AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Train Accident : मुंब्रा-दिवा स्टेशन दरम्यान 8 प्रवाशांचे जीव गेल्यानंतर रेल्वे बोर्डाने घेतला मोठा निर्णय

Mumbai Train Accident : मुंब्रा-दिवा स्टेशन दरम्यान हा अपघात झाला. एक गाडी कसाऱ्याकडे जात होती, एक छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे जात होती. ट्रेन फास्ट होती. 8 लोक पडले. त्यांना रुग्णालयात नेले. त्यांच्या प्रकृतीची माहिती रुग्णालयाकडून येणार आहे.

Mumbai Train Accident : मुंब्रा-दिवा स्टेशन दरम्यान 8 प्रवाशांचे जीव गेल्यानंतर रेल्वे बोर्डाने घेतला मोठा निर्णय
Mumbai Train Accident
| Updated on: Jun 09, 2025 | 11:33 AM
Share

आज मुंबईत एक भीषण रेल्वे अपघात झाला. यात 8  रेल्वे प्रवाशांनी आपले प्राण गमावले. कसाऱ्याहून सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमधून पडून आठ प्रवाशांचा मृत्यू झाला. सकाळी नऊ वाजताच्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली. लोकलच्या दरवाजाला लटकलेले प्रवासी जवळून जाणाऱ्या एक्स्प्रेसला घासले गेले. त्यातून हा भीषण अपघात झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. त्याशिवाय काही प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. एका प्रवाशाने दिलेल्या माहितीनुसार, प्रवासी फुटबोर्डवरून प्रवास करत होते. एकमेकांना त्यांच्या बॅगा लागल्यामुळे किंवा इतर गोष्टीमुळे ते ट्रेनमधून पडले असावेत.

या भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर आता रेल्वे बोर्डाने निर्णय घेतला आहे. पहिला निर्णय म्हणजे नवीन येणाऱ्या गाड्या या ऑटोमॅटिक डोअर क्लोजरसोबत असतील. 238 एसी लोकल मुंबई सबर्बनसाठी घेतल्या आहेत. ज्या गाड्या घेतल्या आहेत, त्या ऑटोमॅटिक डोअर क्लोजर सिस्टिमने येणार आहेत.

9.50 वाजता रुग्णवाहिका पोहोचली

दुसरा निर्णय असा आहे की, आयसीएफद्वारे एक्झिस्टिंग लोकलला रेट्रो फिकमेंटच्या माध्यमातून दरवाजे बंद करण्याची सिस्टिम लावणार आहोत. असा निर्णय आता घेतला आहे. 8 लोक लोकलमधून पडले. त्यांना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी रुग्णवाहिका मागवली होती. 9.30 वाजता घटना घडली. 9.50 वाजता रुग्णवाहिका पोहोचली. सर्व व्यक्तींना रुग्णालयात नेले. ते लोकलच्या फुटबोर्डवरून प्रवास करत होते. पुन्हा अशा घटना घडू नये म्हणून आपोआप दरवाजा बंद होणाऱ्या ट्रेन रेल्वेच्या सेवेत असणार आहे.

तिसऱ्या आणि चौथ्या लाईनचा प्लान

मुंब्रा-दिवा स्टेशन दरम्यान हा अपघात झाला. एक गाडी कसाऱ्याकडे जात होती, एक छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे जात होती. ट्रेन फास्ट होती. 8 लोक पडले. त्यांना रुग्णालयात नेले. त्यांच्या प्रकृतीची माहिती रुग्णालयाकडून येणार आहे. मध्य रेल्वेने कल्याणपासून कसाऱ्यापासून तिसऱ्या आणि चौथ्या लाईनचा प्लान केला आहे. तसेच कल्याणपासून कर्जतपर्यंत तिसऱ्या चौथ्या लाईनचाही प्लान केला आहे. लोकलची गर्दी कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

प्रवासी पडले त्या दोन्ही लोकल ट्रेन

तसेच दादर पासून किंवा दिव्यापर्यंत सीएसएमटी पर्यंत पाचव्या सहाव्या लाईनची प्लानिंग केली आहे. ही प्लानिंक कुर्ल्यापर्यंत पूर्ण झाली आहे. त्यापुढे जमीन मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच 15 डब्ब्यांच्या गाड्या वाढवण्याचा आपला प्रयत्न सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर आपण सिग्नल सिस्टिम अपडेट केली आहे. पायाभूत सुविधाही आपण अपग्रेड करत आहोत. पायाभूत सुविधा अपडेट केल्यावर लोकलच्या फेऱ्याही वाढवण्यात येणार आहे. दोन्ही लोकल ट्रेन होत्या. पुष्पक एक्सप्रेस नव्हती. लोकल गाड्यांमध्ये ही घटना घडली आहे.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.