AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका लागणार? जितेंद्र आव्हाड यांचं नेमकं भाकीत काय?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मोठा दावा केला आहे. महाराष्ट्रात आगामी काळात अनेक राजकीय घडामोडी घडणार आणि अखेर मध्यावधी निवडणुका जाहीर होणार, असं भाकीत जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.

महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका लागणार? जितेंद्र आव्हाड यांचं नेमकं भाकीत काय?
Image Credit source: tv9
| Updated on: May 12, 2023 | 9:18 PM
Share

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. पुढच्या वर्षी देशभरात लोकसभेची निवडणूक पार पडणार आहे. त्यानंतर राज्यात विधानसभा निवडणुकांचा धुराळा उडण्याची शक्यता आहे. त्याआधी राज्यात महापालिका निवडणुकांचंदेखील बिगूल वाजण्याची शक्यता आहे. असं असताना सुप्रीम कोर्टाकडून काल महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल जाहीर करण्यात आला. या निकालावरुन सत्ताधारी पक्षांकडून आपल्याच बाजूने निकाल लागल्याचा दावा केलाय. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या निकालानंतर राज्यात आगामी काळात मध्यावधी निवडणुका लागणार असल्याचं मोठं भाकीत केलं आहे.

“सुप्रीम कोर्टाने 141 पानांची रुलबुक दिली आहे. तुम्हाला त्या रुलबुकप्रमाणेच चालावं लागणार. त्यामुळे जर-तरला काहीच अर्थ नाही. तुम्हाला ज्यादिवशी अपात्रतेचा अर्ज टाकलाय त्याचदिवशीचा विचार करायचा आहे, असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट म्हटलेलं आहे. तेव्हाचा राजकीय पक्ष कोणता होता हे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलंय. तेव्हा शिवसेना हा राजकीय पक्ष होता. त्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे होते. उद्धव ठाकरे यांनाच व्हीपचा अधिकार आहे”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

‘सुनील प्रभू यांचा व्हीप लागू होईल’

“सुप्रीम कोर्टाने आपल्या निकालपत्रात म्हटलंय की, कोणत्याही पक्षात विधीमंडळ पक्षापेक्षा राजकीय पक्ष जास्त महत्त्वाचा आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे, व्हीप नेमण्याचा अधिकार पक्षप्रमुखाला असतो, गटनेता नेमण्याचा अधिकार हा पक्षप्रमुखाला असतो, हे कालच्या जजमेंटमध्ये लिहिलेलं आहे. म्हणून त्यांनी जजमेंट सुरु केलं तेव्हा सुनील प्रभू यांचा व्हीप लागू होईल. त्यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे हाच पक्ष होता. त्यामुळे उगाच समज गैरसमज पसरविण्यात काहीच अर्थ नाही”, असं आव्हाड म्हणाले.

“गोंधळात टाकण्याचे प्रकार सुरु आहेत. निकाल स्पष्ट आहे. फक्त आपण म्हणतो ना, नाही रे तो गेलाय, पण जाहीर कसं करायचं, किती वाजता करायचं? घरच्यांना कसं समजवायचं? असा हा प्रकार आहे”, अशी टिप्पणी जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी केली.

“निकाल तुमच्या बाजूने लागलाय. तुमच्याच बाजून सगळं काही लागलंय. आमचं काहीही म्हणणं नाही. सुप्रीम कोर्टाने असं का म्हटलं की शेड्यूल 10 प्रमाणे स्प्लिट इज नॉट अलाऊड? शेड्यूल 10 चा गाभाच निघून जाईल, असं सुप्रीम कोर्टाने का म्हटलं? हे वाद घालून उगाच गोंधळात टाकायचं नाही”, असंदेखील ते म्हणाले.

‘महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका लागणार’

“सुप्रीम कोर्ट फार सीरियस आहे. दिल्लीच्या बाजून जो निकाल दिलाय, त्याबाबत केंद्र सरकार भूमिका घेत नाही, असं दिल्ली सरकारने सुप्रीम कोर्टात जेव्हा सांगितलं तेव्हा कोर्टाने तातडीने सुनावणीचे आदेश दिले. त्यामुळे लोकांना ते वर्षभर खेचतील असं वाटतंय ना, काही खेचाखेच होणार नाही. बघा आता काय होणार आहे ते. राजकारण खूप बदलत जाईल. माझ्या अंदाजाने महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका लागणार. हे माझं वैयक्तिक मत आहे”, अशी भूमिका जितेंद्र आव्हाड यांनी मांडली.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.