AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Rain | मुंबईत जोरदार पाऊस, ‘हा’ मुख्य आणि महत्वाचा मार्ग बंद

Mumbai Rains Updates | मुंबईला पावसाने चांगलंच झोडपून काढलंय. पावसाची मुंबईतील विविध भागात जोरदार बॅटिंग सुरु आहे. या पावसामुळे मुंबईतील सध्याच्या घडीचा महत्वाचा मार्ग बंद करण्यात आला आहे.

Mumbai Rain | मुंबईत जोरदार पाऊस, 'हा' मुख्य आणि महत्वाचा मार्ग बंद
प्रातिनिधिक फोटोImage Credit source: ANI
| Updated on: Jun 28, 2023 | 2:55 PM
Share

मुंबई | मुंबई शहर आणि आसपासच्या परिसरात अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर जून महिन्यातील शेवटच्या काही दिवसांमध्ये मान्सूनची एन्ट्री झाली. पावसाने लेट पण थेट एन्ट्री घेतली. जून महिन्याच्या या अखेरच्या आठवड्यापासून जोरदार पाऊस बरसतोय. अशातच आता पावसाने आज 28 जून बुधवारी सकाळपासून मुंबईतील विविध ठिकाणी हजेरी लावली आहे. पावसाने मुंबई आणि ठाणे शहराला चांगलंच झोडपून काढलंय. या पावसामुळे मुंबईतील अनेक भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे मुंबईतील महत्वाचा मार्ग आता बंद करण्यात आला आहे.

पावसामुळे अंधेरी सबवे वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. अंधेरी परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. शनिवारी 24 जून रोजी झालेल्या पावसामुळे या अंधेरी सबवेत मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. या पाण्यात अनेक गाड्या अडकल्या होत्या. त्यामुळे आता कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेत पालिका प्रशासनाने हा अंधेरी सबवे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

दर पावसाळ्यात थोडाशा पाण्यामुळे हा अंधेरी सबवे भरतो. परिणामी वाहतूक बंद करावी लागते. यंदा महापालिका प्रशासनाने अंधेरी सबवेतील पाण्याचा निचरा करण्यासाठी मोठी तयारी केल्याचा दावा केला होता. मात्र पालिकेचा हा दावा पावसाच्या पाण्यासोबत वाहून गेल्याचं दिसतंय.

मुंबईकरांना मनस्ताप

अंधेरी पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या गोखले पूलाचं काम गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु आहे. त्यामुळे अंधेरी पूर्व-पश्चिम अशी येजा करण्यासाठी अंधेरी सबवे या मार्गे प्रवास केला जातो. पण पावसामुळे हा सबवे बंद करण्यात आलाय. त्यामुळे आता जोवर पाण्याचा निचरा होत नाही, तोवर अंधेरी सबवे मार्ग खुला केला जाणार नाही. त्यामुळे आता मुंबईकरांना जेव्हीएलआर (ट्रॉमा सेंटर), कॅप्टन गोर उड्डानपूल (विलेपार्ले) आणि मिलन सबवे या पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागेल.

पालिका प्रशासन अलर्ट

मुंबईतील पावसाच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन अलर्ट झालंय.पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी मिठी नदी परिसराची पाहणी केली. चहल यांनी बीकीसेतील मिठी नदी परिसराची पाहणी केली. चहल यांनी यावेळेस पावसाळी उपययोजनांबाबत माहिती घेतली.

मुंबईत किती पाऊस?

दरम्यान मुंबईत 27 जून सकाळी 8 ते 28 जून सकाळी 8 या 24 तासांच्या कालावधीत मुंबईत कधी आणि किती मिमी पाऊस झाला आहे, याबाबतची माहिती मुंबई महापालिकेने ट्विटद्वारे दिली आहे.

रिमझिम ते बदाबदा पाऊस

मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार या 24 तासांच्या कालावधीत मुंबई शहरात एकूण 7 मिमी पाऊस झालाय. तर पूर्व उपनगरात 28 आणि पश्चिम उपनगरात सर्वाधिक 29 मिमी इतका पाऊस झालाय.

Follow Us
तुळजाभवानी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार तीन दिवस राहणार बंद
तुळजाभवानी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार तीन दिवस बंद
मोठी बातमी! एअर इंडियाच्या वैमानिकांना ड्रग टेस्ट अनिवार्य
एअर इंडियाच्या वैमानिकांना ड्रग टेस्ट अनिवार्य: गांजा सेवनानंतर कठोर निर्णय
रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ
रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ: परिवहन विभागाचा निर्णय
आजच्या महाराष्ट्र बातम्या: शिवसेना सुनावणी, राजकीय घडामोडी
महाराष्ट्रातील ताज्या बातम्या: राजकीय घडामोडी, हवामान अंदाज आणि महत्त्वाचे निर्णय
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?