AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Rains : ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट! मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पनवेलमध्ये मुसळधार पावसाचा जोर वाढला

Mumbai Rains : मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, पनवेल इत्यादी भागात मुसळधार पावसाची बॅटिंग सुरु सकाळपासून पाहायला मिळाली आहे. दिवसभर पावसाचा जोर असाच कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, पावसाचा जोर असात राहिला, तर सखल भागात पाणी भरुन मुंबईची पुन्हा तुंबई होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Maharashtra Rains : ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट! मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पनवेलमध्ये मुसळधार पावसाचा जोर वाढला
मुसळधार...Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Sep 16, 2022 | 11:00 AM
Share

मुंबई : मुंबई आणि उपनगरात मुसळधार (Mumbai Rains) पावसाने सकाळपासून हजेरी लावली आहे. मुंबईसोबत आजूबाजूच्या परिसरात पावसाचा जोर वाढलाय. मुंबई, नवी मुंबई (Navi Mumbai), ठाणे, पालघर, पनवेल इत्यादी भागात मुसळधार पावसाची बॅटिंग सुरु सकाळपासून पाहायला मिळाली आहे. दिवसभर पावसाचा जोर असाच कायम राहण्याची शक्यता (Maharashtra Rain alert) वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, पावसाचा जोर असात राहिला, तर सखल भागात पाणी भरुन मुंबईची पुन्हा तुंबई होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पालिका प्रशासनही सज्ज झालंय. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मुंबई आणि उपनगरासह ठाणे, रायगड या भागात पावसाचा जोर वाढलाय.

मुसळधार पावसाचा परिणाम मुंबईच्या वेगावर होण्यास सुरुवात झाली आहेत. मुंबईच्या तिन्ही लोकल मार्गावरची सेवा उशिराने सुरु आहे. तर रस्त्यांवर सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे वाहतुकीचा वेगही मंदावू लागलाय.

मुंबईमध्ये शुक्रवारी सकाळी 9 वाजल्यापासून पावसाचा जोर वाढला आहे. दरम्यान, येत्या 3 ते 4 तासांत अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अपरिहार्य कारण नसेल, तर शक्यतो घराबाहेर न पडण्याचं आवाहनही जाणकारांकडून गेलं जातंय. शिवाय येत्या 48 तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाचे तज्त्र आणि जाणकार के.एस. होसाळीकर यांनी ट्वीट करुन याबाबतची माहिती दिली आहे.

पाहा व्हिडीओ

पुण्यातही मुसळधार

खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रातला पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय. त्यामुळे पुण्यातील भिडे पुलावर पाणी येण्यास सुरुवात झालीय. त्यामुळे भिडे पुलावरची वाहतूक पोलिसांनी बंद केलीय.

नाशिकमध्ये जोरदार

नाशिकमध्ये पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावल्याने गोदा घाट परिसरात पाण्याची पातळी वाढली आहे. नाशिक जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पाऊस सुरूच आहे. जिल्ह्यातील 24 प्रकल्प तुडुंब भरलेत. पाहा व्हिडीओ…

फक्त मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातच नव्हे, तर पुणे आणि नाशिकमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे नाशिकच्या गंगापूर धरणातून पाणी सोडण्यात आलं आहे. गंगापूर धरणातून 7 हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तर इतके पुण्यातही पुन्हा एकदा जोरदार सरींनी हजेरी लावलीय.

ठाण्याच्या भिवंडी शहरात कोसळलेल्या मुसळधार पावसाने अनेक सखल भागात पावसाचे पाणी साचले.तर तीनबत्ती भाजी मार्केटमध्ये एक ते दीड फूट पाणी साचल्याचे पाहायला मिळाले.

कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात.
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार.
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....