AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Corona : मुंबईत कोरोनाच्या सक्रिय रुग्णसंख्येत वाढ! लक्षणं असल्यास RT-PCR चाचणी करा, डॉक्टरांना BMCचे निर्देश

Mumbai Corona Update : कोरोना नियंत्रणात जरी असला तरी गेल्या दोन आठवड्यात सक्रिय रुग्णांची संख्या वाढतेय.

Mumbai Corona : मुंबईत कोरोनाच्या सक्रिय रुग्णसंख्येत वाढ! लक्षणं असल्यास RT-PCR चाचणी करा, डॉक्टरांना BMCचे निर्देश
मुंबईत उच्चभ्रु वस्तीत कोरोना रूग्णाच्या संख्येत वाढImage Credit source: TV9
सिद्धेश सावंत
सिद्धेश सावंत | Updated on: Apr 25, 2022 | 6:56 AM
Share

मुंबई :मुंबई कोरोना रुग्णवाढीचा (Mumbai Corona Cases) कालावधी घटला आहे. रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीत घट नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जाते आहे. मुंबई कोरोना (Mumbai Corona) नियंत्रणात जरी असला तरी गेल्या दोन आठवड्यात सक्रिय रुग्णांची संख्या वाढतेय. 10 एप्रिल रोजी 305 वर असलेली रुग्णसंख्या आता 23 एप्रिलपर्यंत 503 वर जाऊन पोहोचली आहे. मुंबईत मार्चअखएर कोरोना रुग्णांची सर्वात कमी नोंद होत होती. दिवसाला दहा हजारपेक्षा जास्त चाचण्याही केल्या जात होत्या. मात्र गेल्या दहा दिवसांत पुन्हा एकदा अल्प प्रमाणात का होईना, रुग्णवाढीनं डोकं वर काढलंय. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच मुंबईसह राज्यातील कोरोना निर्बंध हटवण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा एकदा सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क (Mask) या दोन बाबींना हरताळ फासला जात असल्याचं चित्र आहे. कोणतीही बंधनं आणि नियम नसल्यानं गर्दी होण्याचं प्रमाणही वाढलंय. त्यामुळेच रुग्ण वाढत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणंय. दरम्यान, नव्या व्हेरिएंटमुळे रुग्णवाढ होत नसल्याचंही बीएमसीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

थोडक्यात, पण महत्त्वाचं

  1. 1 एप्रिल रोजी 32 नवे रुग्ण आढळले, तेव्हा सक्रिय रुग्संख्या 247
  2. 10 एप्रिल रोजी 35 नवे रुग्ण, सक्रिय रुग्णसंख्या 305
  3. 15 एप्रिल रोजी 44 नवे रुग्ण, सक्रिय रुग्ण 341

तर RT-PCR कराच..

दरम्यान, खासगी डॉक्टरांकडे असलेल्या रुग्णामध्ये कोणतीही कोरोना सदृश्य लक्षणं आढळली तर तातडीनं रुग्णाला RT-PCR चाचणी करण्यास सांगा, असे निर्देश पालिकेकडून देण्यात आले आहे. संबंधित रुग्णांना पालिकेच्या मोफत कोविड चाचणी केंद्रावर पाठवावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.

रविवारची कोरोना आकडेवारी

गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या वाढतेय. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय गेण्यात आल्याचं पालिकेचे अतिरीक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी म्हटलंय. सद्यस्थितीत बीएमसीच्या 266 केंद्रांवर मोफच चाचणीची सोय केलेली आहे.

बुस्टर डोस हवाच…

दुसरीकडे कोरोना व्हायरलचा ओमिक्रॉन व्हेरीएटपासूनचा धोका टाळायचा असेल, तर बुस्टर डोस घेणं आवश्यक आहे, असं तज्ज्ञांनी म्हटलंय. नॅशनल इन्स्टीच्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या शास्त्रज्ञांनी बुस्टर डोसची गरज व्यक्त केली.

ओमिक्रॉनसारख्या घातक व्हेरिएंट बीए-टू ला टक्कर द्यायची असेल, तर बुस्टर डोसशिवाय पर्याय नाही, असं सांगितलं जातंय. कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचा डोस घेतलेल्या रुग्णांमध्ये एन्टीबॉडीची पातळी सहा महिन्यानंतर घटू लागले. त्यामुळे बुस्टर डोस गरजेचा मानला जातोय.

पाहा व्हिडीओ : हॉस्पिटलच्या बिलावरुन राडा

Follow Us
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम