AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माणसं महत्त्वाची की कबुतरं! जिथे राहता तिथेच…; मनसेचा खोचक सल्ला

मुंबईतील कबुतरखान्यांच्या बंदीबाबत मनसेने आपले मत स्पष्ट केले आहे. दादरच्या कबुतरखान्याच्या बंदिसंबंधी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मनसेला मान्य आहे. बाळा नांदगावकर यांनी जनआरोग्याला प्राधान्य देण्याचा आग्रह धरला आहे.

माणसं महत्त्वाची की कबुतरं! जिथे राहता तिथेच...; मनसेचा खोचक सल्ला
raj thackeray kabutarkhana 1
| Updated on: Aug 12, 2025 | 1:32 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून कबुतरखाना बंदी प्रकरणाचा वाद शिगेला पोहोचला आहे. कबुतरखान्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होतात. याबद्दलची अनेक उदाहरणं समोर आली आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेने हे कबुतरखाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार दादरचा प्रसिद्ध कबुतरखाना ताडपत्री लावून बंद करण्यात आला होता. दादर कबुतरखान्यासंबंधी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली विशेष रीट पिटीशन सर्वोच्च न्यायालयाद्वारे फेटाळण्यात आली आहे. त्यामुळे कबुतरखान्यासंबंधी जो काही निर्णय व्हायचा असेल तो मुंबई उच्च न्यायालयामध्ये होईल, असे नमूद करण्यात आले आहे. आता याबद्दल मनसेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना कबुतरखान्याच्या वादाबद्दल प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नावर त्यांनी स्पष्टपणे उत्तर दिले. माणसं महत्त्वाची आहेत की कबुतरं महत्त्वाची आहेत, याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे कोर्टाने जो निर्णय घेतलेला आहे, आम्ही त्या निर्णयाच्या बाजूने आहोत, असे बाळा नांदगावकर म्हणाले.

माणसं महत्त्वाची की कबुतरं महत्त्वाची

कोणत्याही जैन मुनींनी शस्त्र उचलण्याची भाषा केलेली नाही. निलेश जैन मुनी नावाचे एक सन्माननीय मुनी आहेत, तेच एकटे असं बोलले आहेत. तसेच सुप्रीम कोर्टाकडेही त्यांनी जी याचिका दाखल केली, ती त्यांनी दाखल करुन घेतलेली नाही. त्यासोबतच माझं असं म्हणणं होतं की यात माणसं महत्त्वाची आहेत की कबुतरं महत्त्वाची आहेत, याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. शेवटी माणसं जगली तर कबुतरांना खायला घालतील ना, असा खोचक टोला बाळा नांदगावकर यांनी लगावला.

राहता त्याच सोसायटीत बाजूला एखादा कबुतरखाना सुरु करा

पण जर कबुतरांमुळे आमचा जीव धोक्यात येणार असेल तर त्याचा माणुसकीच्या दृष्टीकोनातून विचार करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे मी असं म्हणालो होतो की मला असं वाटतंय की खरंच जीवदया आणि भूतदया आम्हालाही करावीशी वाटते. आम्हीही करतो. पण याचा अर्थ असा नाही की लोकांना त्रास होतो आणि आपण जीवदया भूतदया करत राहायचे. त्यापेक्षा ज्या ज्या सोसायटीत आपण आपले फ्लॅट घेता, त्या त्या सोसायटीत आपण स्विमिंगपूल, जिम यांसारख्या गोष्टी घेतो. मग त्याच सोसायटीत बाजूला एखादा कबुतरखाना सुरु केला, तर काय बिघडलं. तो करा, म्हणजे जवळच्या जवळ तुम्हाला दाणापाणी देता येईल, असेही बाळा नांदगावकर म्हणाले.

आम्ही निर्णयाच्या बाजूने

यात ८० ते ९० टक्के जैन समाज विरोधात आहे. कारण जैन समाजाला कळलं आहे. एका डॉक्टरांनी काय नुकसान होतात ते सांगितलेले आहेत. त्यामुळे माणसांना महत्त्वं देणं, आरोग्याची काळजी घेणं, पर्यावरणाला नुकसान होणार नाही, हे पण करणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे कोर्टाने जो निर्णय घेतलेला आहे, आम्ही त्या निर्णयाच्या बाजूने आहोत, असे बाळा नांदगावकर यांनी सांगितले.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.