AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

समुद्राच्या बोगद्यात बुलेट ट्रेन 320 किमीच्या वेगाने धावणार, मुंबईत आल्यावर रेल्वेमंत्र्याचे महत्वाचे अपडेट

Mumbai Ahmedabad Bullet Train | बुलेट ट्रेनसाठी समुद्राच्या खाली 21 KM चा बोगदा करण्यात आला आहे. देशात समुद्रातील बोगद्यातून धावणारी ही पहिली ट्रेन असणार आहे. 21 किलोमीटर लांब बोगद्याला सुरुवात मुंबईतील एचएसआरपासून होणार आहे.

समुद्राच्या बोगद्यात बुलेट ट्रेन 320 किमीच्या वेगाने धावणार, मुंबईत आल्यावर रेल्वेमंत्र्याचे महत्वाचे अपडेट
रेल्वेमंत्री वैष्णव यांनी विक्रोळी शाफ्टमध्ये बोगद्याच्या कामासाठी प्रथम रिमोट-नियंत्रित ब्लास्टिंग केले
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Feb 26, 2024 | 7:18 AM
Share

मुंबई, दि. 25 फेब्रुवारी 2024 | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या बुलेट ट्रेनसंदर्भात महत्वाची बातमी आली आहे. केंद्रीय रेल मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यासंदर्भात अपडेट दिले आहे. मुंबईतील विक्रोळी आणि वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथील बुलेट ट्रेनच्या बांधकाम सुरु असलेल्या जागेवर अश्विनी वैष्णव पोहचले. त्यांनी कामाचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी सांगितले की, हायस्पीड रेल कॉरिडॉरचा पहिला टप्पा जुलै-ऑगस्ट 2026 मध्ये सुरू होईल. यानंतर हळूहळू इतर टप्पे सुरू होतील. पहिला टप्पा सुरत आणि बिलीमोरा दरम्यानचा असणार आहे.

समुद्राच्या खाली 21 KM बोगदा

बुलेट ट्रेनसाठी समुद्राच्या खाली 21 KM चा बोगदा करण्यात आला आहे. देशात समुद्रातील बोगद्यातून धावणारी ही पहिली ट्रेन असणार आहे. 21 किलोमीटर लांब बोगद्याला सुरुवात मुंबईतील एचएसआरपासून होणार आहे. कल्याण सिलफाटा मार्गाने हा बोगदा जाणार आहे. यामधील 7 किलोमीटरचा भाग ठाणे क्रिकवर समुद्राच्या खाली असणार आहे. बोगदा 40 फूट रुंद असणार आहे. त्यात एक अप आणि एक डाउन लाइन असणार आहे. बोगद्यातून ही ट्रेन 320 किलोमीटर प्रती वेगाने धावणार आहे.

महाराष्ट्रातील काम का रखडले

मुंबईच्या दौऱ्यावर आलेले रेल्वेमंत्री वैष्णव यांनी विक्रोळी शाफ्टमध्ये बोगद्याच्या कामासाठी प्रथम रिमोट-नियंत्रित ब्लास्टिंग केले. यावेळी बुलेट ट्रेनचा संपूर्ण 508 किलोमीटर लांबीचा मार्ग कधी सुरु होणार? हे त्यांनी सांगितले नाही. परंतु पहिला टप्पा जुलै-ऑगस्ट 2026 मध्ये सुरु होणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात या प्रकल्पास उशीर होण्याचे कारण त्यांनी सांगितले. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने या योजनेसाठी सहकार्य केले नाही. त्यांनी उद्धव ठाकरे सरकारने हे काम थांबवले नसते तर आतापर्यंत बरेच काम झाले असते, असे स्पष्ट केले.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा मार्ग हा देशातील एकमेव हाय-स्पीड रेल्वे प्रकल्प आहे. जपान सरकारच्या सहाय्याने हा प्रकल्प चालवला जात आहे. बुलेट ट्रेन ताशी 320 किलोमीटरच्या वेगाने धावणार असून त्या मार्गावर 12 स्थानके असणार आहेत. दररोज 35 गाड्या धावू शकणार आहे.

Follow Us
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा'त मोठा भुकंप?
ठाकरेंच्या बैठकीआधी मोठं घडतंय! कोणी नॉट रिचेबल कोणी व्हर्च्युअली
ठाकरेंच्या बैठकीआधी मोठं घडतंय! कोणी नॉट रिचेबल कोणी व्हर्च्युअली उपस्थिती; नेमकी भानगड काय?
मोठी बातमी! ठाकरेंच्या आणखी एका बड्या नेत्याचं तळ्यात-मळ्यात; 'मातोश्र
मोठी बातमी! ठाकरेंच्या आणखी एका बड्या नेत्याचं तळ्यात-मळ्यात; 'मातोश्री'वरील बैठकीआधीच नॉट रिचेबल
40 वर्षानंतर 'कोयना'चं पाणी आटलं; 1952 साली पाण्याखाली गेलेल्या गावाचे
Video | 40 वर्षानंतर 'कोयना'चं पाणी आटलं; 1952 साली पाण्याखाली गेलेलं गाव अवशेषांसह आलं वर; पहा व्हिडीओ
'गरिबांची धारावी का गिळताय? राऊतांचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल
Sanjay Raut On Dharavi | 'गरिबांची धारावी का गिळताय? राऊतांचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल
मोठी अपडेट! मनसे नेते संदीप देशपांडेंचं जैन मुनींना थेट आव्हान; आता
मोठी अपडेट! मनसे नेते संदीप देशपांडेंचं जैन मुनींना थेट आव्हान; आता मुंब्य्रात...
इकडे फडणवीसांचं आमदारांना प्रपोजल, तिकडे ठाकरेंच्या नगराध्यक्षा थेट...
इकडे फडणवीसांचं आमदारांना प्रपोजल, तिकडे ठाकरेंच्या नगराध्यक्षा थेट महाजनांच्या भेटीला; उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढलं?
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताध
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताधाऱ्यांवर बोरची टीका
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत वाघमारेंचा ठाकरे गटाला इशारा
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत ज्योती वाघमारेंचा ठाकरे गटाला थेट इशारा, संजय राऊतांवरही निशाणा
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं विधान; राजकारणात मोठा भूकंप येणार?