AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पालेभाज्या शिजवण्यापूर्वी ‘या’ गोष्टी आठवणीत कराच… नाहीतर आरोग्य येईल धोक्यात

आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेक जण छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्षच देत नाहीत. जसं की पालेभाज्या शिजवण्यापूर्वी त्या स्वच्छ कशा करायच्या... काही लहान चुकांमुळे तुमचं आरोग्य धोक्यात येईल...

पालेभाज्या शिजवण्यापूर्वी 'या' गोष्टी आठवणीत कराच... नाहीतर आरोग्य येईल धोक्यात
| Updated on: Mar 17, 2026 | 3:23 PM
Share

हिरव्या भाज्या आपल्या आरोग्यासाठी खूप चांगल्या असतात. पण त्या शिजवण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे. बरेच लोक बाजारातून आणलेल्या पालेभाज्या थेट कापून शिजवतात. पण असे करणे ही एक मोठी चूक आहे. कारण काही हिरव्या भाज्या मातीत वाढतात. त्यामुळे त्यांना माती चिकटकलेली असते. त्या न धुता शिजवल्याने, त्यातील माती आणि अशुद्धी आपल्या शरीरात प्रवेश करून आजारपण आणू शकतात. जे आपल्या आरोग्यासाठी घातक आहे म्हणून, त्या कापण्यापूर्वी आणि शिजवण्यापूर्वी एक-दोन वेळा धुणे उत्तम.

पाने काढून टाका: जर तुम्ही पालेभाज्या स्वच्छ करत असाल तर, प्रथम हाताने पाने काढून घ्या. नंतर ती झटकून स्वच्छ करा. म्हणजे त्यावरील कीटक गळून पडतील. आता एका मोठ्या भांड्यात पाणी भरा आणि त्यात पालेभाज्या थोड्या थोड्या करून टाका आणि धुवा. प्रथम अर्ध्या पालेभाज्या पाण्यात ३-४ वेळा धुवा. यामुळे त्यावरील धूळ आणि घाण पूर्णपणे निघून जाईल. मग त्या कापून शिजवा.

बेकिंग सोडा: जर तुम्हाला भाज्यांच्या पानांना चिकटलेले कीटक काढायचे असतील, तर एक चमचा बेकिंग सोडा पाण्यात मिसळा. आता त्यात भाज्या घालून 15 मिनिटे तशाच ठेवा. त्यानंतर त्या स्वच्छ पाण्याने दोन-तीन वेळा धुवा. कीटक सहज निघून जातील. तुमची इच्छा असल्यास, तुम्ही भाज्या व्हिनेगरच्या पाण्यातही भिजवून ठेवू शकता.

जाळीची पिशवी: जर तुम्हाला पालेभाज्या सहजपणे स्वच्छ करायच्या असतील, तर जाळीच्या पिशवीचा वापर करा. पालेभाज्या चिरून पिशवीत ठेवा. एका मोठ्या पातेल्यात किंवा बादलीत पाणी भरा आणि त्यात जाळीची पिशवी बुडवा. यामुळे पालेभाज्यांवरील सर्व धूळ, घाण आणि कीटक निघून जातील.

मिठाने धुवा: पालेभाज्या कापून मिठाच्या पाण्यात धुवा. यामुळे पानांना चिकटलेले कीटकही निघून जातील. पालेभाज्या धुण्यासाठी, तुमच्याकडे असलेले एक मोठे भांडे घ्या. तुम्ही कापलेल्या सर्व पालेभाज्या एकाच वेळी धुण्याऐवजी, त्यांचे 3 भाग करा आणि पाण्याने 2 – 3 वेळा धुवा. या सोप्या टिप्सचे पालन केल्याने, तुम्हाला त्यातील पोषक तत्वे तर मिळतीलच, शिवाय तुम्ही निरोगीही राहाल.

Follow Us
ई केवायसीच्या नावाखाली महिलेकडून शरीर सुखाची मागणी, जळगावातील घटनेने ख
ई केवायसीच्या नावाखाली महिलेकडून शरीर सुखाची मागणी, जळगावातील घटनेने ख.
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! पुढील 18 तास काही भागातील पाणी पुरवठा बंद
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! पुढील 18 तास काही भागातील पाणी पुरवठा बंद.
आढावा बैठकीत शेजारी बसूनही शिरसाट, सत्तारांचा अबोला, भर मंचावर...
आढावा बैठकीत शेजारी बसूनही शिरसाट, सत्तारांचा अबोला, भर मंचावर....
एका युगाचा अंत! अजरामर गीतांना स्वर देणाऱ्या आशाताईंचा अल्पपरिचय
एका युगाचा अंत! अजरामर गीतांना स्वर देणाऱ्या आशाताईंचा अल्पपरिचय.
आशा भोसले यांना अशोक सराफ यांनी वाहिली आदरांजली, म्हणाले त्यांचा आवाज
आशा भोसले यांना अशोक सराफ यांनी वाहिली आदरांजली, म्हणाले त्यांचा आवाज.
सुरांचा अमर आवाज हरपला... आशा भोसलेंच्या निधनावर देवेंद्र फडणवीसांचं भ
सुरांचा अमर आवाज हरपला... आशा भोसलेंच्या निधनावर देवेंद्र फडणवीसांचं भ.
संगीत क्षेत्रातला जादूई स्वर हरपला! ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निध
संगीत क्षेत्रातला जादूई स्वर हरपला! ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निध.
संजय राऊतांनी केले पाकिस्तानचे कौतुक, नेमकं काय म्हणाले? पाहा
संजय राऊतांनी केले पाकिस्तानचे कौतुक, नेमकं काय म्हणाले? पाहा.
मुंबईसह उपनगरात CNG च्या किमती वधारल्या, किती रुपयांवर पोहोचले दर?
मुंबईसह उपनगरात CNG च्या किमती वधारल्या, किती रुपयांवर पोहोचले दर?.
नाशिकमध्ये महिलांशी गैरवर्तन करणाऱ्या संशयितांचे मोबाईल जप्त, सापडलेल्
नाशिकमध्ये महिलांशी गैरवर्तन करणाऱ्या संशयितांचे मोबाईल जप्त, सापडलेल्.