AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘….पुढच्या वेळी असं झालं तर, महाराष्ट्र पेटून उठेल’, सरळ-सरळ भाजपला इशारा, कुणी आणि का दिला..?

गुलाबराव पाटील यांनी मंत्री पद गेलं तरी चालेल पण छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल कोणतीही गोष्ट खपवून घेतली जाणार नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते.

'….पुढच्या वेळी असं झालं तर, महाराष्ट्र पेटून उठेल', सरळ-सरळ भाजपला इशारा, कुणी आणि का दिला..?
| Updated on: Dec 12, 2022 | 10:33 PM
Share

मुंबईः गेल्या काही दिवसांपासून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यापासून ते अगदी आता मंत्री चंद्रकात पाटील यांच्यापर्यंत अनेक नेत्यांनी महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. त्यामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले होते. त्यातच आता महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी चंद्रकांत पाटील यांनी वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांच्यावर शाईफेकही झाली होती. तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वक्तव्य केल्या प्रकरणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान यांच्याकडे पत्र लिहून स्पष्टीकरण देत अवमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता असं त्यांनी स्पष्ट केले.

त्यानंतर शिंदे गटाच्या आमदार संजय शिरसाठ यांनी त्यांना आता माफी मागितली असली तरी पुढच्या वेळी अशी चूक झाली तर महाराष्ट्र पेटून उठेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर मित्र पक्षासह विरोधकांनीही त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढविला होता.

त्यावेळी गुलाबराव पाटील यांनी मंत्री पद गेलं तरी चालेल पण छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल कोणतीही गोष्ट खपवून घेतली जाणार नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते. त्यानंतर संजय गायकवाड यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला होता.

त्या घटनेची आठवण करून देत संजय शिरसाठ यांनी थेट पुन्हा अशी चूक झाली तर महाराष्ट्र पुन्हा पेटून उठेल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी ही तुमच्यावर असेल असंही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे राज्यपाल यांच्या पत्रावर प्रतिक्रिया व्यक्त करताना आताही त्यांनी थेट असा इशाराच दिला आहे.

शिंदे गटाचे नेते संजय शिरसाठ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलताना सांगितले की, शिवाजी महाराज यांच्याबद्दल आम्ही कोणतीही गोष्ट ऐकून घेणार नाही.

त्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आता माफी मागितली तरी यापुढे राज्यपाल असो की आणखी कोणताही राजकीय नेता असो शिवरायांबद्दल कोणतीही गोष्ट ऐकून घेतली जाणार नाही असा सज्जड दमही भाजपला देण्यात आाल आहे.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.