शेतकरी वाऱ्यावर; पंतप्रधान दौऱ्यावर!; संजय राऊतांचा मोदी सरकारवर शाब्दिक हल्ला

Saamana Editorial on PM Narendra Modi Government : शेतकरी आंदोलनावरून संजय राऊत यांचा मोदी सराकारवर घणाघात केला आहे. शेतकऱ्यांचा सरकारच्या आश्वासनांवर भरवसा नाही, असं संजय राऊत म्हणालेत. दिल्लीतील शेतकरी आंदोलनावरून सरकारवर निशाणा, वाचा सविस्तर...

शेतकरी वाऱ्यावर; पंतप्रधान दौऱ्यावर!; संजय राऊतांचा मोदी सरकारवर शाब्दिक हल्ला
Follow us
| Updated on: Feb 15, 2024 | 8:07 AM

मुंबई | 15 फेब्रुवारी 2024 : उत्तर भारतातील शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन छेडलं आहे. या आंदोलनाच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. आजच्या सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करण्यात आली आहे. शेतकरी वाऱ्यावर; पंतप्रधान दौऱ्यावर! या शीर्षकाखाली आजचा सामनाचा अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे. शेतकऱ्यांचा सरकारवर भरवसा राहिला नसल्याचं संजय राऊत यांनी सामनाच्या या अग्रलेखात म्हटलं आहे. शेतकरी हवालदिल असताना सरकारचं त्यांच्याकडे लक्ष नाही, असं म्हणत संजय राऊतांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केलाय.

सामनाचा अग्रलेख जसाच्या तसा

शेतमालाला किमान आधारभूत किंमत मिळावी या जुन्याच मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी केंद्र सरकारविरोधात नव्या लढाईचा एल्गार पुकारला आहे. त्यांच्यावर पोलिसी लाठ्या, रबरी गोळ्यांचा, मारा होत आहे तर महाराष्ट्रातील बळीराजा गारांचा आणि राज्यकर्त्यांच्या बेपर्वाईचा मारा सहन करीत आहे.

दिल्लीत सुलतानी आणि महाराष्ट्रात अस्मानी या चक्रव्यूहात शेतकरी सापडला आहे. या चक्रव्यूहात त्याला तसेच ठेवून पंतप्रधान अबुधाबीत ‘अहलान मोदी’च्या आत्मानंदात मग्न आहेत. ‘शेतकरी वाऱ्यावर, पंतप्रधान दौऱ्यावर’ असे हे संकट आहे. त्यातून शेतकऱ्याची मुक्तता होणार कशी, हा खरा प्रश्न आहे.

पंजाब-हरयाणातील शेतकरी न्याय्य मागण्यांसाठी पुन्हा एकदा दिल्लीतील हुकूमशाही राजवटीला धडका देत आहेत. दिल्लीशहांच्या विरोधात त्यांनी रणशिंग फुंकले आहे. अर्थातच त्यांच्यावर हुकूमशाहीचा वरवंटा फिरवला जात आहे. त्यांचे दिल्लीचे मार्ग रोखण्यासाठी दडपशाहीचे सर्व मार्ग अवलंबले जात आहेत. अश्रुधूर, लाठीमाराचे तडाखे कमी पडले म्हणून की काय, रबरी गोळ्यांचादेखील मारा त्यांच्यावर करण्यात येत आहे.

राजधानीच्या सीमेवर शेतकऱयांविरोधात अशी सुलतानी सुरू आहे, तर महाराष्ट्रातील बळीराजावर अवकाळी, गारपिटीचे ‘अस्मानी’ संकट कोसळले आहे. मागील काही वर्षांत अवकाळी, गारपीट आणि चक्रीवादळाचे तडाखे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी नेहमीचेच झाले आहेत. कधी अवकाळी पाऊस तर कधी गारपिटीचा तडाखा. त्यात अधूनमधून चक्रीवादळाचाही फटका बसत असतो. त्यामुळे शेतातले पीक हातात येईलच, याचा कोणताच भरवसा शेतकऱ्यांना राहिलेला नाही. ना निसर्गावर भरवसा, ना सरकारच्या आश्वासनांवर.

'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?
'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?.
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी.
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला.
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका.
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा.
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ.
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री.
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?.
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले...
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले....