AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bombay High Court : सैनिकांसाठी स्वहितापेक्षा राष्ट्रहित मोठे; सेवा कार्यकाळ वाढून देण्याची लेफ्टनंट कर्नलची मागणी न्यायालयाने फेटाळली

आपल्या दिव्यांग मुलाच्या उपचारासाठी मुंबईमधील (MUMBAI) सेवा कार्यकाळ वाढून द्यावा, अशी मागणी करणारी एक याचिका एका लेफ्टनंट कर्नलने मुंबई उच्च न्यायालयात (High Court) दाखल केली होती. मात्र न्यायालयाने (Court) ही याचिका फेटाळून लावली आहे.

Bombay High Court : सैनिकांसाठी स्वहितापेक्षा राष्ट्रहित मोठे; सेवा कार्यकाळ वाढून देण्याची लेफ्टनंट कर्नलची मागणी न्यायालयाने फेटाळली
मुंबई उच्च न्यायालयImage Credit source: twitter
| Updated on: Jul 19, 2022 | 8:54 AM
Share

मुंबई : आपल्या दिव्यांग मुलाच्या उपचारासाठी मुंबईमधील (MUMBAI) सेवा कार्यकाळ वाढून द्यावा, अशी मागणी करणारी एक याचिका एका लेफ्टनंट कर्नलने मुंबई उच्च न्यायालयात (High Court) दाखल केली होती. मात्र न्यायालयाने (Court) ही याचिका फेटाळून लावली आहे. ही याचिका फेटाळून लावताना सैनिकांसाठी राष्ट्रहित हे स्वहितापेक्षा मोठे असल्याने असं करता येणार नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. याचिकाकर्त्या लेफ्टनंट कर्नल यांचा मोठा मुलगा हा दिव्यांग आहे. त्याच्यावर मुंबईमध्ये उपचार सुरू आहेत. माझा मुलगा हा शंभर टक्के दिव्यांग असून, त्याच्यावर केवळ मुंबईमध्येच उपचार होऊ शकतात, त्यामुळे माझा मुंबईमधील सेवा कार्यकाळ वाढून द्यावा अशी मागणी करणारी याचिका त्यांनी हायकोर्टात दाखल केली होती. मात्र ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. एका सैनिकासाठी राष्ट्रहित हे स्वहितापेक्षा मोठे असते असं न्यायालयाने म्हटले आहे.

काय आहे प्रकरण?

याचिकाकर्ते लेफ्टनंट कर्नल यांचा मोठा मुलगा हा शंभर टक्के दिव्यांग आहे. त्याच्या उपचारासाठी आपल्याला मुंबईमधील कार्यकाळ वाढून देण्यात यावा अशी मागणी त्यांनी लष्कराला केली होती. मात्र लष्करी सचिव शाखेच्या तोफखाना विभागाने त्यांची ही मागणी अमान्य केली. त्यानंतर त्यांनी याविरोधात हायकोर्टात धाव घेतली. मात्र हायकोर्टाने देखील त्यांची ही याचिका फेटाळून लावली आहे. लेफ्टनंट कर्नल यांच्यावतीने अॅड क्रांती एल.सी. व कौस्तुभ गिध यांनी युक्तीवाद केला. खंडपीठाने दोन्ही बाजुचा युक्तीवाद ऐकल्यानंतर ही याचिका फेटाळून लावली.

न्यायालयाने काय म्हटले

खंडपीठाने आदेश देतान असे नमदू केले की, भारताचे सैनिक जिवाची कोणतीही पर्वा न करता देश सेवा करतात याचा आम्हा देशवासीयांना अभिमान आहे. सैनिकांसाठी स्वहितापेक्षा राष्ट्रहीत महत्त्वाचे असते.एका सैनिकासाठी देशाचे संरक्षण करणे हेच प्रथम कर्तव्य असते. त्यामुळे याचिकाकर्त्याने राष्ट्रहिताचा विचार करावा असे म्हणत न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.