AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Rain | मुंबईत जोरदार पाऊस, ‘हा’ मुख्य आणि महत्वाचा मार्ग बंद

Mumbai Rains Updates | मुंबईला पावसाने चांगलंच झोडपून काढलंय. पावसाची मुंबईतील विविध भागात जोरदार बॅटिंग सुरु आहे. या पावसामुळे मुंबईतील सध्याच्या घडीचा महत्वाचा मार्ग बंद करण्यात आला आहे.

Mumbai Rain | मुंबईत जोरदार पाऊस, 'हा' मुख्य आणि महत्वाचा मार्ग बंद
प्रातिनिधिक फोटोImage Credit source: ANI
| Updated on: Jun 28, 2023 | 2:55 PM
Share

मुंबई | मुंबई शहर आणि आसपासच्या परिसरात अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर जून महिन्यातील शेवटच्या काही दिवसांमध्ये मान्सूनची एन्ट्री झाली. पावसाने लेट पण थेट एन्ट्री घेतली. जून महिन्याच्या या अखेरच्या आठवड्यापासून जोरदार पाऊस बरसतोय. अशातच आता पावसाने आज 28 जून बुधवारी सकाळपासून मुंबईतील विविध ठिकाणी हजेरी लावली आहे. पावसाने मुंबई आणि ठाणे शहराला चांगलंच झोडपून काढलंय. या पावसामुळे मुंबईतील अनेक भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे मुंबईतील महत्वाचा मार्ग आता बंद करण्यात आला आहे.

पावसामुळे अंधेरी सबवे वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. अंधेरी परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. शनिवारी 24 जून रोजी झालेल्या पावसामुळे या अंधेरी सबवेत मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. या पाण्यात अनेक गाड्या अडकल्या होत्या. त्यामुळे आता कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेत पालिका प्रशासनाने हा अंधेरी सबवे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

दर पावसाळ्यात थोडाशा पाण्यामुळे हा अंधेरी सबवे भरतो. परिणामी वाहतूक बंद करावी लागते. यंदा महापालिका प्रशासनाने अंधेरी सबवेतील पाण्याचा निचरा करण्यासाठी मोठी तयारी केल्याचा दावा केला होता. मात्र पालिकेचा हा दावा पावसाच्या पाण्यासोबत वाहून गेल्याचं दिसतंय.

मुंबईकरांना मनस्ताप

अंधेरी पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या गोखले पूलाचं काम गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु आहे. त्यामुळे अंधेरी पूर्व-पश्चिम अशी येजा करण्यासाठी अंधेरी सबवे या मार्गे प्रवास केला जातो. पण पावसामुळे हा सबवे बंद करण्यात आलाय. त्यामुळे आता जोवर पाण्याचा निचरा होत नाही, तोवर अंधेरी सबवे मार्ग खुला केला जाणार नाही. त्यामुळे आता मुंबईकरांना जेव्हीएलआर (ट्रॉमा सेंटर), कॅप्टन गोर उड्डानपूल (विलेपार्ले) आणि मिलन सबवे या पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागेल.

पालिका प्रशासन अलर्ट

मुंबईतील पावसाच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन अलर्ट झालंय.पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी मिठी नदी परिसराची पाहणी केली. चहल यांनी बीकीसेतील मिठी नदी परिसराची पाहणी केली. चहल यांनी यावेळेस पावसाळी उपययोजनांबाबत माहिती घेतली.

मुंबईत किती पाऊस?

दरम्यान मुंबईत 27 जून सकाळी 8 ते 28 जून सकाळी 8 या 24 तासांच्या कालावधीत मुंबईत कधी आणि किती मिमी पाऊस झाला आहे, याबाबतची माहिती मुंबई महापालिकेने ट्विटद्वारे दिली आहे.

रिमझिम ते बदाबदा पाऊस

मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार या 24 तासांच्या कालावधीत मुंबई शहरात एकूण 7 मिमी पाऊस झालाय. तर पूर्व उपनगरात 28 आणि पश्चिम उपनगरात सर्वाधिक 29 मिमी इतका पाऊस झालाय.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.