AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मिंधे गटास दिल्लीत एक ‘पटेल’ अन् मिलिंद देवरांना नवे व्हिजन मिळाले!; संजय राऊतांचा थेट निशाणा

Saamana Editorial on Milind Deora Inter in Shivsena : मिलिंद देवरांना खास जनाधार नाही, फार तर त्यांना दिल्लीत 'हे' म्हणून काम मिळेल!; संजय राऊतांचा घणाघात. मिलिंद देवरा यांच्या पक्षांतरावर संजय राऊतांचं स्पष्ट भाष्य... मिंधे गटास दिल्लीत एक 'पटेल' अन्... राऊतांचा थेट घणाघात

मिंधे गटास दिल्लीत एक 'पटेल' अन् मिलिंद देवरांना नवे व्हिजन मिळाले!; संजय राऊतांचा थेट निशाणा
| Updated on: Jan 16, 2024 | 8:44 AM
Share

मुंबई | 16 जानेवारी 2024 : मिलिंद देवरा यांनी 14 जानेवारीला काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्याच दिवशी दुपारी त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. दक्षिण मुंबई मतदारसंघातून मिलिंद देवरा यांना निवडणूक लढायची आहे. या मतदारसंघातून निवडणूक लढण्यास ते इच्छुक आहेत. मात्र महाविकास आघाडीत ही जागा ठाकरे गटाकडे जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे देवरा यांनी काँग्रेसला रामराम केला. देवरा यांच्या पक्षांतरावर आजच्या सामनाच्या अग्रलेखात भाष्य करण्यात आलं आहे. ‘देवरा यांचे ‘मिंधे’ व्हिजन!’ या शीर्षकाखाली आजचा सामनाचा अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे. यातून मिलिंद देवरा यांच्यावर थेट निशाणा साधण्यात आला आहे.

सामना अग्रलेख जसाच्या तसा

मिलिंद देवरा यांना कोणताही खास जनाधार नाही. उद्योगपतींच्या वर्तुळात त्यांचा वावर आहे. मिंधेगटास दिल्लीत त्याकामी एक ‘दूत’ मिळाला व देवरा यांना फार तर मिंधेगटाचे दिल्लीतील ‘दूत’ म्हणून काम मिळेल. बदल्यात राज्यसभा मिळेल . उद्योगपतींच्या मध्यस्थीनेच देवरा मिंधे गटात पोहोचले . मिंधे गटास दिल्लीत एक ‘पटेल’ मिळाले व देवरांना नवे व्हिजन मिळाले . यात राष्ट्रकारण व समाजकारण अजिबात नाही . महाराष्ट्राच्या हिताचा तर विषयच नाही . देवरा यांनी काय करावे हा त्यांचा प्रश्न , पण मिंधे गटाच्या व्हिजनमुळे काँग्रेस सोडली , असे बोलून त्यांनी स्वतःचीच अवहेलना करू नये , इतकेच!

माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला सोडले आहे. देवरा कुटुंबाचे काँग्रेसचे 55 वर्षांचे संबंध होते. मुरली देवरा हे मुंबई काँग्रेसमधील बडे प्रस्थ होते व गांधी कुटुंबात मुरली देवरा यांचे वजन होते. केंद्रात देवरा कुटुंबाने सर्वोच्च पदे भूषविली ती काँग्रेसमुळेच. पण मिलिंद देवरा यांनी काँग्रेसचा आता त्याग केला व महाराष्ट्रात नव्याने स्थापन झालेल्या ‘मिंधे’ गटात सामील झाले. काँग्रेस हा एक विचार होताच, पण ‘मिंधे’ गट म्हणजे कोणता विचार आहे की ज्यासाठी 50-50 वर्षांचे काँग्रेसशी नाते त्यांना तोडावेसे वाटले?

राहुल गांधी यांच्या अंतस्थ गोटात मिलिंद देवरा यांचा समावेश होता. पण गांधी यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’स रविवारपासून सुरुवात होत असतानाच देवरा यांनी काँग्रेसला सोडले. हा मुहूर्त भाजपने काढला असावा.

देवरा हे लोकसभेच्या दोन निवडणुका सातत्याने हरले व ज्या दक्षिण मुंबईतून त्यांना तिसऱ्यांदा लढायची इच्छा होती त्या जागेवर शिवसेनेचे विद्यमान खासदार अरविंद सावंत आहेत. त्यामुळे सध्याच्या महाआघाडीत या जागेवर काँग्रेसला लढता येणे शक्य नव्हते. देवरा यांनी या जागेसाठी आग्रह धरला व शेवटी 50 वर्षांचे नाते तोडून ते मिंधेवासी झाले.

Follow Us
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका.
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी.
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची...
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची....
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार.
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर.
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.