष्ट केले.

त्यानंतर शिंदे गटाच्या आमदार संजय शिरसाठ यांनी त्यांना आता माफी मागितली असली तरी पुढच्या वेळी अशी चूक झाली तर महाराष्ट्र पेटून उठेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर मित्र पक्षासह विरोधकांनीही त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढविला होता.

त्यावेळी गुलाबराव पाटील यांनी मंत्री पद गेलं तरी चालेल पण छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल कोणतीही गोष्ट खपवून घेतली जाणार नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते. त्यानंतर संजय गायकवाड यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला होता.

त्या घटनेची आठवण करून देत संजय शिरसाठ यांनी थेट पुन्हा अशी चूक झाली तर महाराष्ट्र पुन्हा पेटून उठेल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी ही तुमच्यावर असेल असंही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे राज्यपाल यांच्या पत्रावर प्रतिक्रिया व्यक्त करताना आताही त्यांनी थेट असा इशाराच दिला आहे.

शिंदे गटाचे नेते संजय शिरसाठ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलताना सांगितले की, शिवाजी महाराज यांच्याबद्दल आम्ही कोणतीही गोष्ट ऐकून घेणार नाही.

त्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आता माफी मागितली तरी यापुढे राज्यपाल असो की आणखी कोणताही राजकीय नेता असो शिवरायांबद्दल कोणतीही गोष्ट ऐकून घेतली जाणार नाही असा सज्जड दमही भाजपला देण्यात आाल आहे.

Follow Us
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी धडाकाच लावलाय, मदरशांबाबत घेतला मोठा
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी धडाकाच लावलाय, मदरशांबाबत घेतला मोठा.
मोटेगावकराने फोडलेल्या पेपरचा उघडपणे घेतला सराव, त्यानंतर व्हिडिओ...
मोटेगावकराने फोडलेल्या पेपरचा उघडपणे घेतला सराव, त्यानंतर व्हिडिओ....
मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या नव्या कार्यकारिणीच्या यादीत धनंजय मुंडे...
मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या नव्या कार्यकारिणीच्या यादीत धनंजय मुंडे....
प्रत्येक गोष्टीमध्ये हिंदू-मुस्लीम...वांद्रे कारवाईनंतर वरुण सरदेसा...
प्रत्येक गोष्टीमध्ये हिंदू-मुस्लीम...वांद्रे कारवाईनंतर वरुण सरदेसा....
वांद्र्यात झोपड्या हटवताना मोठी धुमश्चक्री, पोलीस आणि स्थानिक आमनेसामन
वांद्र्यात झोपड्या हटवताना मोठी धुमश्चक्री, पोलीस आणि स्थानिक आमनेसामन.
“औषध कुठे मिळणार?” सांगलीत मेडिकल बंदमुळे नातेवाईक हतबल
“औषध कुठे मिळणार?” सांगलीत मेडिकल बंदमुळे नातेवाईक हतबल.
प्राध्यापक ते ब्युटी पार्लर, नीट पेपरफुटीचं चक्रावून टाकणारं कनेक्शन
प्राध्यापक ते ब्युटी पार्लर, नीट पेपरफुटीचं चक्रावून टाकणारं कनेक्शन.
पुण्यात तडकाफडकी मोठी कारवाई; RCC क्लासेसवर थेट...
पुण्यात तडकाफडकी मोठी कारवाई; RCC क्लासेसवर थेट....
मोठी खळबळ! राष्ट्रवादीत फूट पडणार? 22-23 आमदार शरद पवारांच्या संपर्कात
मोठी खळबळ! राष्ट्रवादीत फूट पडणार? 22-23 आमदार शरद पवारांच्या संपर्कात.
मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या बैठकीत विलिनीकरणाविषयी मोठा निर्णय....
मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या बैठकीत विलिनीकरणाविषयी मोठा निर्णय.....