AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात नव्या कोरोनाचा एकही रुग्ण नाही; पण, काळजी घ्या: राजेश टोपे

राज्यात नव्या कोरोनाचा संसर्ग झालेला एकही रुग्ण सापडलेला नाही. पण गाफिल राहून चालणार नाही. सरकार सर्व खबरदारी घेत आहे. तुम्हीही काळजी घ्या, असं आवाहन राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केलं. (New Covid-19 mutant strain: No need for citizens to panic, says Rajesh Tope)

राज्यात नव्या कोरोनाचा एकही रुग्ण नाही; पण, काळजी घ्या: राजेश टोपे
| Updated on: Dec 30, 2020 | 11:57 AM
Share

मुंबई: राज्यात नव्या कोरोनाचा संसर्ग झालेला एकही रुग्ण सापडलेला नाही. पण गाफिल राहून चालणार नाही. सरकार सर्व खबरदारी घेत आहे. तुम्हीही काळजी घ्या, असं आवाहन राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केलं. तसेच राज्यात लॉकडाऊन लावण्याचा सरकारचा कोणताही विचार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. (New Covid-19 mutant strain: No need for citizens to panic, says Rajesh Tope)

देशात नव्या कोरोनाचा संसर्ग झालेले काही रुग्ण सापडले आहेत. पण महाराष्ट्रात अजूनतरी नव्या कोरोनाचा संसर्ग झालेला रुग्ण सापडलेला नाही. महाराष्ट्रात कोणीही इन्फिल्टेड झालेलं आढळलेलं नाही. पण आम्ही पूर्ण खबरदारी घेत आहोत, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

ब्रिटनमधून आलेल्या प्रत्येक प्रवशांचा स्वॅब घेऊन त्यांना क्वॉरंटाईन केलं जात आहे. आतापर्यंत 43 जणांचे सँपल घेण्यात आले आहेत, असं सांगतानाच नव्या कोरोनाच्या संसर्गावरून महाराष्ट्र सरकार अॅलर्ट झालं आहे. सरकार अत्यंत गंभीरपणे या प्रकरणात लक्ष घालत आहे. कोणताही निष्काळजीपणा केला जात नाही, असंही त्यांनी सांगितलं.

प्रवासी सापडत नाहीत

ब्रिटनमधून आलेले काही प्रवासी सापडत नाहीत. हा गंभीर विषय आहे. पोलिसांना या प्रवाशांना शोधण्याच्या सूचना देण्यात आल्या असून या प्रवाशांचा शोध सुरू आहे. या प्रवाशांनीही स्वत:हून आरोग्य यंत्रणेसमोर येऊन तपासणी करून घ्यावी, असं आवाहनही टोपे यांनी केलं आहे.

लॉकडाऊन नाही

राज्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आहे. लोक मास्क लावत असून सोशल डिस्टन्सिंगचे नियमही पाळत आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याचा विचार नाही. मात्र, नागरिकांनी गाफिल राहू नये. गर्दी करू नये आणि गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. सरकारने दिलेल्या नियमांचं काटेकोर पालन करावं, असंही ते म्हणाले.

लोकल सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील

नव्या वर्षाच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत लोकल सेवा सुरू होणार का? असा सवाल टोपे यांना विचारण्यात आला. त्यावर लोकल सेवा पुढच्या वर्षी सुरू करायच्या की नाही, याचा आढावा घेतला जाईल. नवीन वर्षात रुग्णांची संख्या काय राहते हे पाहू, त्यानंतरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबतचा अंतिम निर्णय घेतील, असंही ते म्हणाले. (New Covid-19 mutant strain: No need for citizens to panic, says Rajesh Tope)

संबंधित बातम्या:

 कोरोनाच्या नव्या अवताराची डोकेदुखी, यूकेत पहिल्यांदाच एका दिवसात 40 हजार रुग्ण

कोरोनाची लस घेतल्यावर तब्येत बिघडली तर, जबाबदारी सरकार घेणार की कंपनी?

कोरोनाच्या नव्या घातक अवताराची भारतात एन्ट्री, 6 जण नव्या विषाणूमुळे बाधित

(New Covid-19 mutant strain: No need for citizens to panic, says Rajesh Tope)

Follow Us
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना..;जे. पी. नड्डा यांची विधानसभेत टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना..;जे. पी. नड्डा यांची विधानसभेत टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया.
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान.
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका.
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका.