Mumbai Local मधून पडून 22 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू! गोरेगाव-मालाडदरम्यानची घटना, गर्दीमुळे जीव गेला!

Mumbai Local Train youth death : गर्दीमुळे दरवाजामध्ये लटकलेल्या रतनचा हात सुटला आणि जे व्हायला नको होतं, ते घडलं. रेल्वे रुळांशेजारी असलेल्या खाबांला जोरदार धडक बसून रतला जबर मार बसला. यात रतन विश्वकर्मा हा तरुण जागीच ठार झाला.

Mumbai Local मधून पडून 22 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू! गोरेगाव-मालाडदरम्यानची घटना, गर्दीमुळे जीव गेला!
22 वर्षीय तरुणाचा मुंबई लोकलमधून पडून मृत्यूImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 23, 2022 | 12:45 PM

मुंबई : मुंबईत लोकल (Mumbai Local Death) प्रवासादरम्यान लोकलमधून पडून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. 22 वर्षीय तरुणाचा लोकलमधून पडून दुर्दैवी अंत झाला आहे. खचाखच भरलेल्या लोकल ट्रेनमधून दरवाजातून लटकून प्रवास करणं या तरुणाच्या जीवावर बेतलंय. गोरेगाव ते मालाड (Between Malad & Goregaon) रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली. बोरीवली जीआरपीनं (Boriwali GRP) याप्रकरणी अधिक चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. हा तरुण नालासोपाराला जायला निघाला होता. कामावरुन परतत असताना ही घटना घडली. कामावरुन घरी जात असतानाच वाटेल या तरुणाला काळानं गाठलं आहे. मुंबई लोकलमधून पडून जागीच या तरुणाचा जीव गेल्यानं हळहळ व्यक्त केली जातेय. अनेकदा गर्दीमुळे रेल्वे प्रवास हा धोक्याचा बनतो. मुंबई लोकलच्या गर्दीमुळे बहुतांश प्रवासी जीव धोक्यात घालून दरवाजात लटकून प्रवास करतात.

नेमका अपघात कसा झाला?

मुंबई लोकलमधून पडून दगावलेल्या तरुणाचं नाव रतन विश्वकर्मा असं आहे. रतन हा नालासोपाराला जायला निघाला होता. आपलं काम आटोपून अंधेरीहून त्यानं ट्रेन पकडली होती. लोकलला प्रचंड गर्दी होती. मात्र तरिही प्रवाशांनी खच्चून भरलेल्या ट्रेनमध्ये जागा न मिळाल्यानं रतन हा दरवाजात लटकला होता.

गर्दीमुळे दरवाजामध्ये लटकलेल्या रतनचा हात सुटला आणि जे व्हायला नको होतं, ते घडलं. रेल्वे रुळांशेजारी असलेल्या खाबांला जोरदार धडक बसून रतला जबर मार बसला. यात रतन विश्वकर्मा हा तरुण जागीच ठार झाला.

रेल्वे बळी रोखण्याचं आव्हान!

रेल्वे प्रशासनाकडूनही अनेकदा दरवाजात लटकून प्रवास करु नये, यासाठी वारंवार सूचना दिल्या जातात. मात्र गर्दीच्या वेळी प्रवाशांचाही नाईलाज होतो. त्यामुळे दरवाजात लटकण्याशिवाय प्रवाशांसमोरही गत्यंतर उरत नाहीत.

याआधीही अनेकदा मुंबईत लोकलमधून पडून प्रवाशांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. आता आणखी एका तरुणाचा ऐन उमेदीच्या काळात लोकलमधून पडून दुर्दैवी अंत झाल्यानं हळहळ व्यक्त केली जातेय.

लोकलप्रवासादरम्यान या गोष्टी टाळा!

  1. दरवाजात लटकून प्रवास करु नका!
  2. शक्यतो डब्यातील मधल्या जागेत थांबण्याऐवजी गाडीत आतल्या बाजूला जाण्याचा प्रयत्न करा
  3. गर्दी असल्यास शक्यतो प्रवास करणं टाळा
  4. चालत्या लोकलमध्ये चढण्या किंवा उतरण्याचा प्रयत्न करु नका
  5. लोकलच्या दरवाजातील पायरीवर उभं राहुन प्रवास करु नका

संबंधित बातम्या :

CCTV | वृद्ध दाम्पत्याची Brake Fail झालेली बाईक धावत जाऊन पकडली, पुण्यातील तरुणाचं प्रसंगावधान

Jitendra Awhad on ED: तर मी आत्महत्या करणार, ईडी कारवाईच्या धसक्यानं मंत्री जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य

Video | ‘मला त्यानं आई-बहिणीवरुन शिव्या दिल्या, पोलिस असूनही मी हतबल, काहीच करु शकत नव्हतो’

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.