AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

समुद्राच्या बोगद्यात बुलेट ट्रेन 320 किमीच्या वेगाने धावणार, मुंबईत आल्यावर रेल्वेमंत्र्याचे महत्वाचे अपडेट

Mumbai Ahmedabad Bullet Train | बुलेट ट्रेनसाठी समुद्राच्या खाली 21 KM चा बोगदा करण्यात आला आहे. देशात समुद्रातील बोगद्यातून धावणारी ही पहिली ट्रेन असणार आहे. 21 किलोमीटर लांब बोगद्याला सुरुवात मुंबईतील एचएसआरपासून होणार आहे.

समुद्राच्या बोगद्यात बुलेट ट्रेन 320 किमीच्या वेगाने धावणार, मुंबईत आल्यावर रेल्वेमंत्र्याचे महत्वाचे अपडेट
रेल्वेमंत्री वैष्णव यांनी विक्रोळी शाफ्टमध्ये बोगद्याच्या कामासाठी प्रथम रिमोट-नियंत्रित ब्लास्टिंग केले
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Feb 26, 2024 | 7:18 AM
Share

मुंबई, दि. 25 फेब्रुवारी 2024 | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या बुलेट ट्रेनसंदर्भात महत्वाची बातमी आली आहे. केंद्रीय रेल मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यासंदर्भात अपडेट दिले आहे. मुंबईतील विक्रोळी आणि वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथील बुलेट ट्रेनच्या बांधकाम सुरु असलेल्या जागेवर अश्विनी वैष्णव पोहचले. त्यांनी कामाचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी सांगितले की, हायस्पीड रेल कॉरिडॉरचा पहिला टप्पा जुलै-ऑगस्ट 2026 मध्ये सुरू होईल. यानंतर हळूहळू इतर टप्पे सुरू होतील. पहिला टप्पा सुरत आणि बिलीमोरा दरम्यानचा असणार आहे.

समुद्राच्या खाली 21 KM बोगदा

बुलेट ट्रेनसाठी समुद्राच्या खाली 21 KM चा बोगदा करण्यात आला आहे. देशात समुद्रातील बोगद्यातून धावणारी ही पहिली ट्रेन असणार आहे. 21 किलोमीटर लांब बोगद्याला सुरुवात मुंबईतील एचएसआरपासून होणार आहे. कल्याण सिलफाटा मार्गाने हा बोगदा जाणार आहे. यामधील 7 किलोमीटरचा भाग ठाणे क्रिकवर समुद्राच्या खाली असणार आहे. बोगदा 40 फूट रुंद असणार आहे. त्यात एक अप आणि एक डाउन लाइन असणार आहे. बोगद्यातून ही ट्रेन 320 किलोमीटर प्रती वेगाने धावणार आहे.

महाराष्ट्रातील काम का रखडले

मुंबईच्या दौऱ्यावर आलेले रेल्वेमंत्री वैष्णव यांनी विक्रोळी शाफ्टमध्ये बोगद्याच्या कामासाठी प्रथम रिमोट-नियंत्रित ब्लास्टिंग केले. यावेळी बुलेट ट्रेनचा संपूर्ण 508 किलोमीटर लांबीचा मार्ग कधी सुरु होणार? हे त्यांनी सांगितले नाही. परंतु पहिला टप्पा जुलै-ऑगस्ट 2026 मध्ये सुरु होणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात या प्रकल्पास उशीर होण्याचे कारण त्यांनी सांगितले. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने या योजनेसाठी सहकार्य केले नाही. त्यांनी उद्धव ठाकरे सरकारने हे काम थांबवले नसते तर आतापर्यंत बरेच काम झाले असते, असे स्पष्ट केले.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा मार्ग हा देशातील एकमेव हाय-स्पीड रेल्वे प्रकल्प आहे. जपान सरकारच्या सहाय्याने हा प्रकल्प चालवला जात आहे. बुलेट ट्रेन ताशी 320 किलोमीटरच्या वेगाने धावणार असून त्या मार्गावर 12 स्थानके असणार आहेत. दररोज 35 गाड्या धावू शकणार आहे.

Follow Us
हैदराबाद गॅझेटवर शिवेंद्रराजे भोसले यांचा मोठा खुलासा; मराठा आरक्षणा..
हैदराबाद गॅझेटवर शिवेंद्रराजे भोसले यांचा मोठा खुलासा; मराठा आरक्षणासह शेतकरी मदतीबाबत काय म्हणाले?
जरांगेंच्या निर्णयाचे स्वागत, त्यांची समाजाला गरज, बजरंग सोनवणेंचं...
Bajrang Sonavane | जरांगेंच्या निर्णयाचे स्वागत, त्यांची समाजाला गरज, बजरंग सोनवणेंचं मोठं वक्तव्य
एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड, गुजरातच्या...
एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड, गुजरातच्या वडनगरहून रस्ते मार्गाने रवाना
शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठाम, फडणवीसांचं मोठं आश्वासन
Devendra Fadnavis | शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठाम, फडणवीसांचं मोठं आश्वासन; 5 ऑक्टोबरनंतर पंचनामे होणार
उद्धव ठाकरे गणेश महासंघ कार्यालयाच्या भेटीला, छत्रपती संभाजीनगरात...
उद्धव ठाकरे गणेश महासंघ कार्यालयाच्या भेटीला, छत्रपती संभाजीनगरात मोठ्या हालचाली
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरमध्ये तुमसे ना हो पाएगा...
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरमध्ये तुमसे ना हो पाएगा आंदोलनाचा समारोप
सिद्धार्थ गोरे प्रकरणात जिंदाल कंपनी अडचणीत
Nashik | सिद्धार्थ गोरे प्रकरणात जिंदाल कंपनी अडचणीत, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे प्रशासनाचे आदेश
धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांना ताब्यात घेतल्याने गोंधळ; कैलास पाटील...
धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांना ताब्यात घेतल्याने गोंधळ, ठाकरेंचे आमदार थेट...
मराठवाड्याच्या रखडलेल्या प्रकल्पांवरून ठाकरे सेना आक्रमक
Uddhav Thackeray : मराठवाड्याच्या रखडलेल्या प्रकल्पांवरून ठाकरे सेना आक्रमक, संभाजीनगरात आंदोलन
धाराशिवमध्ये अजब कारभार; जिल्ह्यातील विकास समितीच्या बैठकीत...
धाराशिवमध्ये अजब कारभार; जिल्ह्यातील विकास समितीच्या बैठकीत... नेमकं काय घडतंय?