AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईतील तासाभराचा प्रवास 22 मिनिटांत, मुंबईकरांना मिळणार पुढील महिन्यापासून ही सुविधा

mumbai metro route 3: गेल्या 100 वर्षांतील पावसाचा अभ्यास करून मेट्रो-3 ची निर्मिती करण्यात आली आहे. या ठिकाणी पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबईत मुसळधार पाऊस होऊनही मेट्रोपर्यंत पाणी पोहोचणार नाही.

मुंबईतील तासाभराचा प्रवास 22 मिनिटांत, मुंबईकरांना मिळणार पुढील महिन्यापासून ही सुविधा
मुंबई मेट्रो
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Sep 26, 2024 | 11:22 AM
Share

मुंबईतील प्रवास हा जिकारीचा असतो. लोकलमधून नियमित प्रवास करणे मुंबईकरांसाठी एक दिव्यच असते. त्यानंतर मेट्रो सेवा आल्यावर मुंबईकरांचा प्रवास सुखाचा झाला आहे. आता मुंबई मेट्रोचा तिसरा टप्पा सुरु होणार आहे. यामुळे एका तासाचा प्रवास केवळ 22 मिनिटांत होणार आहे. मुंबई मेट्रो रेल्वे कॉरपोरेशनचे (एमएमआरसी) एमडी अश्विनी भिडे यांनी सांगितले की, आरे ते बीकेसी हा टप्पा ऑक्टोंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरु होणार आहे. यामुळे हा प्रवास केवळ 22 मिनिटांत होणार आहे. सध्या या प्रवाशासाठी जवळपास एक तास लागतो. मेट्रो रेल्वे सेफ्टी बोर्डने पहिल्या टप्प्यासाठी सुरक्षा तपासणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तसेच आता स्थानकांसाठी सीएमआरएस प्रमाणपत्र मिळविण्यासाठी कागदपत्रे तयार केली जात आहेत.

आरे ते बीकेसी मेट्रो रेल्वे दरम्यान 9 स्टेशन आहेत. त्याचे काम पूर्ण झाले आहे. पहिला टप्पा 12.44 किमीचा असून त्यावर मेट्रोच्या 96 फेऱ्या होणार आहे. सकाळी 6.30 ते रात्री 10.30 दरम्यान मेट्रोमधून प्रवास करता येणार आहे. या मार्गावर दर 6.30 मिनिटांनी मेट्रो ट्रेनची सुविधा असेल. एकदा संपूर्ण मार्गावर सेवा सुरू झाल्यानंतर ही वेळ 6 मिनिटांची होणार आहे.

किती असणार भाडे

मेट्रो-3 च्या पहिल्या टप्प्यात प्रवास करण्यासाठी प्रवाशांना 10 ते 50 रुपये मोजावे लागणार आहेत. संपूर्ण मार्गावरून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना सुमारे 70 रुपये खर्च करावे लागणार आहेत. मार्च 2025 पर्यंत या मार्गाचे काम पूर्ण होणार आहे.

एमडी अश्विनी भिडे यांनी सांगितले की, गेल्या 100 वर्षांतील पावसाचा अभ्यास करून मेट्रो-3 ची निर्मिती करण्यात आली आहे. या ठिकाणी पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबईत मुसळधार पाऊस होऊनही मेट्रोपर्यंत पाणी पोहोचणार नाही. मेट्रो-3 कॉरिडॉर शहरातील अनेक महत्त्वाच्या संकुलांजवळून जाणार आहे. एकदा संपूर्ण मार्ग कार्यान्वित झाल्यानंतर सुमारे 6.30 लाख वाहने रस्त्यावरून कमी होण्याची अपेक्षा आहे. मेट्रो-1 आणि मेट्रो-7 सह कनेक्टिव्हिटीमुळे इतर मेट्रो मार्गांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवासही सुकर होणार आहे.

Follow Us
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच,बंड करण्याआधी
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच, बंड करण्याआधीच...ऑपरेशन लोटसबाबत मोठी माहिती समोर!
राजकीय हालचालींना वेग! ठकारेंचे चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं
राजकीय हालचालींना वेग! ठकारे सेनेतील चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं घडणार?
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला...
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला... नागपूरमध्ये डोकं चक्रावणारा प्रकार
काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर... गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकद
Chandrapur | काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर...  गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकदा चिघळणार
महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
Chandrashekhar Bawankule | महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळं; संशयाचा काटा
Sanchita Ugle Case | तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळलं; संशयाचा काटा नेमका कुणावार
एकही मत फुटता कामा नये; महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
एकही मत फुटता कामा नये; विधान परिषद निवडणुकीत महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
मोठी बातमी! पांढऱ्या कोटामागचा काळा चेहरा? उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केल
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केला अन्...त्या कृतीची सगळीकडे चर्चा!
मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप..
Manda Mhatre | मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप, भाजपाचे दोन्ही नेत्यांमध्ये मोठा वाद!