AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ एकाच तत्वावर महाविकास आघाडीचं जागावाटप; संजय राऊतांनी सिक्रेट फॉर्म्युला सांगितला

MP Sanjay Raut on Loksabha Election 2024 Mahavikas Aghadi Jagavatap : लोकसभा निवडणूक अन् महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला...; संजय राऊत यांचं स्पष्ट भाष्य. लोकसभा निवडणूक जिंकण्याचा विश्वास ते भाजपवर निशाणा संजय राऊत यांची सविस्तर प्रतिक्रिया. वाचा...

'या' एकाच तत्वावर महाविकास आघाडीचं जागावाटप; संजय राऊतांनी सिक्रेट फॉर्म्युला सांगितला
| Updated on: Dec 27, 2023 | 12:07 PM
Share

गणेश थोरात, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, मुंबई | 27 डिसेंबर 2023 : लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आहे. अशात युती आणि महाविकास आघाडीचं जागावाटप कसं होणार याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. त्यांमी महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्मुला सांगितला आहे. जो जिंकेल त्याची जागा… हे आमचं सूत्र आहे, असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे. तसंच इंडियाचा चेहरा कोण असेल? यावरही संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे.  तसंच येत्या निवडणुकीत इंडिया आघाडीच निवडणूक जिंकेल, असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केलाय.

जागावाटपावर काय म्हणाले संजय राऊत?

ज्या चर्चा आहेत त्या आम्ही वृत्तपत्रातून पाहतोय. आमचं असं म्हणणं आहे आणि ते सर्वांना माहीत आहे. प्रकाश आंबेडकर म्हणजे आमचे बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी जेव्हा चर्चा होत असते तेव्हा ही आम्ही त्यांना सांगतो जिंकेल त्याची जागा आहे हे आमचं सूत्र आहे. आमच्या आघाडीमध्ये जागेवरून ओढताण नाही. होणारही नाही. जागांचं वाटप जे आहे ते निवडून देण्याची क्षमता आणि उत्तम उमेदवार यावरती आमच्या तिन्ही पक्षाच एक मत आहे या सूत्रानुसार आम्ही पुढे जात आहोत, असं संजय राऊत म्हणाले.

वंचित बहुजन आघाडीला देखील नरेंद्र मोदी यांच्या हुकूमशाही विरुद्ध लढायचं आहे. नरेंद्र मोदी हे परत सत्तेत आले, तर या देशाला हुकूमशाहीच्या काही ढकलत जाईल. विरोधी पक्षाला तिहार जेलमध्ये जाऊन बसावं लागेल. प्रकाश आंबेडकर यांची भूमिका देशासाठी फार मोठा मंत्र आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ते नातू आहेत. त्यामुळे मला असं वाटतं, या संविधानाचे महत्त्व सर्वात जास्त त्यांना माहिती आहे. संविधान वाचवण्याची आम्ही लढतो आहोत.

इंडिया आघाडीचा चेहरा कोण?

इंडिया आघाडीचा चेहरा कोण? अशी वारंवार विचारला होते. यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी इंडिया आघाडीची एकजूट महत्वाची आहे. निवडणुकीनंतर आम्ही चेहरा ठरवू असं म्हटलं. यावर राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार म्हणतात ते खरं आहे. इंडिया आघाडीसाठी कोणत्याही चेहऱ्याची गरज नाही. ज्या देशात तानाशाही आहे. त्या तानाशाहीचा राजकीय गट आहे तो गट तानाशाहीचा आपला एक चेहरा समोर आणतो. लोकशाहीत खूप चेहरे असतात. त्यामुळे लोकं कोणालाही निवडतात हे महत्वाचं आहे. असं राऊत म्हणालेत.

इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.