Mumbai Temperature : मुंबईच्या तापमानात घट सुरुच, किमान तापमान 14 अंश राहणार, IMD चा अंदाज

राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीची लाट (Cold Wave) पाहायला मिळतेय. महाराष्ट्राची (Maharashtra) राजधानी मुंबईत (Mumbai Temperature) रविवारी निचांकी कमाल तापमानाची नोंद झाली होती.

Mumbai Temperature : मुंबईच्या तापमानात घट सुरुच, किमान तापमान 14 अंश राहणार, IMD चा अंदाज
मुंबईत लोकांनी शेकोट्या पेटवल्या (Photo Credit: ANI Twitter)
Follow us
| Updated on: Jan 25, 2022 | 11:05 AM

मुंबई: राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीची लाट (Cold Wave) पाहायला मिळतेय. महाराष्ट्राची (Maharashtra) राजधानी मुंबईत (Mumbai Temperature) रविवारी निचांकी कमाल तापमानाची नोंद झाली होती. सोमवारी किमान तापमानात 6 अंश सेल्सिअसची घट नोंदवली गेली. मंगळवारी म्हणजेच आज किमान तापमान 14 अंश राहील, असा अंदाज भारतीय हवामान विभागाच्या वतीने वर्तविण्यात आला आहे. सोमवारी मुंबईतील सांताक्रुझ येथील केंद्रामध्ये किमान तापमान 15 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं होतं तर रविवारी कमाल तापमान 21 अंश सेल्सिअसवर पोहोचलेलं दिसून आलं. दुसरीकडे कुलाबा येथील वेधशाळेत 16.2 अंश सेल्सिअसची नोंद झाली. सोमवारी दिवसाचे कमाल तापमान 24 अंश सेल्सिअसच्या दरम्यान होतं. कुलाबा येथील वेधशाळेत 24.6 अंश तर सांताक्रूझ येथील वेधशाळेत 24.8 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली

मुंबईत हुडहुडी कायम राहणार

मुंबईत आणखी पुढचे काही दिवस तापमानात घट होणार असल्याचा हवामान तज्ञांचा अंदाज आहे. पाकिस्तानच्या बलूचिस्तान मधून येणाऱ्या धुळीच्या वादळामुळे मुंबईच्या वातावरणावर परिणाम झालेला दिसून आलाय. जानेवारी महिन्यात मुंबईतील तापमान 24 अंश सेल्सिअस असणे ही दुर्मिळ घटना समजली जाते. गेल्या दशकामध्ये जानेवारी महिन्यात 25.3 अंश सेल्सिअसची नोंद झाली होती. ही नोंद 17 जानेवारी 2020 रोजी झाली होती. रविवारी सांताक्रुज येथील केंद्रामध्ये कमाल तापमान 23.8 डिग्री सेल्सिअस नोंदवलं गेलं.

आजही थंडी राहणार

हवामान विभागाच्या तज्ञांनी सांगितल्यानुसार तर पूर्वेकडील वाऱ्यांच्या परिणामामुळे तापमानात घट झाली असल्याचं सांगण्यात आलं आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार मुंबईतील किमान आणि कमाल तापमान हे मंगळवारी 14 अंश सेल्सिअस ते 25 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहू शकतं. 10 जानेवारी रोजी मुंबईत किमान तापमान 13.2 अंश सेल्सिअसवर आलं होतं. या महिन्यातील सर्वात कमी तापमानाची मुंबईतील नोंद होती.

पुढचे तीन दिवस थंडीचा कडाका वाढणार

राज्यात थंडीचा कडाका 8 फेब्रुवारीपर्यंत कायम राहिल. 8 फेब्रुवारीनंतर थंडी हळूहळू कमी व्हायला सुरुवात होणार आहे. पुण्यात पुढील तीन दिवसात थंडीचा जोर वाढणार आहे. 27 आणि 28 ला तापमानात आणखी घट होणार आहे. राज्यात येणाऱ्या पश्चिमी वाऱ्यामुळे आणि पाकिस्तानातून आलेलं धूळीचं वादळ हे अरबी समुद्रावरून आल्यानं हवेत आद्रता जास्त आहे. त्यामुळे थंडीचा कडाका कायम राहणार हवामानत तज्ञ मकरंद कुलकर्णी यांनी अंदाज वर्तवला आहे. वातावरणीय बदलामुळं मुंबई, नाशिक, औरंगाबाद आणि पुण्यात तापमान कमी झालंय.

इतर बातम्या:

Mumbai Air Quality | मुंबईत दशकातल्या सर्वात धोकादायक हवेची नोंद, कुलाबा, माझगावला सर्वाधिक फटका!

Maharashtra Weather Update : राज्यात हुडहुडी, तापमानाचा पारा घसरला, थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता

Mumbai Records six degree fall in Minimum Temperature Mumbai also records cold wave

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.