AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज ठाकरे आज मोठी घोषणा करणार? सह्याद्री अतिथीगृहावर खलबतं, पडद्यामागे काय घडतंय?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सह्याद्री अतिथीगृह येथे दाखल झाले आहेत. राज ठाकरे यांचं सह्याद्री अतिथीगृहावर जाणं हे सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचं मानलं जात आहे.

राज ठाकरे आज मोठी घोषणा करणार? सह्याद्री अतिथीगृहावर खलबतं, पडद्यामागे काय घडतंय?
| Updated on: Apr 20, 2023 | 5:39 PM
Share

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या प्रचंड घडामोडी घडताना दिसत आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबद्दल अचानक वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं. जवळपास दोन ते तीन दिवस याबाबत प्रचंड चर्चा चालल्या. त्यानंतर अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांसमोर आपली भूमिका मांडली. पण त्यानंतरही भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. याबाबतच्या चर्चा सुरु असतानाच आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर महत्त्वाच्या घडामोडी घडताना दिसत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मनसेचे आमदार राजू पाटील, संदीप देशपांडे, गजानन काळे हे नेते सह्याद्री अतिथीगृह येथे दाखल झाले आहेत. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज ठाकरे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी सह्याद्री अतिथीगृह येथे दाखल झाले आहेत. राज्यात अवकाळी पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालंय. त्यामुळे अवकाळी पावसाची झळ ज्या शेतकऱ्यांना सोसावी लागत आहे. त्यांना लवकरात लवकर मदत मिळावी, या मागणीसाठी राज ठाकरे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी सह्याद्री अतिथीगृह येथे दाखल झाले आहेत.

राज ठाकरे मोठा निर्णय जाहीर करणार?

मुंबई महापालिकेची निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते. या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचा पराभव करायचा असेल तर भाजपला मनसेची गरज लागू शकते. भाजपची एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेशी युती आहे. पण तरीही ठाकरे गटाचा पराभव करण्यासाठी ठाकरे कुटुंबाचे सदस्य म्हणून राज ठाकरे यांचा भाजपला काही प्रमाणात मदत होऊ शकते. याशिवाय गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि मनसेचे संबंध दृढ होताना दिसले आहेत. भाजपच्या अनेक बड्या नेत्यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याची माहिती समोर आली होती. याशिवाय भाजप नेते नारायण राणे आणि राज ठाकरे एका कार्यक्रमात एकाच मंचावर एकत्र आलेले बघायला मिळाले होते. त्यामुळे आजच्या घडामोडी महत्त्वाच्या आहेत.

विशेष म्हणजे मनसे नेते बाबू वागस्कर यांनी दोन दिवसांपूर्वी मोठं विधान केलं होतं. राज ठाकरे दोन दिवसांपूर्वी अचानक पुण्याला गेले होते. ते पुण्याच्या पक्ष कार्यालयात अचानक दाखल झाले होते. त्यामुळे पुण्यातील मनसे नेत्यांची चांगलीच धावपळ झालेली बघायला मिळाली होती. पुण्यात राज ठाकरे यांची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडलेली. त्यानंतर मनसे नेते बाबू वागस्कर यांनी मोठं विधान केलेलं. राज ठाकरे पुढच्या चार-पाच दिवसात मुंबईतून मोठी घोषणा करतील, असं स्पष्ट विधान बाबू वागस्कर यांनी केलं होतं.

राज ठाकरे यांच्या भेटीमागील आणखी काही कारणं

राज ठाकरे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीमागील अनेक कारणं सांगितली जात आहेत. राज ठाकरे बीडीडी चाळीच्या वेगवेगळ्या समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत असल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेलं नुकसान, तसेच सिडको सोडत धारकांचं शिष्टमंडळ 8000 मराठी कुटुंबाच्या घराच्या प्रश्नासाठी राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती मिळत आहे.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.